दगडूचे अभिनंदन!
पावसाने घेतलेल्या सुट्टीमुळे महाराष्ट्रवासीयांवर जे संकट ओढवले होते, त्यातून आपण आता पुरते सावरलो आहोत. नद्या,धरणे भरुन वाहत आहेत. शेतकर्यांनीही आत्महत्यांचे बेत पुढे ढकलले आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही प्यायला आणि धुवायला(कपडे, गाड्या वगैरे...) पाणी पुरत नव्हते.
नको तेव्हा धो-धो बरसणारा पाऊस कुठे दडी मारुन बसलाय हेच कलत नव्हते.
अशावेळी आमच्या दगडूने( आमच्या नंदीबैलाचे नाव) "पाऊस पडेल काय?" या प्रश्नाला मान हलवून 'हो' असे उत्तर दिले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दगडूने कौल दिल्यावर आम्ही निश्चिंत झालो कारण आमच्या दगडूवर आमची फार श्रद्धा आहे.
मिसळपाव
...तरीही "भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या "ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन् थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला.
""काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी?'' वेताळानं विचारलं.
विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला.
वेताळ आणखी कावला. म्हणाला, ""बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता.