Skip to main content

सारे भारतीय माझे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 25/09/2009 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय उपखंडाच्या बाबतीत साधारणतः १९व्या शतकापासून एक विधान केले गेले आहे की येथे दक्षिणेत द्रवीड नामक समाज होता आणि उत्तरेत युरोप आणि इतर ठिकाणाहून आर्य आले त्यांची वसाहत वाढली आणि बघता बघता त्यांची भाषा आणि संस्कृती यांनी देश व्यापला गेला. मॅक्समुल्लरशी झालेल्या वैचारीक देवाणघेवाणीतून लोकमान्य टिळकांचा आणि त्यानंतर बहुतांशी अनेक विचारवंतांचा असाच समज झाला होता की आर्य आणि पर्यायाने संस्कृत देशाबाहेरून आली आहे वगैरे... कालांतराने दोन गट पडले एक आर्य-द्रविड असा भेद मानणारा. दक्षिणेत या भेदामुळे एकेकाळी देशातून फुटून जाण्याची भाषा पण होती. अजूनही स्वतःचे वेगळे पण सांगितले जातेच.

गॅरी आणि मी

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 25/09/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी राहातो ठाण्याला. तो राहतो साउथ अफ्रिकेला. सध्या जरी कोच म्हणुन भारतिय क्रिकेट बरोबर असतो. मला क्रिकेटपटु मधे स्वारस्य नाही. मी क्रिकेट फारसे बघत नाही. क्रिकेट थोडेफार कळते. वर्ल्ड कप जिंकल्यावर( २ दा) सगळ्या भारतियांप्रमाणे मला सुद्धा आनंद झाला होता. जिंकल्यावर टी.वी वर हायपर होणारे (धोनी के धुरंदर वैग्रे)आणि हरल्यावर देश पार धुळीला मिळाल्यागत अश्रुपतन करणारे टी.वी चे बातमीदार मला अस्वस्थ करतात. एकंदरीत क्रिकेट बरोबर फारसे सख्य नाही. सध्याच्या दिनचर्येत वर्तमानपत्राला स्थान नाही. संध्याकाळी वाचण्यात अर्थ नाही. टी.वी.

कुलंग... जेथे आकाश ठेंगणे वाटते...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 25/09/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या विकऐंडला कुलंगला जायचा बेत आहे... येतोस का?" असा राहुलदादाचा SMS आला... खूप दिवसांपासून मला कुलंगला जायच होतं... कळसुबाईच्या कुशीत अलंग, मदन आणि कुलंग विसावले आहेत... इगतपुरीच्या परिसरात अजीबात भटकलो नव्हतो... तिकडच्या डोंगररांगा जरा वेगळ्याच आहेत... आकाश सुद्धा ठेंगण वाटावं असे उंच डोंगर आहेत... मग शुक्रवारचं काम संपवून मी बदलापुरला राहुलदादा कडे पोचलो... रात्री सगळी तयारी करुन झोपी गेलो... पहाटे ५.४६ च्या लोकलने कल्याणला पोचलो आणि मग कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधे चढलो... राहूलदादा, अरुण सर, निलीमा मँडम, अवळे सर आणि मी असे आम्ही पाचजण कुलंगला चाललो होतो...

torrents

लेखक अभिजा यांनी शुक्रवार, 25/09/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोणती टोरेन्ट्स साईट चांगली आहे? मी पूर्वी देसीटोर्रेन्ट्स.कॉम चा सभासद होतो. मला वाटत्तं की ती साईट आता पेड साईट आहे. कोणी खुलासा करू शकेल काय? धन्यवाद!

ती ...

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 25/09/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एकदा, मला ती दिसली बरीचशी माझ्यासारखी ..... पण तरीही खूप वेगळी तिला विचारलं मी, कुठून आलीस? आणि आता कुठे चाललीस?

रान

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 25/09/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास जळला मोहर, झडली पालवी, दिसे रिता, पर्णहीन तो भकास विषवल्ली तरारली, फोफावली, वाढत चालली; वेढत चालली घनदाट गर्द हिरव्या रानाला, एकेका वृक्षाची गिळत सावली रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान घोंघावतो वारा एकटा बेभान उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे फांदीफांदीवर भुतांचे थैमान क्षणात अवघे चित्र पालटेल वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा, पुन्हा रानात या गारवा दाटेल मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव
काव्यरस

आईचा गोंधळ घालते आईचा जोगवा मागते हे गाणे हवे आहे..

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 25/09/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आईचा गोंधळ घालते आईचा जोगवा मागते हे उषाताईंचे विस्णुदासांचे गाणे ताबड्तोब/ लौकर हवे आहे. कुणाकडे mp3 असल्यास माझ्या आईच्या इ मेल आयडी s.phadnis217@gmail.com वर पाठवाल का???