Skip to main content

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 25/08/2019 15:34 या दिवशी प्रकाशित केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.





मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत : १. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. २, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान. ३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया. ४. UN Champions of the Earth Award, २०१८ : संयुक्त राष्ट्रसंघ (युएन). ५. Grand Collar of the State of Palestine, २०१८ : पॅलेस्टाईन. ६. Amir Amanullah Khan Award : अफगाणिस्तान. ७. King Abdullaziz Sash Award, २०१६ : सौदी अरेबियाचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. ८. TIME Person of the Year, २०१६. इत्यादी. महत्वाचे म्हणजे वरच्या यादीतील ८ पुरस्कारांपैकी ४ मुस्लीम राष्ट्रांचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील सौदी अरेबिया आणि युएई हे दोन देश इस्लामी देशांचे धुरीण आहेत ! १९६९ साली स्थापन झालेल्या Organisation of Islamic Cooperation या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची काही महिन्यांपूर्वी अबू धाबीत परिषद झाली होती. मुस्लिम लोकसंखेने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारताला त्या संघटनेत स्थान मिळू नये यासाठी, त्या संघटनेचा संस्थापक सभासद पाकिस्तान, सुरुवातीपासूनच सक्रिय होता आणि त्यात तो २०१८ पर्यंत यशस्वीही झाला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या संघटनेने पाकिस्तानचा कडवा विरोध मोडून, किंबहुना, संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची टाकण्याच्या धमकीची पर्वा न करता, तत्कालीन भारतिय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना, केवळ आमंत्रितच केले असे नाही तर, मुख्य भाषण (की नोट अ‍ॅड्रेस) देणार्‍या अतिथीचा सन्मान देऊन आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच. या वेळीही, काश्मिरसंबंधिची ३७० आणि ३५अ कलमे रद्दबातल केल्यामुळे पाकिस्तान जगभर, युएनमध्ये आणि विशेषतः इस्लामी जगात विषारी आणि विखारी भाषेत आकांडतांडव करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या रडगाण्याला ICO आणी चीनसकट कोणत्याही देशाने फारशी भीक घातलेली नाही. मात्र, याच वेळेस, युएईने मोदींना हे पारितोषिक देऊन, पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावलेली आहे, हे नक्की. एकीकडे मोदींच्या राज्यकारभाराची आणि आंतरराष्ट्रिय मुत्सेद्दीगिरीची (पाकिस्तान आणि चीन सोडून) जगभर प्रशंसा चाललेली असताना, भारतातले विरोधी पक्ष; विशेषतः कॉन्ग्रेस, कम्युनिस्ट आणि कडवे मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना; त्यांच्यामध्ये एकही गुण दिसत नाही आणि हिटलर, जातियवादी, मुस्लीमविरोधी, इत्यादी अर्थांची नवनवीन विशेषणे शोधून काढण्याचा त्यांचा व्यवसाय जोरात चाललेला आहे ! आणि भारतात वाढत असलेल्या असहिष्णूतेमुळे अनेक "तथाकथित विचारवंत, कलाकार, इत्यादींना देशात राहणे मुश्किल होत आहे !! "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण सर्वार्थाने सिद्ध करणारा भारत हा सर्व जगात एकमेव विशेष देश असावा !!! :( सुदैवाने, हे फक्त मोदी विरोधकांच्या बाबतीत खरे आहे, जनतेला मोदींबद्दल काय वाटते आहे ते तिने निवडणूकांत दाखवून दिले आहेच. :) या अतिरेकी मोदी विरोधाला कंटाळून, काही वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेते हल्ली जरासा सकारात्मक सूर लावू राहिले आहेत, हा त्यातल्या त्यात एक आशेचा विवेकी (sane) किरण म्हणावा काय ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 56811
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

+१

"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान देण्यामागे नक्की criteria काय आहे ? कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते.

In reply to by प्रसाद_१९८२

"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान देण्यामागे नक्की criteria काय आहे ? कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते. criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे . परवेज मुशर्र्फ यांनी जागतिक शांततेसाठी जे योगदान दिलेले होते त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आजही ते इंग्लंडमध्ये राहुन जागतिक शांततेसाठी कार्यरत आहेत. ते लोकशाहीचे सत्याग्रहाचे कडवे समर्थक होते. त्यांना पुरस्कार दिला २००७ मध्ये त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला होता तेव्हा ज्या अहिंसक रीतीने मुशर्रफ यांनी पाकिस्तानात निवडणुक जिंकलेली होती त्याचा ही प्रभाव पुरस्कार देतांना पडलेला होता. चायनाचे पंतप्रधान यांनी चायनीज जनतेला जे व्यक्तीस्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा दिली त्यासाठी त्यांना जुलै २०१८ या एकाच महीन्यात जे तीन ऑर्डर ऑफ झायेद दिले होते त्यापैकी एक दिला होता. त्यातुनच प्रेरणा घेऊन आज ते हाँगकाँग च्या नागरीकांना चायनाहुन अधिक स्वातंत्र्य देण्याचा मनापासुन प्रयत्न करत आहेत. मोदी यांनी देखील जागतिक शांततेसाठी केलेली कामगिरी विचारात घेण्यात आली असावी. मागच्या वर्षी एकाच महीन्यात ३ दिले होते यावर्षी या महीन्यात बघु अजुन कोणाचा झायेद साठी नंबर लागतो ?

In reply to by मारवा

काय हे मारवासायेब, या पुरस्काराचे आंतरराष्ट्रिय राजकारणातले महत्व, मोदींना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीखालच्या तीन परिच्छेदांत बर्‍यापैकी विस्ताराने लिहिले आहे. ते वाचायचे विसरलात की ते सोयीचे नाही असे ठरवून दुर्लक्ष केलेत ?! तुमच्यासारख्या राजकारणात मुरलेल्या भिडूकडून ही अपेक्षा नव्हती (कोण म्हणतोय रे तो, की हीच अपेक्षा होती म्हणून, आँ ?!) . पण असो. =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि हो... त्या तीन परिच्छेदांनंतरच्या चवथ्या परिच्छेदात लिहिलेल्या दुर्दैवी वास्तवाचे कटू सत्य लगेच सिद्ध करून दाखविल्याबद्दल, सखेद धन्यवाद ! :(

In reply to by मारवा

"criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे" श्रीमान मारवाजी, इतकी टोकाची भूमिका, आणि तीही केवळ प्रसाद १९८२ ह्यांनी 'कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते' असे लिहिले म्हणून? काय चुकीचे लिहिले त्यांनी? भारत व पाकिस्तान ह्यांच्यात सुरु असलेल्या बोलण्यांत कोलदांडा घालावा ह्या हेतूने कारगिल युद्ध सुरु करणारे ते हेच मुशरर्फ ना? ह्यांना शांततेचा पुरस्कार? आणि त्याच पंक्तीत मोदी? बाकी, हा सगळा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून तितपतच गाम्भीर्याने घ्यावा हे उचित पण criterion विचारणाऱ्याचा मुद्दा गैरलागू नाही, राष्ट्रद्रोही वगैरे विशेषणे लावावीत इतका चुकीचा तर नाहीच. (उद्या शंकर महादेवन आणि रविकिरण फडके ह्या दोघांनाही गायनाचे बक्षीस एकाच व्यासपीठावर मिळाले तर शंकर महादेवनचा बहुमान होईल की अपमान, हे तुम्हीच ठरवा. ही फक्त उपमा आहे हे लक्षात घावे.) असो. जे मिपावर समोर आले त्यावर माझी ही प्रतिक्रिया. बाकी आपली जी काही equations बाहेर असतील ती असोत.

यथोचित असो वा नसो वैयक्तिक लाभ नसता सारखे सारखे कौतूक करणे मनाला झेपत नाही म्हणून थोड़े दुर्लक्ष करूया आता मोदींकड़े. पुढील कौतुक अर्थव्यवस्था रुळावर आल्यावर अथवा 370 प्रमाणे एखादा उत्तुंग शटकार ठोकल्यावर मनापासून करूच. तोपर्यंत आवश्यक असलेल्या पण एकेरी दुहेरी धावा साठी उठून उभे राहणे आता तब्येतीला झेपणार नाही असं वाटते.

In reply to by जॉनविक्क

१०० वेळा सहमत, अर्थात जे चांगले काम केले आहे ते आहेच आणि त्या बाबत वाद नाहीच पण अजेंडा असल्यासारखे सारखे सारखे त्याच झाडावर याचा कंटाळा येतो आता.

Pakistan Senate chief cancels UAE visit to protest Modi award Chairman Senate Sadiq Sanjrani has cancelled his scheduled visit to the United Arab Emirates a day after the country gave Indian Prime Minister Narendra Modi highest civilian award. Sanjrani was to depart on a four-day visit to the UAE with a parliamentary delegation yesterday but it was called off to express solidarity with people of Kashmir and protest the Gulf state's decision to give Modi highest civilian award. According to a press release issued, the Chairman Senate said that Pakistan fully supported the freedom movement of Kashmiris. He said the Modi government has carried out unprecedented atrocities against Kashmiris and imposed a curfew in the occupied territory. पाकिस्तानची चांगलीच जळलेली आहे !!

In reply to by डँबिस००७

पाकिस्तानला पुरते कळून चुकले आहे की, युएई आपल्याला मुस्लिम बंधुराष्ट्र म्हणून फारतर बिरयानी खिलवेल, पण भिकेच्या कटोरीत छदामही टाकणार नाही. तेव्हा, मोदींना दिलेला पुरस्कार, हे तिथे न जायला एक छान कारण मिळाले, इतकेच ! तसेही, रिकाम्या हाताने परतल्यावर, डेलिगेशनला पाकिस्तानी जनतेच्या चपला खायला लागणार होतेच... ते टळले म्हणून त्यांनी आतापर्यंत एखादी गुप्त पार्टी सुद्धा केली असेल. :) सौदी युवराज महंमदने, फेब्रुवारीच्या पाकिस्तान भेटीत देवू केलेले २० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन, अजूनही (अपेक्षेप्रमाणेच) हवेतच आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मोदींना मिळालेले पुरस्कार, पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद सगळेच विकत घेतलेले आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे. अखिल मिपा मोदी द्वेष संघाच्या " काळा चष्मा न काढता शुभ्र कसे दिसत नाही" या नियतकालिकातून साभार टपाली दूरस्थ नाखु

In reply to by नाखु

=)) =)) =)) नाखुसाहेब, केस, "काळा चष्मा न काढता शुभ्र कसे दिसत नाही" या स्टेजच्या फार पुढे गेली आहे आणि आता ती, "आम्ही इतका गडद काळा चष्मा घालून बघतो तरी, (जगाला) शुभ्र कसे दिसते?" या स्टेजला पोहोचली आहे. ;) :)

In reply to by अभ्या..

अभ्या,, इथे हा प्रतिसाद एक वेळ ठीक आहे. कारण, काहीजण राजकारणाचा चष्मा झोपतानाही काढून शकत नाही, त्याला नाईलाज आहे. तेव्हा जळजळ समजू शकतो. पण, हाच प्रतिसाद पी व्ही सिंधूच्या जागतिक विजेतेपदाच्या विक्रमी कामगिरीच्या धाग्यावरही कॉपी पेस्ट केला आहेस (जिथे भारतिय मनात केवळ अभिमान सोडून इतर कोणतिही भावना अपेक्षित नव्हती), यावरून केस हाताबाहेर जाऊ लागली आहे. प्रकृतीची काळजी घे. ;) :) शुभेच्छांसह ! ****** अवांतर : इतर कोणत्याही भारतिय नेत्याबद्दल जर असे काही अभिमानस्पद घडले असते तर, एक भारतिय म्हणून तेवढ्याच उत्साहाने धागा टाकला असता. आता, एखाद्या नेत्याचे कर्तृत्व जग मान देण्याइतके समजत नाही, याला आम्ही काय करणार ? =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का जी, वरती मी सुद्धा थोडा (माझ्या दृष्टीने थोडा :) ) निगेटिव प्रतिसाद टाकला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे थोडे काही झाली कि मोदींची बाजू घेऊन कौतुकाचा धागा टाकला जातो असे का ? आता राजकीय ताज्या घडामोडींसाठी खास धागा आहे न ? हे प्रश्न मला पडले म्हणून मी वरचा प्रतिसाद टाकला.(बाकी मला सल्ला द्यायचा काही अधिकार नाही हे मी जाणून आहे) इतके दिवस मुद्दाम बोललो नाही पण जेव्हापासून मला समजत आहेत तेव्हापासून बघतोय घरचे आणि जवळचे नातेवाईक BJP शिवाय कुणालाही मत देत नाहीत RSS चे बाळकडू तर लहानपणापासून मिळत होते कारण कर्वेनगर येथे सम्राट अशोकच्या मैदानात तेव्हा शाखा भरायची, शाखेच्या निवासी शिबिरांना सुद्धा जायचो अगदी पानशेत वगैरे तेव्हाच्या थोड्या दुर्गम भागी जाऊन श्रमदान वगैरे करून आलोय. पण, नंतर नंतर बर्याच गोष्टी मला वयक्तिक खटकू लागल्या कधीतरी कट्ट्यात सांगीन त्या. सो हे सर्व सांगायचा उद्देश एक आणि एकाच आहे कि आपण आपल्या जवळच्या मित्राला सुद्धा चुकला तर ओरडतो किंवा खूप कौतुक टाळतो. मग इथे का नाही ? बस्स. आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या धाग्यावर अभ्याची पोस्ट बघून मला पण धक्का बसला तुमच्या इतकाच (पोस्ट समयोचित नव्हतीच त्याची ) असो ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न. खाजगीत सांगितले तेच इथे पण सांगतो आपला काहीही वयक्तिक वाद आणि आकस नाहीये फ़क़्त मतभेद आहेत ते हि वैचारिक सो आपण राग मानू नये. आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला.

In reply to by उपेक्षित

आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या धाग्यावर अभ्याची पोस्ट बघून मला पण धक्का बसला तुमच्या इतकाच (पोस्ट समयोचित नव्हतीच त्याची ) असो ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न.
नसेलही समयोचित पण धक्का बसणे तरीही चूकच. एकदा ही कायम समयोचितच असण्याची सवय लागली की...

In reply to by उपेक्षित

@ उपेक्षित : थोडे काही झाली कि मोदींची बाजू घेऊन कौतुकाचा धागा टाकला जातो असे का ? हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ???!!! "आपल्याला न आवडणारा माणूस/नेता असला की त्याचे कधिही काही दिसले की ते सगळेच 'थोडे' असते" ही फॅशन हल्ली काही लोकांची आवडती आहे. तुमच्या वरच्या म्हणण्याला काही आधार देवू शकला नाहीत तर, नाही नाही म्हणत, तुम्ही त्यांच्या कळपात सामील झाला आहात असेच होईल. भारताच्या बाबतीत काही चांगले झाले तर त्याचे कौतूक करताना मला अजिबात वाईट वाटत नाही... केवळ अभिमानच वाटतो. जात, धर्म, पक्ष, आवडती/नावडती व्यक्ती, इत्यादी चौकशी करून मगच, ते कौतूक करावे की करू नये, हे मी ठरवत नाही. याशिवाय, तुमचे भाजप किंवा आरएसएसबद्दल काय मत आहे हे इथे अत्यंत गैरलागू आहे... किंबहुना, माझ्याबाबतीत ते मत पूर्वग्रहदृष्टीने आलेले आहे. कारण, माझा भाजप अथवा आरएसएस यांच्याशी दुरान्वयानेही पूर्वी कधीही संबंध नव्हता आणि आताही नाही... माझी बांधिलकी माझ्या देशाशी आणि देशाच्या तिरंग्याशी आहे. अर्थातच, माझ्या मतांवर भाजप अथवा आरएसएस यांच्या विचारसरणीचा तडक काहीच प्रभाव नाही, तरीही तुमचे त्यांच्यासंबंधीचे काही बरे-वाईट अनुभव सामान्यज्ञान म्हणून ऐकायला माझी ना नाही. तसेच अनुभव इतर कोणी, इतर कोणत्या पक्षा/संस्थेबद्दल सांगितले तरीही मी ते ऐकू शकतो. कारण, माहिती/ज्ञानाचा विस्तार केव्हाही स्विकार्य असतो. माझी विचारसरणी फार साधी आणि सोपी आहे... भारतासंबंधी कोणतीही सकारात्मक कृती झाली तर मला त्याचा अभिमान वाटतो आणि तो व्यक्त करायला मला शरम वाटत नाही. "कोण्या एका नेत्याचा/पक्षाचा झेंडा सतत डोळे मिटून खांद्यावर घेण्याइतका, माझ्या बुद्धीचा अपमान, मी कधीही करणार नाही". त्यामुळे, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणताना ते कोणत्या राजकिय नेत्याशी/पक्षाशी निगडित आहे, याची खात्री करण्याची मला गरज अजिबात वाटत नाही. इतरांना आंधळेपणाने कोणा नेत्या-पक्षाची पाठराखण करायची असली तर, आणि ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला पचत असेल तर त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा असतील. भारतातील सद्य वस्तूस्थिती अशी आहे... १. देशाबद्दल किंवा मोदींबद्दल जरा काही चांगले म्हटले की हल्ली काही लोकांना अत्यंत जळजळ होते आणि लगेच "मोदीभक्त किंवा भाजप/आरएसएस समर्थक" अशी लेबले लावून टीका सुरू होते. तुमचा प्रतिसाद हेच सिद्ध करत आहे की, त्या ट्रॅपमध्ये तुम्हीही अडकला आहात (हे विचारत नाही, सांगत आहे). अन्यथा, भाजप किंवा आरएसएसच्या बद्दल मी आतापर्यंत कधीच काहीच लिहिले नाही, हे तुमच्या ध्यानात आले असते... निदान वरचा प्रतिसाद लिहिण्याअगोदर, मी तसे काही लिहिले आहे का, हे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न तरी केला असतात. २. अंध विरोधामुळे, लेबले लावणार्‍या लोकांच्या हे सुद्धा ध्यानात येत नाही कि, भारताच्या, त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या दुर्दैवाने, विरोधक नेते त्यांना नावाजावे असे स्वतः काही करण्याचा प्रयत्नही सद्या करत नाहीत... त्यांची सर्व शक्ती फक्त नकारात्मक बोलणे व नकारात्मक कृतीने सरकारची/मोदींची नालस्ती करण्यातच खर्च होते आहे... आणि तसे करताना त्यांचा इतका तोल जात आहे की, बर्‍याचदा आपण आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोचवत आहे, हे सुद्धा त्यांच्या ध्यानात येत नाही... किंबहुना, ध्यानात येते आहे पण त्यांना त्याची पर्वा कराविशी वाटत नाही. अश्या नेत्यांबद्दल त्यांच्या पाठिराख्यांनाही काही लिहिणे कठीण होत आहे तर इतरांनी कौतुकाने लिहायला आपली बुद्धी गहाण टाकावी लागेल, नाही का? ३. दुसर्‍याची मोठी रेषा खोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, स्वतःची कमीत कमी एखादी लहान रेषा तरी आखण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर, त्यांच्या त्या सकारात्मक कामाबद्दल अभिमानाने लिहायला मला आवडले असते. हल्लीची अशी एक-दोन सकारात्मक उदाहरणे सांगा, मी स्वतः त्यांच्याबद्दल कौतुकाचा लेख लिहेन. अन्यथा, वर सांगितलेल्या ट्रॅपमध्ये अडकायला तुम्ही मोकळे आहातच, दुर्दैवाने ! :( खाजगीत सांगितले तेच इथे पण सांगतो आपला काहीही वयक्तिक वाद आणि आकस नाहीये फ़क़्त मतभेद आहेत ते हि वैचारिक सो आपण राग मानू नये. हे खरेच खरे असले तर, विनाकारण/गैरसमजाने लेबले लावण्याअगोदर माझ्या लेखनातला मजकूर जसा आहे तसाच वाचून त्याचा अर्थ समजावून घ्या... त्यात नसलेले भलतेसलते काल्पनिक अनर्थ काढू नका. कारण, काही न लपवता स्पष्ट लेखन करण्याचा माझी शैली आहे, हे माझ्या इथल्या आणि खाजगीत लिहिलेल्या मजकूरावरून तुमच्या ध्यानात आले असते आणि मग तुम्हाला वरचा प्रतिसाद लिहिवासा वाटला नसता, हे सांगताना खरेच खेद होत आहे. :( आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला. हे खरे आहे असे गृहित धरूनच वरचा जरासा दीर्घ प्रतिसाद लिहिला आहे. कारण, माझ्याबद्दल ममत्व असणार्‍याने, कोणत्याही बाबतीत, कोणाही व्यक्तीबद्दल, (अ) काल्पनिक अर्थ शोधून गैरसमज करून घेणे आणि (आ) त्या गैरसमजावर आधारित लेबले लावणे, अश्या प्रकारच्या मानसिक ट्रॅप्समध्ये अडकू नये, असे मला प्रकर्षाने वाटते. याबाबत, मी नेहमी लिहीत नाही, याचा अर्थ असा नाही की लेबले मला मान्य आहेत. तर, त्याची कारणे अशी आहेत... (अ) जगातिल प्रत्येकाला सुधारण्यासाठी माझा जन्म झाला नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे आणि (आ) विशेषतः, झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च करणे, माझ्या तत्वात बसत नाही. :) इतके लिहिल्यावरही तुमचे समाधान झाले नाही तर, माझ्या दृष्टीने तुम्ही वरच्यापैकी एक किंवा दोन्ही कारणात बसाल. बाकी, तुम्ही काय करावे किंवा करू नये, हा निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे, याबाबत संशय नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Modi 'praise': 'Respect my approach,' says Shashi Tharoor as Kerala Congress seeks explanation वरिष्ठ कॉन्ग्रेस नेते जयराम रमेश यांनी काही दिवसापूर्वी, "मोदींच्या सर्वच गोष्टींवर नकारात्मक टीका करू नये, त्यांच्या चांगल्या गोष्टींची स्तुतीही करावी", अश्या अर्थाचे विधान केले होते. त्याला शशी थरूर आणि अभिषेक मनु सिंघवी या आणखी दोन वरिष्ठ कॉन्गेस नेत्यांनी पाठिंबा देणारी वक्तव्ये केली होती. आता त्या नेत्यांवर कॉन्ग्रेसमधून सडकून टीका होत आहे. शशी थरूर यांना तर केरळ कॉन्ग्रेसने कारणे द्या नोटीस बजावली आहे ! तेव्हा अंधविरोध, ही उच्च स्तरावरून सुरू होऊन खालपर्यंत झिरपलेली सवय आहे, हे परत एकदा सिद्ध झाले आहे. :) मग मिपावर तोच व्यवहार पाहून दोष तरी कोणाला देणार ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

(आ) विशेषतः, झोललेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च करणे, माझ्या तत्वात बसत नाही. :)
झोललेल्याला म्हणजे झोल करणार्‍याला का? :प ह घ्या हे वे सां न ल

In reply to by mayu4u

झोपेचे सोंग घेतलेला काय किंवा झोललेला काय, सेम डिफरन्स. ;) स्वगत : हायला, आजकाल सर्वांनाच काकदृष्टी प्राप्त झालेली दिसतेय ! वातावरणात काकदृष्टीचा इतका प्रादुर्भाव झाला आहे, त्याला लोक तरी काय करणार, म्हणा ! =)) =)) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऑस्कर मिळाले म्हणून रेहमानचे प्रत्येक गाणे सुपरहिट अवीट मानणे योग्य नाही, काही गाणी सुमार, काही कामचलाउ, काही छान आणि काही अफलातून असणे अनपेक्षित नाही. आणि भलेही प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेलही याचा अर्थही रेहमान फक्त सुपरहिट गाणे देतो असा ही नाही.

In reply to by जॉनविक्क

काहीही हा जॉनविक्क ! तुम्ही (हल्ली पडलेल्या एका प्रथेला धरून) भावनेच्या भरात फारच वाहत जाऊन, वरचा प्रतिसाद लिहून, आमचे मनोरंजन करण्याचा फारच जोराचा प्रयत्न चालू ठेवला आहात. :) एखाद्या व्यक्तीबद्दल कधितरी एखाद्या खरेच चांगल्या असलेल्या गोष्टीवर एखादा लेख लिहिण्याने, "त्या व्यक्तीच्या सर्व कृतींची स्तुती केली असे होत नाही", इतके जाणण्याइतके तुम्ही हुश्शार आहात असा आमचा समज आहे. पण, आमचा तो समज खोटा आहे, असे सिद्ध करण्याचा तुमचा हा प्रयत्न असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी होत आहात, हे नक्की. =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी चुका करत नाही अथवा करायच्या नाहीत असे काही व्रत घेतलेले नाही, माझ्याकडून चूक होउ शकते, तुम्ही म्हणता ते ही इथे घडले असावे. तेंव्हा आहो जाओ सोडून बाकी काहीही बोललात तर खटकणार नक्कीच नाही. "_/\_

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ???!!! >>>> पुरावा ? अहो जे जाणवले ते लिहिले आहे मी लगीच आपले कोर्टांत उभ करून साक्षी पुरावे कसले मागताय ? आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला. हे खरे आहे असे गृहित धरूनच वरचा जरासा दीर्घ प्रतिसाद लिहिला आहे. >>>>>>>> जे आहे तेच लिहिले आहे आणि याचा काहीही पुरावा नाहीये माझ्याकडे सो तुम्हाला कसे बघायचे माझ्या विधानाकडे हा तुमचा लुक आउट. असो माझ्याकडून इथेच पूर्णविराम बाकी खरडीवर धुमाकूळ घालू.

अनेकांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दुसर्‍या देशाने पुरस्कार दिला याने आनंद झाला, तर काहींना, त्यामुळे भारताची जागतिक स्तरावर पत वाढली म्हणून आनंद झाला... तर, इतर काहींना त्याबद्दल उदासिनता किंवा जळजळ वाटली. व्यक्ती तितक्या प्रकृती ! सर्वांसाठी धन्यवाद ! असो. त्यानंतर लगेच अजून एक घटना घडली आहे...

PM Modi conferred with top Bahraini award

युएईनंतर पंतप्रधान मोदींनी बहारेन या अजून एका खाडी देशाला भेट दिली. तेथिल राजे हामाद अल खलिफा यांनी मोदींना, भारत-बहारेन मैत्रीसाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल, त्यांच्या देशाचा "King Hamad Order of the Renaissance" हा सर्वोच्च बहुमान प्रदान केला.



अर्थातच, वरच्या सर्वांनाच आपापली भावना अधिक प्रबळ करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मोदींना मिळत आहेत त्या देशातील जनतेचे जीवन स्तर उंचावण्यामध्ये मोदींची भूमिका शून्य. ज्या देशामध्ये त्यांच्या कार्याचा प्रभाव पडतो त्या देशात त्यांच्या योजना, त्यांची प्राथमिकता, अंमलबजावणी या बद्दल विवाद आहेत. अशा परिस्थितीत का म्हणून लोकांनी या पुरस्कारांमुळे हुरळून जावे आणि जे जात नाहीत त्यांना तुम्ही हिणवावे?

In reply to by सर टोबी

या बाबतीत मिपाप्रथेप्रमाणे, "अभ्यास वाढवा" इतकेच सांगू इच्छितो. थोडी तसदी घेवून जालावर पाहणी केली तर बरीच विश्वासू माहिती मिळेल. सरसकट विधाने काय कोणीही करू शकतो. :) परदेशातल्या भारतिय नागरिकांना भारत व मोदींबद्दल हल्ली काय वाटते आहे, हे पहायला मोदींच्या त्या देशातल्या सभांच्या चित्रफिती जालावर पोत्याने आहेत. भारतातून वैध/अवैध मार्गाने परदेशात धन नेण्यार्‍या नागरिकांच्या कथा तर अनेक दशके "भारतिय लिजंड्स" झालेल्या आहेत, हे सांगायला नकोच. पण, परदेशस्थ सधन नागरिकांना भारतात धन गुंतवण्याबद्दल हल्ली काय वाटू लागले आहे हे पण स्वतःच जालावर जरूर पहा. केवळ उदाहरणादाखल, ही काही दिवसांपूर्वीची चित्रफीत पहा... बाकी, मुक्त संस्थळावर, आभासी आयडीच्या मागे लपून, विनापुरावा सरसकट विधाने काय कोणीही करू शकतो. :)

In reply to by सर टोबी

ज्या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना मिळत आहेत त्या देशातील जनतेचे जीवन स्तर उंचावण्यामध्ये मोदींची भूमिका शून्य. कायम मोदी द्वेषच दिसत असतो तुमच्या प्रतिसादात नेल्सन मंडेलाना भारतरत्न पुरस्कार दिल्यामुळे भारतीय किंवा दक्षिण आफ्रिकी जनतेच्या आयुष्यात काय फरक पडणार होता? मोंगलाना जसे जिथे तिथे संताजी धनाजी दिसत तसं झालंय तुमचं

In reply to by सुबोध खरे

तितके त्याचा प्रत्यय येण्याचा लढा कठीण. येणार काळच ठरवेल कुणाचे प्रेम किंवा कुणाचा द्वेष दुराग्रही होता.

कोणत्याही देशाने दुसऱ्या देशाच्या नेत्याला सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्या नेत्याला फारसा फरक पडत नसतो. पण हा देश असा सर्वोच्च पुरस्कार देतो आहे म्हणजे वारा कोणत्या दिशेने वाहत आहे याचा हा वातकुक्कुट आहे असेच गुप्तनिती चे तज्ञ समजतात. बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांनी असे पुरस्कार श्री मोदी याना दिले याचा अर्थ हे देश भारताच्या परराष्ट्र नीती शी एकसंघ (ALIGN) आहेत असे तात्पुरते तरी मानता येईल. सध्या कश्मीर चा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना याचे महत्त्व अनन्य साधारण आहे कारण पाकिस्तान तुमच्याशी युद्ध करू शकत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारणात हे तेलाने श्रीमंत झालेले इस्लामिक देश त्यांना भीक घालत नाहीत तर इतर कुणी तसे करण्याची शक्यता सुतराम नाही. तेंव्हा पाकिस्तानची कोंडी करून आपला कार्यभाग साधण्यात मोदी सरकार सध्या तरी यशस्वी झालेले आहे असेच म्हणावे लागेल. उद्या हे देश तुम्हाला हवे तसे वागतील अशी अपेक्षा चूक आहे. शेवटी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. उद्या पाकिस्तानने जर येमेन मध्ये आपले सैन्य सौदी अरेबिया च्या बाजूने ( हौदी बंडखोरांशी लढायला) पाठवले तर त्यांची वाऱ्याची दिशा बदलेल हे सत्य आहे. किंवा कतार आणि इराण विरुद्ध सौदी अरेबिया आणि बहारीन, संयुक्त अरब अमिराती या दोन गटांमध्ये पाकिस्तान जिथे वजन टाकेल( वजन शिल्लक असले तर) ते देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहू शकतील. त्यामुळे जोवर ऊन पडलंय तोवर आपले पीक वाळवून घ्या हीच वस्तुस्थिती आहे.

म्हात्रेसाहेब, तुम्ही लिहिता, "अनेकांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दुसर्‍या देशाने पुरस्कार दिला याने आनंद झाला, तर काहींना, त्यामुळे भारताची जागतिक स्तरावर पत वाढली म्हणू न आनंद झाला... तर, इतर काहींना त्याबद्दल उदासिनता किंवा जळजळ वाटली." तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही genuine पर्याय असू शकत नाहीत का? जसे, कुतूहल (की नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला गेला), त्याचे निकष काय आहेत, आणखी कुणाकुणाला हा पूर्वी दिला गेला, इ. डॉक्टर खरेंचा प्रतिसाद समर्पक आहे. तात्पुरत्या गोष्टींचा हर्ष-खेद किती मानायचा ह्यावर चर्चा करण्याजोगे काही नाही.

In reply to by रविकिरण फडके

माझ्या अल्पमतीप्रमाणे काही लोक केवळ मोदीद्वेषातून आपले प्रतिसाद लिहीत असतात त्याला उद्देशून डॉक्टरांनी प्रतिसाद लिहिला आहे.

In reply to by रविकिरण फडके

तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही genuine पर्याय असू शकत नाहीत का? जसे, कुतूहल (की नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला गेला), त्याचे निकष काय आहेत, आणखी कुणाकुणाला हा पूर्वी दिला गेला, इ. कुतुहल नक्कीच असू शकते. मात्र, ते शमवण्यासाठी त्याबद्दल जालावर पोत्याने माहिती आहे आणि मिपावर राजकारणावर टीप्पणी करणार्‍या कोणालाही ती सहजपणे उपलब्ध आहे. किंबहुना, उपरोधीक/तिरके प्रश्न करणार्‍यांना तर ती नीट माहित असतेही. किंबहुना, त्या पुरस्काराचे आंतरराष्ट्रिय महत्व मी लेखातच लिहिलेले आहे. पण, ती माहिती सोईस्कर नसल्यास, तिच्याकडे डोळेझाक करून, सहाजिकपणे, तिरके आणि/अथवा उपरोधी प्रश्न विचारले जातात. मानवस्वभाव ! असो. :) अजून थोडे... वर एका प्रतिसादात तुम्ही, criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे, ही मारवा यांची टीप्पणी खरीखरी व सरळ आहे असे मानून प्रतिसाद लिहिला आहे, हा तुमचा चांगूलपणा आहे. पण, त्या टीप्पणीच्या खालचा मजकूर आणि मारवा या आयडीच्या आतापर्यंतच्या लिखाणाचा कल पाहता, ते उपहासात्मक वाक्य होते, हे सहज ध्यानात येईल. ती टीप्पणी लिहून, मारवांनी सुरू केलेला वितंडवाद वाढविण्यात मला रस नव्हता, म्हणून तेथे काही लिहायचे हेतुपुर्रसर टाळले होते. आता, केवळ तुम्ही नावानिशी विचारणा केली आहे म्हणून इथे काही लिहिणे भाग पडले आहे, इतकेच... तिथला वितंडवाद इथे आणण्यासाठी हे लिहिलेले नाही. तुमच्या सर्वच प्रतिसांदांतील निरागस प्रश्नांबद्दल काहीच असहमती/आक्षेप नाही, हे वेगळे सांगायला नकोच. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे सगळं इतकं complex/ complicated आहे माहीत नव्हतं. निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, म्हात्रेसाहेब. मी फारच भोट आहे असं वाटतं मला! ह्यापुढे प्रतिसाद देताना जपून देईन. शक्यतो देणारच नाही.

In reply to by रविकिरण फडके

मग, (विशेषतः काही) मिपाकरांना इतके 'हे' समजलात की काय ?! ;) =)) ह्यापुढे प्रतिसाद देताना जपून देईन. हे ठिक आहे, पण... शक्यतो देणारच नाही. असे मात्र अजिबात करू नका, मिपा आपलाच आसा, बेधडक लिवा ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रवीश कुमार ला मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर तुम्ही धागा काढला नाही पण मोदींना झाएद बहुमान मिळाल्यावर लगेच धागा काढलात. म्हणून तुमचं घर उन्हात बांधण्यात येत आहे.

In reply to by हरवलेला

खरं बोलणार्‍याचं घर, दोन्ही बाजूची माणसं, नेहमी उन्हातच बांधतात... त्यामुळे, समजायला लागल्यापासून आम्ही उन्हातल्या घरातच कायमची वस्ती करून आहोत... त्यामुळे, पर्वा इल्ले. =)) =)) किंबहुना, (उन्हातल्या आभासी घराची का होईना, पण) अजून एक रियल इस्टेट आमच्या नावावर झाल्याबद्दल आनंदच आहे. ;) :)

थोडे विचित्र वाटत आहे ना की मुस्लिम राष्ट्रांना चांगल्या कार्याची पारख . म्हणजे वाईट कार्य आणि चांगले कार्य ह्यातील फरक त्यांना समजत आहे . पण इतिहास काही वेगळेच सांगतो

In reply to by Rajesh188

यात विचित्र असे फारसे काही नाही. आंतरराष्ट्रिय राजकारणात मित्र बदलत राहतात, कायम राहतात ते आपल्या देशाचे हितसंबंध... आणि चांगल्या नेत्याने स्वतःच्या देशाचे (स्वतःचे किंवा स्वतःच्या पक्षाचे नव्हे) हितसंबंध सर्वतोपरी ठेवून वागणे अपेक्षित असते. जो नेता स्वार्थ सोडून असा खंबीरपणे वागतो, त्याची आणि त्याच्या देशाची पत आंतररष्ट्रिय स्तरावर वाढते. मोदींशी आणि भारताशी उघडपणे दोस्ती करण्यात हल्ली अनेक देश रस दाखवत आहेत, त्याचे हे कारण आहे. आजच्या बातम्या पाहिल्यात तर, मोदींनी ट्रंपबरोबरच्या पत्रकार परिषदेत, "भारत आणि पाकिस्तानामधील सर्व वाद द्विराष्ट्रिय वाद आहेत. त्यासाठी आम्ही इतर कोणा राष्ट्राला कष्ट देवू इच्छित नाही" असे सुनावले... या मुत्सद्दी भाषेचा साध्या सोप्या मराठीत अर्थ, "भारत-पाकिस्तान वादांत तुम्ही नाक खुपसू नका", असा होतो. ट्रंपने गेले काही आठवडे भारत-पाकिस्तान वादात, अगदी लोचटपणे, मध्यस्थाची भूमिका करण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर हे वाक्य मोदींची "नो नॉनसेन्स निति" अधिकच ठळकपणे दाखवून देते. अशी हिम्मत पूर्वी भारत तर सोडाच पण इतर कोणत्या देशाच्या नेत्याने (यदाकदाचित् दाखवली असेल तर) अतीविरळपणेच दाखवली असेल. ही वस्तूस्थिती दुर्दैवाने अनेक भारतिय नेत्यांना आणि त्याच्या पाठिराख्यांना समजून घ्यावी असे वाटत नसले तरी, इतर राष्ट्रांच्या नेत्यांना बरोबर कळते आणि वळतेही !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हितसंबंध हा शब्द महत्वाचं आहे . आणि हित जपण्यासाठी खंबीर नेता लागतो तो डगमगत नाही विरोधी मताना . आणि असा खंबीर पना मोदी मध्ये आहे हे सर्व जाणतात त्या मुळे आपली पत जगात वाढली आहे हेच मला सुचवायचे आहे

In reply to by Rajesh188

पण तुम्हाला किड्यांची अपेक्षा असल्याने आपला पास.

मोदींजीवर तोंडसुख घेणार्यांना अजुन एक संधी !! फ्रांस मध्ये मोदीजींच स्वागत फ्रांसचे चांसलर मॅक्राॅंन यांनी घट्ट मिठी मारुन केल ते पहाण्या जोग होत ! त्यानंतर ट्रंप बरोबर झालेली मिटींग व त्यानंतरची प्रेस काॅंफेरेंस मध्ये मोदीजींचे ट्रंप बरोबरचे संबंध कसे आहेत हे सर्वांना दिसले !!

मीडिया ची विरोधी मते . विरोधी पक्षांची टीका न,वरिष्ठ सरकार किंवा नेत्यांची विरोधी टीका जो शांतपणे ऐकून निर्णय बदलत नाही तोच खरा नेता . फक्त त्याचे निर्णय जनहिताचे असवेत्त . आणि हे गुण मोदी मध्ये आहेत .म्हणून ते लाडके आहेत जनते चे

मी काय म्हणतो, ते भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यातून ' मोदी ' आहेत हा भाग तूर्तास बाजूला ठेवला तर एका भारतीयाला हे बहुमान मिळत आहेत याचा अभिमान वाटायला काय हरकत आहे?

खाडी देशातील राजकारणाचे यथार्थ समीकरण मांडले आहे तुम्ही. तरीही मला हेच वाटते की हा सर्व खटाटोप खनिज तेलाचे संभाव्य खरीददार पकडण्यासाठी चालले आहे. मागे एका धाग्यावर या अनुषंगाने आपली चर्चा झाली होती. चीन व भारत हे तेलाचे प्रचंड मोठे आयातदार आहेत. चीन अतिशय वेगाने विद्युत वाहनाच्या बांधणीकडे वाटचाल करत आहे. त्यांनी भविष्याकडे बघून जिथे लिथियमच्या खाणी आहेत तिथे गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना विद्युतवाहने भारताच्या तुलनेत पुष्कळ स्वस्त मिळतात. पण आता नवीन संशोधनानुसार सोडियमवर आधारित विद्युतघट चलनात येणार आहेत. त्यामुळे विद्युत गाड्याची किंमत पुष्कळ खाली येईल. नेमका हा बदल खाडी देशांच्या अर्थव्यवस्थेला मारक आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात प्रचंड गुंतवणूक करून आपले तेल खपवायचे हा खाडी देशांचा अग्रिम कार्यक्रम असेल. सौदी अरमाको देखील भारतात यायला हेच कारण असावे. दूसरे म्हणजे खनिज तेल खपवणे हा धंदा अमेरिका व युरोपला देखील फ़ायदेशीर आहे. जर भारताने आक्रमकरित्या विद्युत वाहने आणण्याचे ठरवले तर खाडी देशांची मोठी कुंचबना होईल. कारण फक्त भारतच नाही तर दक्षिण आशियतील देशदेखील तेलावरचे परालंबित्व कमी करतील. तर हे जे पुरस्कार आहेत ते तुम्ही खुश रहा आणि आमचा पिछवाडा सांभाळा असाच संदेश देतात. वेनेजुएला देशाने देखील भारताला स्वस्तात खनिज तेल देण्याची ऑफर दिली होती , पण त्यांना चलन वेनेजुएलाचे आभासी चलन आहे ते पाहिजे होते. मोदीनी निःसन्देह भारतासाठी भरीव कामगिरी केली आहे. पण खाडी देशासाठी अशी कोणती कामगिरी त्यांनी केली आहे की ज्याबद्दल त्यांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा?

In reply to by भंकस बाबा

भंकस बाबाजी, तुमचे म्हणणे बरोबर आहे पण परिपूर्ण नाही. हितसंबंधी सामरिक व व्यापारी समिकरणे आंतरराष्ट्रिय राजकारणात फार महत्वाची असतात, यात वाद नाही. पण, त्याचबरोबर व्यवहारात संतुलित, निष्पक्ष व न्याय्य विचार असणे आणि त्या विचारांचा कोणाला निष्कारण न दुखावता पण ठामपणे व सातत्याने पाठपुरावा करणे, हे फार कमी वेळा दिसते. हे जो करू शकतो इतरांच्या आदराचा धनी होतो. भारताची गेल्या सहाएक वर्षांची मुत्सद्देगिरी याच तत्वांवर चालू आहे आणि त्याची फळे वारंवार दिसत आहेत. खालील घटना पाहिल्या तर हे समजायला मदत होईल : युएनः १. युएनमधले गेल्या काही वर्षांचे निर्णय पाहिले तर, केवळ खाडी देशच नाही तर चीन आणि पाकिस्तान सोडून जगातले देश एक/बहुमताने भारताच्या बाजूने उभे राहताना दिसतात असेच दिसते. यापैकी, अनेक देशांचे भारताशी फारसे व्यापारी किंवा सांस्कृतिक संबंध नाहीत. २. यामुळे, पाकिस्तानचा "ऑल वेदर फ्रेंड" असलेल्या चीनलाही अनेकदा त्याची पाठराखण करणे कठीण होत आहे. उदा : अ) युएनमध्ये चीनने दीड-दोन वर्षे घातलेला खोडा सोडवून, अझर मसूदला अतिरेकी घोषित करणे. आ) पाकिस्तानची ३७० कलम रद्दबातल केले त्याबद्दलची तक्रार युएनच्या सुरक्षा समितीने १४-१ ने फेटाळणे. तो एक विरोधी देश चीन होता, हेवेसांन. इतकेच नव्हे तर, त्या बैठकीत युकेनेही विरोधी शेरा मारला अशी वावडी उठली होती, तेव्हा ब्रिटनने "आम्ही भारताविरुद्ध काहीही बोललो नाही" असे निवेदन केले. सुरक्षा समितीचा कायम सदस्य असलेल्या युकेने असे काही करणे काही वर्षांपूर्वी स्वप्नातही शक्य नव्हते ! किंबहुना, खाडी देश आणि चीनसकट सर्व राष्ट्रांनी ३७० आणि ३५अ रद्दबातल केल्याबद्दल भारताच्या विरुद्ध विधानही केलेले नाही. युके : युएनने स्थापन केलेल्या हेग मधील आंतरराष्ट्रिय न्यायालयात (International Court of Justice) काही महिन्यांपूर्वी दलविर भंडारी या भारतिय न्यायाधिशाची नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक न करता, त्यांच्या जागी Christopher Greenwood या ब्रिटिश न्यायाधिशाची नेमणूक करावी, यासाठी ब्रिटनने जोराचे प्रयत्न केले होते. पूर्वी, ब्रिटनने प्रयत्न करणे सोडाच, पण त्याने जाहीर केलेल्या उमेदवाराविरुद्ध कोणी उभे राहणेही अशक्य गोष्ट होती. निवडणूकीचा आग्रह घरला तर भारताचा उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होईल अशी खात्री झाल्याने, युकेने त्यांच्या उमेदवाराचे नाव मागे घेतले. युएसए : अमेरिकन प्रेसिडेंट ट्रंपचा काश्मिर प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न कसा उलटवला गेला, आणि त्याला भर पत्रकारपरिषदेत, "काश्मिर आमची द्विराष्ट्रिय समस्या आणि त्यासाठी आम्ही इतर कोणाला कष्ट देऊ इच्छित नाही (उर्फ, कीप युवर ब्लडी नोझ आउट ऑफ काश्मिर)" असे सांगितले. तरिही त्याच पत्रकारपरिषदेत ट्रंपचे विधान अश्या अर्थाचे होते, "मी मोदींचा चांगला मित्र आहे. त्यांनी काश्मिरमधील परिस्थिती ताब्यात आहे असे मला सांगितले आहे. भारत-पाकिस्तानने सहकार्याने त्यांच्या समस्या सोडवाव्या" ! वर दिलेल्या फक्त काही प्रातिनिधीक घटना आहेत. जालावर थोडेसे उत्खनन केले तर अशी अनेक उदाहरणे मिळतिल. अश्या घटनांतून जगभरचे देश बोध घेत असतात. जगातले आपले स्थान, पोकळ बोलबच्चनगिरी करून नाही तर, अश्या कृतींनी ठरते. अगदी बाळबोध शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की... १. जेव्हा एखादा देश आपल्या तत्वांवर ठाम राहतो आणि आपल्या बळावर सबळ देशांना त्यांचे मत बदलायला भाग पाडतो, तेव्हा सहाजिकच इतर देश त्याच्याकडे आदराने पाहतात. २. इतरांच्या दबावाला घाबरून आपली साथ सोडणार नाही आणि सबळ असला तरी आपला विश्वासघात करणार नाही, अश्या देशाशी संबंध ठेवायला इतरांना सुर्क्षित वाटते. अनेक दशके भारताची, "ताकदवान पण अत्यंत घाबरट आणि केवळ नितीमत्तेच्या पोकळ गप्पा मारणारा देश" अशी भारताची परगेशातली प्रतिमा होती, ती गेल्या काही वर्षांत, "ताकदवान आणि आपल्या नितिमान तत्वांवर खंबीरपणे उभा राहणारा विश्वासू देश" अशी झाली आहे. हे मी माझ्या २१+ वर्षांच्या आणि २४ देशांतल्या स्वानुभवांवरून आणि जगभरच्या मित्रांच्या बोलण्यावरून खात्रीने सांगू शकतो. ३. त्याविरुद्ध, पाकिस्तानने स्वत:ची छबी इतकी बिघडवून घेतली आहे की इतर मुस्लिम देशांना तो "अतिरेकी, अविश्वासू, अत्यंत धोकादायक आणि सुधारण्यापलिकडे गेलेला धर्मबंधू" वाटत आहे. वेळ आली तर पाकिस्तान आपल्याला विकायला कमी करणार नाही पण भारत आपल्या हक्कांच्या बाजूने उभा राहील, अशी भावना खाडी देशांत निर्माण झाली आहे. ही वस्तूस्थिती पाहता त्या देशांनी भारताच्या बाजूला झुकणे सहाजिक आहे. आता थोडे खनिज तेलाबद्दल... खनिज तेल ही भारताची मोठी गरज असली आणि त्या व्यापारातला हिस्सा काबीज करण्यासाठी अनेक देशांची चढाओढ असली तरीही... १. खाडी देश जवळ असल्याने त्यांच्याकडून तेल विकत घेणेच भारताला सोईचे आणि कमी खर्चाचे आहे. २. भारतिय तेलशुद्धिकरण प्रणाली (रिफायनरी) मुख्यतः खाडी देशातून मिळणार्‍या तेलासाठी तयार केलेल्या आहेत. इतर ठिकाणचे वेगळे तेल घेतल्यास त्यांच्यामध्ये खार्चिक बदल करावे लागतिल. तेव्हा खाडी देशांकडून तेल विकत घेणेच भारताला सोईचे आणि कमी खर्चाचे आहे. तेव्हा, तेलाच्या बाबतीत भारताची खाडी देशांना जितकी गरज आहे तेवढीच भारताला त्यांची गरज आहे. आंतरराष्ट्रिय राजकारणातील मैत्रीसाठी कळीचा नियम : एखाद्या परिस्थितीत, (अ) ज्या देशाशी मैत्रीचे संबंध ठेवण्याने आपल्या देशाचे हितसंबंध राखले जातात, आणि/किंवा (आ) ज्या देशाशी मैत्रीचे संबंध न ठेवल्याने आपल्या देशाचे हितसंबंध धोक्यात येतात; तो प्रत्येक देश, त्या परिस्थितीत, आपला मित्र असतो... आपल्या देशाचे हितसंबंध सर्वतोपरी असतात, परिस्थिती बदलल्यास मित्र बदलू शकतात. पूर्णविराम.

In reply to by रुस्तम

नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला ? जरा इस्काटून सांगतो... १. भारतिय न्यायाधिशाची... दलबिर भंडारी सन १९९१ पासून दिल्ली हाय कोर्टात न्यायाधिश होते, २००४ मध्ये ते बॉम्बे हाय कोर्टाचे सरन्यायाधिश झाले आणि २००५ मध्ये सर्वोच्च न्यायलायात न्यायाधिश झाले. हेगच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमधील न्यायाधिश हे, त्यांच्या मायदेशाने सुचवलेले अधिकृत उमेदवार असतात. रिकाम्या जागांपेक्षा जास्त उमेदवार सुचवले गेल्यास, न्यायाधिशांची निवड युएनमधील सर्व देशांच्या मतदानाने होते. २. ...नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक दलबिर भंडारी यांची इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमधील प्रथम नेमणूक २०१२ मध्ये झाली. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर, २०१७ मध्ये भारताने त्यांचे नाव परत सुचवले... अर्थातच, २०१७ मध्ये त्यांची पुनर्नेमणूक (पक्षी : परत एकदा नेमणूक) झाली..

पण खाडी देशासाठी अशी कोणती कामगिरी त्यांनी केली आहे की ज्याबद्दल त्यांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा? https://www.business-standard.com/article/economy-policy/aramco-adnoc-i… https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/abu-dhabi-… https://www.business-standard.com/article/news-ians/india-bullish-on-st… खाडी देशांना आपले अतिरिक्त क्रूड ऑइल साठवण्यासाठी स्वतःच्या देशाबाहेर एखादी सुरक्षित जागा हवी होती. कारण देशांतर्गत उलथापालथ झाली/ राजगादी गेली किंवा युद्धमन स्थिती झाली तरी अशी ठेव ठेवणारा देश म्हणून भारत त्यांना सुरक्षित वाटतो त्यातून भारत रशिया अमेरिका चीन सारख्या दुसऱ्यांच्या उठाठेवी करीत नाही म्हणून भारताबरोबर मैत्री हवी असते.

खनिज तेलाचे साठे भविष्यात संपणार आहेत . पृथ्वी वरील घडामोडी मुळे जे खनिज तेलाचे साठे भूगर्भात निर्माण झाले ती निर्मिती आता थांबली आहे . आखाती देशांमध्ये सुद्धा ह्याची जाणीव आहे आणि त्या नुसार ते पुढे काय करायचे ह्या वर नक्कीच नियोजन करत असतील . दुबई चे उदाहरण घेतले तर लक्षात येईल . दुबई आता तेला च्या उत्पादनावर अवलंबून नाही . आखाती deshani भारताला पाठिंबा देण्या मागे खूप कारण असू शकतात . धार्मिक कट्टरवादी देशात शिरजोर झाले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते आणि अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडतो ते वेगळं . बाकी देश सुद्धा अशा देशांशी संबंध ठेवायला कचरतात .. त्या मुळेच आखाती देश पाकिस्तान च्या जास्त जवळ जावू इच्छित नाहीत . युरोपियन देशाशी मैत्री आणि भारता सारख्या देशाला न दुखावणे हेच त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य आहे

In reply to by Rajesh188

तुम्ही नक्की डु आयडी नाही ना? कधीकधी इतके सखोल बोलता की एखादी वर्षनुवर्षे अभ्यास करत असलेली अनुभवी व्यक्ती बोलते आहे असे वाटते आणि कधी असले बाळबोध प्रश्न विचारता की तुमचा संगणक / मोबाइल फोडुन टाकावासा वाटतो.

In reply to by आनन्दा

एकदा तुम्ही डू आयडी, मल्टिपल आयडी, बहुटोपणनावे अशा किंदम ऋषीप्रवृत्तीवर लिहा ना!

भारताच्या वतीने मोदींकडुनही इतर राष्ट्र प्रमुखांना दिल्लीत बोलवून पुरस्कार द्यावयास हवेत. त्या त्या नेत्यांचे चहाते प्रसन्न झाले तर परस्पर संबध मजबुत होण्यास हातभार लागतो. मी पण माझ्या घरी कुणाला तरी बोलवून सत्कार करावयास हवा आहे. चला लागतो कामाला सत्काराच्या ( व्यक्ती पुजक नसल्याने असे काही लिहितो म्हणजे व्यक्ति द्वेष करतो असा नव्हे त्यामुळे ह. घ्या. हेवेसानल)

भारत सुद्धा असे पुरस्कार विविध लोकांना देत असतो त्यावर खोचक टिप्पणी अनावश्यक आहे असे वाटते. एक उदा. https://www.financialexpress.com/india-news/padma-awards-for-16-under-n…

श्री नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफार खान याना भारतरत्न हा पुरस्कार दिल्याचे स्मरते. इस्माईल कमर गिली या जिबूती च्या राष्ट्राध्यक्षांना या वर्षीचा पदमविभूषण हा पुरस्कार दिला गेला आहे. He was awarded with the Padma Vibhushan, India's second highest civilian award on 25 January 2019 for his role in the safe evacuation of Indian citizens from Yemen.

यात नॉर्मन बोरलॉग, होसई नोरोटा , जॉन गालब्रेथ, व्हॉल्टर सिसुलु , राजे जिग्मे वांगचुक इ महान लोकांना पण पदमविभूषण दिले गेलेले आहे