Skip to main content

भारतामधील दहशतवाद - एका नवीन वळणावर....

लेखक नाम्या झंगाट यांनी शुक्रवार, 07/11/2008 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी मालेगाव मधील बॉम्बस्फोटमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक कबुली दिल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3684027.cms भारतामधील दहशतवाद एका नवीन वळणावर येऊन ठेपला आहे. या बाबत आपल्याला काय वाटते???

बरेच काही..!

लेखक उपटसुंभ यांनी शुक्रवार, 07/11/2008 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आठवशिल तर आठवेलसे बरेच काही. अजुनी आहे राहिले तसे बरेच काही. मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला, ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही.. क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला. निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही.. तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो. घडले आहे जागवेलसे बरेच काही.. जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो. श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही.. आज किनारी उरलेले वेचण्यास आलो, वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

(चकणा )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 07/11/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
(चकणा ) उमाकांत काणेकर यांचे गीत असलेली , शोभा गुर्टू यांच्या आवाजातील एक अप्रतिम गझल ' उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या ' याचे हे विडंबन त्यांची माफी मागून -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मिळता पुन्हा सगळा चकणा बशीतला दिसती मम डोळ्यांना मदिरा पेल्यातल्या घेऊ कशी नुसती घशात जळजळे सुरवात करताना, चकल्या पुढातल्या निघता वलय ओठी, हळुवार सिगारचे मिळतात त्या अजुनी शेंगा भाजलेल्या पिऊनिया उरावी, ती भुक लागलेली तू विसरलास होत्या नोटा खिशातल्या ----------------------
Taxonomy upgrade extras

शतकांच्या बाद्शहाला सलाम

लेखक वासुनाना आले यांनी शुक्रवार, 07/11/2008 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर भारतिय क्रिकेटचा खंदा आधरस्तंभ तितकाच नम्र विनयशील आणी सच्चा खेळाडु तो जितका खेळाडु म्हनुन श्रेष्ठ तितकाच एक व्यक्ती म्हनुन ही श्रेष्ठ आहे याच सचिनने आपल्या कारर्किदीतील प्रतेक शतकांमधे कोनाचा ना कोनाचा हात आहे असे सांगुन त्यांना धन्यवाद दिले म्हनुनच मटा च्या बातमीचा संर्दभ यथे देत आहे नारंगी नागपुरात सचिनच्या गुलाबी शतकाचा साज चढला आणि जामठा गावचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम पावन झाले!

तुम्हाला काय वाटते?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 07/11/2008 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता म.टा. चाळत असताना "महाराष्ट्राबाहेर एकही परीक्षा जाऊ देणार नाही!" ही बातमी वाचण्यात आली. हे उद्गार अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे आहेत :-) बाकी त्यांचे राजकारण अथवा राज्य चालवण्याची पद्धत (?) मला मान्य नसली तरी त्यांचे हे वाक्य कुठेतरी पटले: "महाराष्ट्रात मध्यंतरी परप्रांतियांना मारहाण झाली, अनेक उद्योग बंद पडले. पण, ते सुरू करण्यासाठी स्थानिक कामगार मिळाले नाहीत. आमचा मराठी माणूस ती कामे करण्यास तयार नाही!

रगडा पॅटीस

लेखक आकांक्षा यांनी शुक्रवार, 07/11/2008 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः (२ जणांसाठी) पॅटीस करिता :३ उकडलेले बटाटे, हळद, मीठ, रवा. रगडया करिता : २ वाटया उकडलेला हिरवा वाटाणा, १ मोठा टोमॅटो, १ मोठा कांदा, बारिक केलेला आल - लसुण (अंदाजे), मीठ, फोडणी साहित्य, तेल, लिंबाचा रस (आवडीनुसार), चिंच खजुर चट्णी, दही. सजावटीसाठी: बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि बारिक शेव. कृति: प्रथम बटाटे कुसकरुन घ्यावे. त्यात मीठ, हळद घालावे व मळून घ्यावे. उभे चप्पट असा आकार देऊन कटलेट सारखे बनवुन घ्यावे. कढई मध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाका, तडतडली की त्यात कांदा टाका, गुलाबी झाला की बारिक केलेल आल लसुण टाका, मग टोमॅटो टाका. थोड परतुन घ्या.

बिहार-१.

लेखक कलंत्री यांनी गुरुवार, 06/11/2008 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बिहार या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. आजवर बिहारच्या संदर्भात असलेल्या माहितीचे आदान प्रदान व्हावे या हेतुने हा लेख प्रपंच करत आहे. माहितीत त्रुटी असेल तर ती कळविणे / दुरुस्त करणे. (स्वैर विचार मंथन आहे.) १.भारत आणि पाकिस्तान यात काय साम्य आहे असे जर विचारले तर अनेक साम्यस्थळांपैकी एक साधर्म्य म्हणजे बिहारीची या देशात समान असलेली स्थिती. स्वातंत्र्यपूर्व काळात अंदाजे १० लाख बिहारी मुसलमान पाकिस्तान मध्ये विस्थापित झाले. तेथील स्थानिक जनतेने त्यांना मुजाहिद ( परके) असा ठप्पा लावला आणि पंजाबी, सिंधी, बलुची आणि पठाणी लोकांनी त्याना कधीही आपलेसे केले नाही.

तर तुम्ही काय निवडाल????

लेखक उम्मि यांनी गुरुवार, 06/11/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
अस समजा कि सध्या तुम्हि खाजगी नोकरी (खालिलप्रमाणे) करत आहात, आणि अचानक तुमच्याकडे सन्धि चालुन आलिय ति सरकारी नोकरीचि.......... अटी: सरकारी नोकरी पगार----१८०००/- कामाची वेळ ----- ८ तास कि खाजगी नोकरी पगार----२५०००/- कामाची वेळ ----- १० ते १२ तास तुम्हि या २ पर्यायापैकि कोनता निवडाल ? आणि का ??????? आपला लाडका, उम्मि.