Skip to main content

महाप्रयोग बिग बॅंग (सौजन्य : साप्ताहिक सकाळ, लेखक : डॉ. पंडित विद्यासागर )

लेखक नाम्या झंगाट यांनी सोमवार, 22/09/2008 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
एक चांगला लेख मिपावर दिल्याबद्दल आभार परंतु हे लेखन मिपाच्या धोरणात बसत नाही म्हणून नाईलाजाने येथून काढावे लागले. कृपया सहकार्य करा. जमल्यास सकाळमधल्या डॉ विद्यासागरांच्या लेखाचा दुवा येथे द्यावा.. आणिबाणीचा शासनकर्ता.

६ ओळीत बाबुजी

लेखक मंदार धारप यांनी सोमवार, 22/09/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मामांनी म्हणजे श्री.अशोक गोडबोले ह्यांनी केलेली कविता. प्रत्येक ओळीचे पहिले अक्शर जोडले की सुधीर फडके हे नाव बनते. सुरात सात गात गात विहरला जगी विहंग धीर रंगवी रणात जीवनसमिधा अभंग रसपावन रामकथागान करी अजरामर फलमंगल यशयुत नवजीवन हो शिवसुंदर डमरू वाजे दिगंत विजयाचे सामगान केवळ मम शब्दचि रे तव मधुरालाप तान मंदार

गणेशोत्सव जपानमधला भाग -२

लेखक गणा मास्तर यांनी सोमवार, 22/09/2008 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागे तोक्योतील गणेशोत्सवाची काही छायाचित्रे इथे डकवली होती, पण क्रमशः लिहायला विसरलो. मिपाच्या समृद्ध क्रमशः परंपरेचा पाईक होण्यासाठी हा पुढचा भाग तोक्यो मराठी मंडळ गेल्या काही वर्षांपासुन तोक्योमध्ये गणेशोत्सव साजरा करते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतातुन एखाद्या कलाकाराला आमंत्रित करुन कलास्वाद घेण्याची अपूर्व संधी दर वर्षी उपलब्ध करुन देते. या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त सध्याचे लोकप्रिय कवी संदीप खरे यांच्या कवितांचा ' सरीवर सर' हा कार्यक्रम अनंत चतुर्दशीच्या दिवशी आयोजित करण्यात आला होता.

क्षितीज (कविता)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 22/09/2008 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
दूर क्षितीजावर सूर्य ढगात लपला केशराची रांगोळी नभी फ़ेकून चालला उंच उडते पाखरू पाही रंगांची लीला सय ये पिल्लाची प्राण पंखात आला आकाशी केशर मंद किरमिजी झाले उडणारे पाखरु पंख मारून थकले दाटला अंधार दोन ठिपक्यांचे डोळे पाही मनात पिल्लू दूर घरी थांबले घरट्यात भुकेले मूक घाबरून शुष्क चोंच आं वासून वासून मी आणिला न दाणा शोधून पिल्लू बघे बाहेर आससून चित्र मनोहारी ह्या क्षीतिजी राही दाद जग देई पाखरू त्राही त्राही बेरंगी रंगातून कसे भूक साही दूर क्षीतिजी पिलू वाट पाही भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद नको ते क्षीतिज नको ते मंदरंग भुकी जीवाला एक घासही उदंड

मैत्रीचं नातं

लेखक सन्दिपरे यांनी सोमवार, 22/09/2008 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई वडिल, भाऊ-बहिण यांशिवाय एक नातं असतं मित्रत्वाचं जीवाभावाच्या मैत्रीचं. झाडाला स्थिरावण्यासाठी गरज असते मुळांची समाजात जगण्यासाठी गरज असते खर्‍या मित्राची. मुळाच्या आधारावरच वृक्ष विस्तारतो विश्वासाच्या आधारावरच मैत्री विस्तारते. असंच नातं प्रत्येकानं जपावं मायभूमीचं नवं रूप साकारावं. विश्वासाचं ते नातं गळ्यातलं ताईत बनतं मात्र केवळ विश्वासघातामुळे फाशीचा ते दोर बनतं. आता
Taxonomy upgrade extras

संवेदना

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 22/09/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?' 'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय.

थॅन्क्स बट नो थॅन्क्स

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 21/09/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर फिरताना दिसले.मला बघून खूष झाले. मला म्हणाले, " खूप दिवसानी दिसला तुम्हाला बघून बरं वाटलं." मी पण त्याना म्हणालो, "भाऊसाहेब,मला पण तुम्हाला बघून खूप आनंद झाला" मी पुढे त्यांना म्हणालो, "तुमचा चेहरा जरा उतरलेला दिसतो,बरं आहे ना तुम्हाला?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "आता बरं काय आणि वाईट काय जो जातो तो दिवस आपला.सकाळी उठल्यावर जर का प्रकृतीने काही कुरकुर केली नाही की समजावं खाही खरं नाही.पण ते जाऊ दे तुमची कविता काय म्हणते?