Skip to main content

ब्राह्मणद्वेष

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 07/06/2025 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मणद्वेष ===== प्रत्येक व्यक्ती लहान वयात जास्तीतजास्त संस्कारक्षम असते, त्याप्रमाणे लहान आकारातला समूह हा बदलांना पटकन सामोरा जाऊ शकतो. त्यात ब्राह्मण मूळात एक नसल्याने (सोलापूरकरसारख्या प्रकरणात ते ठळक दिसते.), त्यात ब्राह्मणत्व निश्चित काय हे आज सांगता येत नाही, त्यामुळे आता ब्राह्मणांचे बरेचसे प्रश्न हाता बाहेर गेल्यात जमा आहेत.

युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष

लेखक माहितगार यांनी शनिवार, 07/06/2025 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
धागा लेख प्रेर्ना आपले पटाईत सर हे खरं आहे की युरो-अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध साध्य करण्यासाठी नव-आर्थिक वसाहतवादाचे प्रारूप राबवले. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी असंख्य देशांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचंड हस्तक्षेप केला आहे आणि तो आजही चालू आहे.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 06/06/2025 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 05/06/2025 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का? मी चालकांच्या बाजूने मुळीच बोलत नाहीये, अपराध्याला शासन हे झालेच पाहिजे पण नेहमी चूक फक्त चालकाचीच असते का? मला खटकणारे काही मुद्दे इथे मांडतो आहे --रस्त्यावरील अतिक्रमणे - आजकाल अनेक मुख्य रस्ते आणि गल्ल्या अतिक्रमणाने व्यापल्या आहेत.

एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 05/06/2025 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम एआयच्या प्रगतीमुळे जागतिक स्तरावर नोकरी बाजार बदलत आहे आणि भारतातही याचा मोठा प्रभाव पडतोय. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेशस्तरीय नोकऱ्या विशेषतः एआय ऑटोमेशनमुळे धोक्यात आहेत. अलीकडील अहवालांवर आधारित भारतीय परिस्थितीचे विश्लेषण: १. तंत्रज्ञान क्षेत्रात फ्रेशर हायरींगमध्ये भीषण घट - २०१९ पासून भारतातील मोठ्या टेक कंपन्यांनी फ्रेशर भरती ५०% पेक्षा जास्त कमी केली आहे. नवीन भरतीत फ्रेशर्सचा वाटा आता फक्त ७% (पूर्वी १५%) आहे. - टीसीएस, इन्फोसिस सारख्या कंपन्या फ्रेशर्सची नियुक्ती मंदावल्या आहेत.

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

लेखक Bhakti यांनी बुधवार, 04/06/2025 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा..

ओलसर क्षण...

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 04/06/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची सुरुवात नेहमीच अनाहूत असते — नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा, अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण, जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता, जी वाचली नाही, पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे केवळ थेंबांचा ओलावा नव्हे — तर काळाचा एक अतिसूक्ष्म आविष्कार. काही वेळा वाटतं, जसे तिच्या अस्तित्वाच्या सीमारेषा पाण्यात विरघळल्या आहेत, ज्याचा अर्थ अजूनही टिकून आहे, माझ्या आत खोल दडलेला. तीही तशीच भासायची — क्षणागणिक, जणू एखादी अंतर्मुख लय, स्वतःच्या विचारांत गुंतलेली. कधी खळखळून हसायची अन् त्या हसण्यात क्षण कानू स्थिर, स्तब्ध व्हायचे त्या स्थिर क्षणांच्या काही आठवणी

कोकणातील तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस !

लेखक kvponkshe यांनी बुधवार, 04/06/2025 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य आणि ललिता यांचे नुकतेच लग्न झालेले. दोघंही आयटी मध्ये बऱ्यापैकी पगारावर होते. पुण्यात साहित्यला त्याच्या आईबाबांनी एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, हां थोडे कर्ज होते त्यावर, पण साहित्य आणि ललिता ते फेडत होते . साहित्यचे आईबाबा वेगळे राहणार होते, त्यामुळे ललिताला घरातील खरे खुरे डस्टबिन कुठे ठेवायचे हा प्रॉब्लेम नव्हता. साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न होते. कोकणात थोडी शेती आणि कौलारू घर असावे. घराला अंगण असावे. त्यात छान वेगवेगळी फुलझाडे असावीत. पडवीत झोपाळा असावा.