लेखकअमोल केळकरयांनी गुरुवार, 08/01/2009 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
~X( ( ६४ कलेत पारंगत )
अविनाश साहेबांनी दिलेल्या पारंपारिक ६४ कलांची माहिती मिळाली.
आणि आधुनिक कला काय असाव्यात याबाबत विचार केला. कृ. ह. घ्या.
आपल्याला काही यात बदल वाटल्यास अवश्य सुचवा .
लेखकआपला अभिजितयांनी गुरुवार, 08/01/2009 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बापाला अखेर आमची आवड कळली म्हणायची!
च्यायला! गेले एक-दीड वर्षं नुसता छळवाद मांडला होता मेल्यानं! याची हौस नि मला निष्कारण सजा!! आताशा कुठे रुळावर आलाय.
कशाबद्दल बोलतेय, कळलं नाही का? अर्थात आमचा बाप नि त्याचं पिक्चरचं वेड! कळायला लागल्यापासून याव्यतिरिक्त कुठलंही काम निष्ठेनं केलं नसेल त्यानं. पिक्चर म्हणजे जीव की प्राण! कुठल्याही मळ्यात असो वा एखाद्या मित्राच्या खुराड्यात...पंचरंगी महालात असो वा शेणा-मुताच्या वासात...पिक्चर बघणं सोडलं नाही. अगदी शिरीष कणेकर चावले होते म्हणा ना!
लेखकsanjubabaयांनी गुरुवार, 08/01/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
१) आत्मपरीक्षण करताना
काही दोष राहून गेले असतील....
माझ्या स्वार्थ आ सोबत
काही चुका वाहून गेल्या असतील.....
२) आनंदाचे आज मजला
भरते आले असे.......
समजत होतो ज्याना वाघ
ते निघाले ससे.......
३) देवा किती तारे आहेत
तुझ्या आकाशात......
इतके तर नसतील च
जितक्या आकां शा माझ्या मनात........
४) जाणून बुजून झालेला
माझा जन्म भ्रमात गेला.....
वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून
माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला.......
५) कधी कधी जीवनातही
बेभान व्हावे लागते......
दु:खाचे काटे टोचाताना
खळ्खळुन हसावे लागते......
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी गुरुवार, 08/01/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
६४ कलेत पारंगत
हिंदु संस्कृतित काम शास्त्रा ला अन्यनसाधारण मह्त्व होते, आहे.
काम शास्त्रा च्या नियमाप्रमाणे,कुमारीकेस,खालील
६४ कलेत पारंगत असण्याची आवश्यकता सांगीतली आहे,
ह्या कला तिने स्वतः गुप्त पणें अभ्यास करुन शीकायच्या व आत्मसात करावयच्या शिकवण्यासाठी खालिल पैकि शिक्षिकेचि नियुक्ती केली जायची.
लेखकविनायक पाचलगयांनी गुरुवार, 08/01/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो,
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दुसरा लेख.....
(सुचना- या लेखात जेथे जेथे इश्वरवाद हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी नास्तिकानी निसर्गवाद हा शब्द वाचावा कारण तो मुद्दा फक्त त्याच द्रुष्टीने घेतला असुन त्याचा कोणत्याही धार्मीक भावनेशी काडीमात्र संबंध नाही.)
समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
आज एकूणच मानवजात, समाज एका विशिष्ठ परिस्थितीस येऊन पोहोचला आहे. आज, समाजाला निर्णय घ्यायची गरज आहे. गेली 10-15 वर्षे, विशेषत: गेली 3-4 वर्षे समाज विविध विचारप्रवाहांमध्ये अडकलेला आहे.
लेखकचिन्या१९८५यांनी गुरुवार, 08/01/2009 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी"
केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालव