Skip to main content

नाडी भविष्य - एक चिकित्सा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 20/09/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकातील काही भाग अवलोकनासाठी ठेवत आहे. चर्चा जरुर व्हावी. वस्तुत: हा विषय किती प्राधान्य क्रमावर असावा ?

नाशिक येथे महापुर

लेखक मिंटी यांनी शनिवार, 20/09/2008 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर.... आज सकाळी मिपावर काथ्याकुट मधे विकास यांचा "पाणीच पाणी चहुकडे" हा लेख वाचला. त्यानंतर ई-सकाळवर नजर फिरवताना या संदर्भात आणखी माहिती मिळाली. या संदर्भातील आणखी माहिती आणि छायाचित्रे इथे टाकत आहे. (स्त्रोत - ई-सकाळ) मिपाच्या नियमांमधे हे बसत नसेल तर हा लेख उडवावा ही तात्यांना नम्र विनंती. सविस्तर माहिती - http://www.esakal.com/esakal/09202008/SpecialnewsEDDB762911.htm पुरपरिस्थिची छायाचित्रे -

दिल्लीमधे दोन दहशदवाद्यांना कंठस्नान

लेखक चंबा मुतनाळ यांनी शनिवार, 20/09/2008 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म.टा. मध्ये ही बातमी वाचली. ह्या एनकाऊंटर बद्दल दिल्ली पोलिसांचे कौतूक केले पाहिजे वगैरे ठीक आहे, परंतु इंस्पेक्टर मोहनचंद्र शर्माला शहीद मानने कितपत ठिक आहे? ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते! जर दहशदवाद्यांशी लढायला जाताना पुरेसा संरक्षक पेहेराव केला नसला तर दोष कुणाचा? दहशदवाद्यांचा नक्कीच नाही! बातमीत म्हटल्याप्रमाणे अतिरेक्यांकडून ८ गोळ्या झाडण्यात आल्या त्यातल्या तीन गोळ्या इं. शर्मांना लागल्या. दुसरी बाब म्हणजे, जो अतिरेकी पोलिसांच्या हातात जिवंत सापडला, तो योगायोगाने आजमगड जिल्ह्यातील समाजवादी पार्टीच्या उपाध्यक्षाचा मुलगा आहे!

म्हणी रिमिक्स! :)

लेखक भाग्यश्री यांनी शनिवार, 20/09/2008 05:53 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो सगळे मिपाकर ! अभिजितचा म्हणींचा धागा भलताच लोकप्रिय ठरला .. त्यावरून हा खेळ आठवला.. एका संस्थळावर पाहीला होता.. या खेळात, दोन वेगळ्या म्हणी एकत्र करायच्या आहेत.. :) उदा... हातच्या कंकणाला खळखळाट फार.. ! :) असेल हरी तर जमतील भुते..! :) चला, येऊद्या अजुन विनोदी म्हणी! :)

पाऊस - बालगीत

लेखक भास्कर केन्डे यांनी शनिवार, 20/09/2008 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी... सर सर सर वारा सुटला काळ्या ढगांना घेऊन आला|| रिमझिम रिमझिम पाऊस आला इंद्रधनुष्य खुलवू लागला || वीज कडाडली कड कड कड थेंबे बरसली टप टप टप|| झाडे वेली फुलपाखरे आनंदली पशु पाखरे || धरतीचा हा सुगंध आला आसमंती दरवळू लागला || धरती माता आनंदली खुदू खुदू हसू लागली || --कु. प्राजक्ता वांजरखेडकर, अंबाजोगाई, इयत्ता ६वी
Taxonomy upgrade extras

प्राजुच्या कल्पनेचा विस्तार !

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 20/09/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेची पार्श्वभूमी: काल संध्याकाळी प्राजुशी फोनवर बोलताना तिने सहज एक ओळ सांगितली. ती ओळ अशी -- हृदयात सागराच्या फेसाळती लाटा प्राजु म्हणाली, "बघ, तुला ह्या ओळींवर पुढे काही करता येतं का? गझल, कविता काहीही !" नंतर रात्रीपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेला होता. असं म्हणतात आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं सुप्त मन जागंच असतं. पहाटे तीन-साडेतीनला झोप चाळवली गेली तेव्हा दुसरी ओळ सुचली. अर्धवट झोप, अर्धवट जाग अशा अवस्थेत कधीतरी डोक्यात बहुतेक कवितेचा आकृतिबंध आला.
Taxonomy upgrade extras

पाणीच पाणी चोहीकडे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 19/09/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच म.टा. आणि सकाळ मधे वाचले त्याप्रमाणे नाशिकमध्ये महापूर आला आहे आणि पुण्यासकट महाराष्ट्रात इतरत्रही पावसाच्या पाण्याने पूरसदृश्य परीस्थिती झाली आहे... काही ठळक माहीती (वास्तवीक सगळेच ठळक आहे पण...)अशी:
  1. पुराच्या पाण्यामुळे गोदावरीकाठी असलेल्या प्रसिद्‌ध नारोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाली आहे.

ऋषी आणि लांडगा... :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 19/09/2008 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो, कृपया हे वाचा! वरील दुव्यातली कथा वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार येथे नोंदवत आहे. आपल्याही मनातले विचार इथे नोंदवून हा धागा अंमळ मजेशीर करा ही विनंती.. :) माझ्या मनातले विचार - १) हा ऋषी चक्क थापा मारतो आहे. "माझ्यावर लांडग्याने उडी मारली तरी मी कसा शूर! अन् मी कसा वाचलो आणि पर्यायाने तो लांडगा माझं काहीच वाकडं करू शकला नाही.." हेच त्या ऋषीला, सॉरी! गोसावड्याला भासवायचं असावं! :) २) जर ही ष्टोरी खरी असेल तर त्या ष्टोरीत लांडग्याच्या ऐवजी एखादा जबरदस्त भुकेला पट्टेरी वाघ असता तर किती बरं झालं असतं!

"हपापाचो माल गपापा"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 19/09/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
ते दूसऱ्या महायुद्धाचे दिवस होते.आपला देश पण त्याने पोळून गेला होता.खायला अन्न नाही तांदूळ, गहू,साखर, केरोसीन सर्व आवश्यक वस्तू रेशनींगवर मिळायच्या आणि जादा हवा असल्यास काळ्या बाजारात मिळायचं.त्याला "ब्लॅक" मधे म्हणण्याचा जास्त प्रघात होता. वेगुर्ला मार्केटच्या समोर एक किराण्या मालाचं दुकान होतं.वखार वजा किराण्या मालाचं ते दुकान होतं.त्या दुकानाच्या मालकाचं नाव होतं दादा कुळकर.आपण त्याना दादा म्हणुया. दादा एक ठुसक्या उंचीची, काळी कुट्ट रंगाची, बेळगावला अशा वर्णनाच्याव्यक्तीला"वड्डर" म्हणून संभोधतील,अशी, आणि कर्कश आवाजाची व्यक्ती होती. दुकानाच्या गल्ल्यावर बसल्यावर पैशाच्या पेटीतल्या मोडीला

(खायचे आहे कुठे?)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/09/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल! काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे? चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?... ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?... दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो?