Skip to main content

शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 08/04/2025 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत ✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये ✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!" ✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ ✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण ✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे ✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते! ✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई ✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! सर्वांना नमस्कार. काही‌ दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन‌ टाटांचा तरूण मित्र!

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन १

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/04/2025 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक स्वानंदासाठी केलेले स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. हल्ली (गेल्या काही महिन्यांपासून) ब्रह्म मुहुर्तावर उठणे होते. खरे सांगायचे तर जाग तशीही येत होती पण झोप पूर्ण होत नव्हती तर होणार्‍या झोप मोडीशी झगडा करण्यापेक्षा संध्याकाळचे जेवण आणि रात्री झोपण्याचीच वेळ बरीच अलिकडे घेतली. ज्या दिवशी लवकर झोप येणार नाही त्या दिवशी मेडीटेशन केले आणि झोपीचा पॅटर्न यशस्वीपणे बदलला.

व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 06/04/2025 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
हां तर प्रश्न अतिषय सरळ, साधा आणि सोपा आहे - व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ? एक खरी बुध्दी म्हणजे काय ? (भाषांतर हा एक नाजुक प्रकार आहे . कारण वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या शब्द आणि अर्थ ह्यांचे मॅपिंग हे १:१ असेलच असे काही नाही. अर्थात कोणत्याही एका भाषेतील शब्द अन्य कोणत्याही भाषेत अनुवादित करता येतीलच असे नाही. अर्थात इंटेलिजन्सला बुध्दी असे अनुवादित करणे हे तितकेसे योग्य नाही. पण तुर्तास ते असो.) आता आपण आपल्या आजुबाजुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उदय उत्कर्ष पहात आहोत. चॅट जी.पी.टी.

बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 05/04/2025 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा ======================= मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. दर वेळेला लेखाच्या शेवटी मी सावधगिरीचा इशारा म्हणून "डोळे मिटून विश्वास ठेउ नये असे लिहीतो". असे का असा प्रश्न अनेकजण विचारतील. त्यासाठी माझा ताजा म्हणजे कालचाच अनुभव सांगणे आवश्यक वाटते. युयुत्सुनेटची मी इंट्रा-डेसाठी पण चाचणी घेत आहे. भाकीते इथे टाकायला सुरूवात केल्यापासून "मी डोळे मिटून" इंट्रा-डेसाठी पोझिशन घेत आहे. मला ~७०% सक्सेस रेट मिळाला. पण तरीही माझा एकूण नफा कालच्या घसरगुंडीमध्ये गमावला.

चिटिश कुमार.... !!

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 04/04/2025 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
चिटिश कुमार बिहारीमुस्लिम नितीशकुमार वर चिडले, गिरगिट (सरडा),ठग,धोकेबाज म्हणत भिडले ।। RSS सर्टिफाईड मुख्यमंत्री, सेक्युलर आता भगवा मंत्री ।। कैसे कैसे मीम्स चे काम, अविश्वनीय हा पलटुराम ।। हाफ पॅन्ट, काळी टोपी. म्हणें RJD झाली BJP ।। 17% वोटबँक आता कसले, नितीश फक्त गुलजार हसले ।। पसमांदा (दलित) मुस्लिम त्यांच्या बरोबर आहे, नितीशकुमार यांची राजकीय दृष्टी बरोबर आहे ।।

व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 04/04/2025 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे. हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary. अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे . आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे क

लोकमान्य(होमरूल -स्वराज्य संघ)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/04/2025 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
१ १८८८ ला स्थानिक परिषदेतून टिळक कॉंग्रेसमध्ये आले.कर्झनच्या अन्यायकारी बंगालच्या फाळणीच्या कारस्थानानंतर कॉंग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांची फळी त्यांनी प्रस्थापित केली.परंतू जहाल -मवाळ वादात जहाल मतवाद्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,कॉंग्रेस फुटली.पुढे टिळकांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासा

आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय....

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 03/04/2025 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आंधळ्या हिंदूंनो कधी जागे होणार ? खानग्रेस ने काय पाचर मारलीय, कधी पहाणार आणि कधी रागे होणार? हिंदुस्थान मध्ये रेल्वे आणि सशस्त्र सेने पेक्षा जास्त जमीन वक़्फ ची असा दावा आहे... त्यांच्या विरुद्ध काही अपील नाही हा कावा आहे मोदीसरकार,शाह किरेन रिजिजू यांनी बिल पास केले नसते. तर संसदेची जागा सुद्धा वक़्फ ने खाल्ले, ग्रास केले असते संविधानात नसलेले हे बेकायदा बोर्ड नेहरू ने लबाडीने आणले, मूर्ख हिंदु नी स्वत:च्या बरबादीसाठी खांग्रेस ला निवडून आणले. वक़्फ धार्जिणे 233 खासदार कोण आहेत ? त्यांना निवडून देणारे अंध-हिन्दु कोण आहेत?

लोकमान्य (राजद्रोह खटला)

लेखक Bhakti यांनी बुधवार, 02/04/2025 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे. टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये. १.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 01/04/2025 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.