[शशक' १९] - नियती
संध्याकाळ झाली तशी ती सरसरून उठली.
एका अनामिक आनंदाच्या ओढीने आळस झटकून तीने आवरायला सुरूवात केली. एका नव्या आयुष्याची स्वप्ने गेल्या कित्येक रात्री तीने रंगवली होती. आज त्या स्वप्नांची पूर्तता करायची वेळ आली होती.
एव्हाना तो यायला हवा होता.?!! मनाशीच तिला वाटलं, कदाचित त्याने आपला विचार तर बदलला नसेल ना? या विचाराने ती सैरभैर झाली.
बरोबर आठ वाजता तो आला. सर्वांना चुकवत त्यांनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. त्या गर्दीत आपल्याला कुणी ओळखणारं नसेल असं वाटलं असावं त्यांना.
मिसळपाव