Skip to main content

जयपूर आणि उदयपूर बद्दल माहिती

लेखक सान्वी यांनी मंगळवार, 05/02/2019 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, पहिल्यांदाच या विभागात लेखन करत आहे. आम्ही म्हणजे आम्ही दोघे व आमचे सव्वा वर्षांचे चिरंजीव पुढच्या आठवड्यात जयपूर आणि उदयपूर ला जाणार आहोत. जाणकार मिपाकरांनी व ज्यांनी या आधी ही ट्रिप केली असेल त्यांनी जरा आपले अनुभव सांगावे. २ दिवस जयपूर आणि २ दिवस उदयपूर असा प्लॅन आहे. राहण्याची सोय यजमानांच्या ऑफिस हॉलिडे होम मध्ये झाली आहे. प्रश्न फक्त हा आहे की प्रत्येकी 2 दिवसात कुठले must watch स्पॉट्स करावे? सोबत लहान बाळ आहे त्यादृष्टीने सांगावे. जयपूर चे हवामहाल न उदयपूर चे सिटी पॅलेस तर ऑलरेडी आहे लिस्ट मध्ये . तसेच शॉपिंग कुठे व कसली करावी?

[शशक' १९] -  गुरु

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
उजवा हात कापून झाला तेव्हा उसासे सोडत त्याने माझ्याकडे बघितले. पांढरा धूर सोडत मी सिगारेट त्याच्याकडे सोपवली. बाजूलाच एक चौकोनी बकेट ठेवली होती. रुंद काळपट टेबलावर विखुरलेले तुकडे तिच्यात भरून ठेवले.

[शशक' १९] - क्रॉस कनेक्शन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो : आज नक्कि ना ? मी : हो . तो : कसं ओळखायचं ? मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन . तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स ,काळी पँट. मी : ९ वाजता . भारत कॅफे . तो : डन . .पहिल्यांदाच भेटणार होतो . सोशल मिडियावरची ओळख . एक्साइटेड.

[शशक' १९] - कल्याण

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुलासाठी माध्यम मराठी की इंग्रजी निवडावं? हा प्रश्न पडला होता. मायमराठीत प्राथमिक शिक्षण उत्तम हे तज्ञांचं मत योग्य वाटत होतं. इंग्रजी माध्यमातली मुलं स्पर्धेत पुढे जातात. तिथेच मुलाचं कल्याण होईल असं जनमत होतं. मराठी माध्यमात प्रवेश घेऊन आपण मुलाच्या कल्याणात बाधा आणली असं नको व्हायला म्हणून निमूटपणे इंग्रजी नर्सरीसाठी प्रवेश घेतला.

[शशक' १९] - भूक

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलापासून जवळच काही डोंगर होते. त्यापलीकडे माणसांची वस्ती होती. तो त्या बाजूला फारसा फिरकत नसे. जंगल त्याच्या गरजांसाठी पुरेसे होते. एकदा तो पलीकडे गेला. माणसांच्या वस्तीत फिरून आला. फिरून फिरून तो दमला. त्याला भूक लागली. फार करकचून भूक लागली. पण ही नेहमीसारखी साध्यासुध्या मांसाची भूक नव्हती तर ही होती 'माणसाच्या' मांसाची भूक ! ते कसे मिळवावे? तो विचारात पडला. कोल्हा हुशार होता, लोक त्याच्या हुशारीला लबाडी म्हणत. पण लोकांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचे? तर कोल्ह्याने युक्ती केली.

क्रश (शतशब्दकथा)

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वप्रकाशित असल्यामुळे स्पर्धेसाठी देता येणार नाही. म्हणून इथेच टाकत आहे, बघा जमलीये का.. सूचनांचे स्वागत आहे :) -------------------------------------------------------------------------------------------- छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे.

हा कुणाचा फोटो आहे ? ( स्पर्धेबाहेरची शशक १ )

लेखक खिलजि यांनी सोमवार, 04/02/2019 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
" अजून चहा दिला नाही हिने . हिचं ना कालपासून मी बघतोय लक्षच नाही आहे. वृषा, ए वृषे , काय झालंय तरी काय हिला. बहिरी झाली आहे का ? का, माझ्याच घरात मलाच किंमत उरली नाही आहे ? " मी स्वतःशी म्हणालो. वृषा : " सोनू , पिल्लू , उठा चला , दोन घास खाऊन घ्या . कालपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तिथे " काहीच समजत नाही आहे मला . अरे काय चाललंय काय ? चहाचा पत्ता नाही आणि हि इथे फोटो कुरवाळत बसलीय. अरे हे काय ,हि तर माझा फोटो बघून रडतेय. सिद्धेश्वर विलास पाटणकर

ग्रीन सिग्नल

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
एका वर्दळीच्या दिवशी संध्याकाळी ती तिच्या दुचाकीवरून घरी जाण्यास निघाली होती. संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती. पण हल्ली तिच्या लेखी ही वेळ म्हणजे संध्याकाळच! घरी जाऊन जेवण केल्यांनतर रात्र होते असं तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. दिनक्रम, कामाच्या वेळा तशा होत्या त्याला ती तरी काय करणार. इथलं हेवी ट्रॅफिकही आता अंगवळणी पडलं होतं. विचारात मग्न असलेली ती एक एक चौक मागे टाकत रस्ता कापत घरी जाण्याचे अंतर कमी करत होती. रस्त्यावरून वाहने चालवणार्या प्रत्येकाची घरी जाण्याची घाई पावलोपावली जाणवत होती. रोजचा परिचयाचा रस्ता असला तर आपण सराईतपणे गाडी चालवू शकतो.

[शशक' १९] - मारुतीला घाम फुटतो

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नित्यनेमाप्रमाणे उमाजीशेठ दर्शनाला देवळात घुसला. हनुमानाच्या मुर्तीकडे त्याने डोळे विस्फारुन पाहीले. मुर्तीचा चेहरा काळवंडलेला. गालावरुन थेंब ओघळत होते. ”मारुतराया, का घाम फुटला तुला? नको कोपू रे गावावर.” तो ढसढसा रडायला लागला. गावात वार्‍यासारखी बातमी पसरली. सगळे गावकरी देवळासमोर जमले. लोक कुजबुजू लागले. “अनाचार माजलाय.

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 04/02/2019 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. अशातच मिपावर ‘ प्युअरसोतम - ला – देस्पांद’ हा धागा वाचनात आला. त्यात पुलंच्या आपल्याला आवडलेल्या वाक्यांची नोंद वाचकांनी केलेली आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत.