Skip to main content

दुपारची झोप..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/08/2019 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात. फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.

एका साइड व्हिलनची कैफियत

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 26/08/2019 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला रोज वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल. आता बच्चनकडून, धरमपाजींकडून मार खायला काय वाटायचं नाही. पहिलं म्हणजे ते खरंच मारतायत असं वाटायचं. दुसरं म्हणजे सीन टायमावर शूट होउन बच्चन मोकळा व आपण मोकळे दुसर्‍या स्टुडिओत जायला. नाहीतर एकेकाचे नखरे. "आज मूड नही है".

जॅकी

लेखक तमराज किल्विष यांनी रविवार, 25/08/2019 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
जॅकी हा माझ्या करिअरमधील न विसरता येणारा सहकारी. म्हणायला तो माझ्यावरच्या पदावर होता, पण त्यानं कधीच ते जाणवू दिले नाही. गडी सतत हसतमुख असायचा. बॉसचे बोलणं कितीही ऐकायला लागो, की क्लायंट शिव्या देवो. जॅकी सतत खूष असायचा. सर्व काही हसण्यावारी घेण्यानं विरोधकांना काही किमतच उरायची नाही. जॅकी इतका चिकणा (कोडगा) होता की त्याला तेलात बुडवलं तरी तो तेलकट होणार नाही. इतका स्थितप्रज्ञ ( निर्लज्ज) की समोरचा निर्बुद्ध ठरायचा. जॅकी कार्यालयात कधीच वेळेवर उगवायचा नाही. सकाळी बायकोच्या नावावर एजंट म्हणून आर. डी. ची वर्गणी गोळा करून तो पोस्टात जमा करायचा. एक दीड वाजला की त्याला ऑफिस आठवायचे.

शोक कुणाला? खंत कुणाला?

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/08/2019 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 25/08/2019 15:34 या दिवशी प्रकाशित केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.


जन्माष्टमी२.*

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 25/08/2019 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णाच्या नांवे जो होतो आजकाल दहीहंडीचा खेळ तो खेळण्या, पाहण्या सगळ्यांनाच असतो अमाप वेळ पुन्हा पुन्हा जे कष्टतात, गोविंदांचे थर रचण्या अनेक पाठीराखे, सम्राट असतात हजर त्यांचे प्रयत्न पाहण्या खेळकऱ्याना वाटते, अरे वा, आज आपल्याला बराच मिळाला भत्ता सम्राटांना वाटते, चला, आणखी काही काळ राहायला हवी सत्ता जिथे कुठे मारता आला डल्ला, त्यातलाच थोडा लुटवा आज खेळावर खेळाडूंना होऊ दे खूष, दिसू दे जोरदार जोश, होऊ दे जोरदार कल्ला हे खेळाडू, त्यांचा खेळ, त्यांचे पाठीराखे पाहताना.

दुनिया

लेखक तमराज किल्विष यांनी रविवार, 25/08/2019 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. " दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे " , "उसनं मांडं नी उसनं दांडं ", "दिलं तर गोड नाहीतर दोड" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही. माझं बालपण खेड्यात गेले. कोणत्याही सुविधा त्या काळात नव्हत्या. तंगडतोड करतच तालुक्याच्या गावाला जाऊन दवाखाना, भाजीपाला बाजार, म्हटलंच तर सिनेमा बघणे या गोष्टी कराव्या लागायच्या. माझ्या प्राथमिक शाळेतील वर्गमित्र व मी सर्वच शेतकऱ्याची मुले होतो. काही शेतमजुरी करणारांची होती. सगळ्यांची घट्ट अशी मैत्री होती.

पत्राद्वारे दासबोध अभ्यास उपक्रम - चाळीशीत

लेखक विटेकर यांनी रविवार, 25/08/2019 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी  "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा  उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. *क्रिया करून करवावी* या समर्थ उक्तीप्रमाणे ती.

पत्राद्वारे दासबोध अभ्यास उपक्रम - चाळीशीत

लेखक विटेकर यांनी रविवार, 25/08/2019 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी  "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा  उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. *क्रिया करून करवावी* या समर्थ उक्तीप्रमाणे ती.

वर्तुळ......

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 24/08/2019 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
हजारो वर्षांची संस्क्रुती असलेल्या आपल्या भारतात कर्तबगार स्त्रीयांची वानवा कधीच नव्हती. पुराणकाळात ज्यांनी वेद्याध्ययन केले अशा गार्गी आणि मैत्रेयी आणि गणीत शिकणारी लिलावती तसेच द्रौपदी तारा मंदोदरी अहिल्या सीता या पंचकन्या अशी फार जरी नसली तरी उदाहरणे आहेत. राज्यकारभाराचे धडे देवून एक आदर्श राजा घडवणार्‍या जिजाऊसाहेब, लढवय्यी झाशीची राणी , गोरगरीबांचे जीवन सुकर करणार्‍या अहिल्या देवी होळकर , या स्त्रीयांनी एक इतिहास घडवला. एक काल असा होता की मुलगी जन्माला येणे हेच मुळी अपषकुनी मानले जायचे.