Skip to main content

समाजकारण

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

लेखक कांदा लिंबू यांनी गुरुवार, 01/01/2026 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की.

चालू घडामोडी : सप्टेंबर २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी रविवार, 01/09/2019 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ! आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत. सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे.

मतदान केलं काय ?

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 30/04/2019 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! काल मुंबई, ठाणे येथील मतदान पार पडले. मी ठाणे येथे राहतो मात्र मतदार कार्ड चांदिवली (उत्तर मध्य मुंबई ) मतदान क्षेत्रात असल्यामुळे त्या विभागात जाऊन मतदान करावे लागते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा त्रास फारच वाढल्यामुळे सकाळी लवकर उठून उन्हाला चकवून मतदान पार पाडायचे असा निश्चय केला मात्र नेहमीप्रमाणे उशीरच झाला. केंद्रावर पोहोचलो तर वेगवेगळ्या पक्षांचे बुथ लागले होते. निवडणूक याद्या तपासून मतदान करण्यासाठीची चिट्ठी बनवायला गेलो तर तिथले कार्यकर्ते ऑनलाईन यादी चेक करुन तुमचे नाव यादीत नाही असे सांगू लागले. एकंदरीत सगळ्याच बुथ वर अनुभवी कार्यकर्त्यांची वानवा जाणवत होती.

ते पंधरा लाख !

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 04/06/2018 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे.

बाबा-बुवा-माताजी यांचा सुळसुळाट

लेखक पुंबा यांनी शुक्रवार, 22/12/2017 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू विचारपद्धतीत संत या शब्दाला मान आहे, संत ही उपाधी मिळण्यासाठी सज्जन, दुसर्‍याची दु:खे समजून घेणारा, जमेल तिथे करूणाभाव ठेऊन लोकांना योग्य मार्गावर आणणारा असा माणुस असे सर्वमान्य आहे. आधुनिक महाराष्ट्रात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे दोन रचनात्मक काम उभारणारे, समाजाला योग्य मार्गावर आणणारे संत होऊन गेले. हल्ली मात्र स्वयंघोषीत संत, अध्यात्मिक तारणहार उदंड झालेले आहेत. गेल्या ५ वर्षातच किमान ३ बहुचर्चीत बाबे(आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने संत) आपल्या काळ्या कामांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले. आसाराम, रामपाल आणि गुरमीत हे ते तिघे.

राष्ट्रोद्धाराची संधी

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 24/11/2016 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे. पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत. यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्‍या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही.

भारताचा नकाशा

लेखक विकास यांनी सोमवार, 30/05/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा नकाशा कसा असावा या संदर्भात अनेक वादविवाद आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचा वाद हा मुख्यत्वे काश्मीर कसे दाखवले आहे यावरून होतो. इशान्येकडील राज्यांच्या संदर्भात देखील आंतर्राष्ट्रीय सीमा दाखवताना वाद घडत असतो. अरूणाचल प्रदेश हे त्याचे एक उदाहरण झाले. अरूणाचल प्रदेशाला चीन स्वत:चा भाग समजतो आणि कुरघोडी करत असतो. जगात आंतर्राष्ट्रीय सीमावाद सगळ्यात जास्त कुठे असतील तर ते भारतीय उपखंडात आणि भारत-चीन सीमांतर्गत आहेत असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

घरचे आणि दारचे अर्थशास्त्र

लेखक विकास यांनी मंगळवार, 15/12/2015 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
गॅरी ट्रूमन यांच्या बुलेट ट्रेनचा अट्टाहास का? वर चालू असलेल्या चर्चेत ट्रेनच्या ऐवजी विषयालाचा (किमान माझ्याकडून) अधिक फाटे फुटू नयेत (पक्षी: विषयांतर होऊ नये) म्हणून येथे एक वेगळा लेख लिहीत आहे ज्यात "घरच्या-दारच्या अर्थशास्त्राची" एक एकत्रीत गोष्ट (केस स्टडी) लिहीत आहे...