सारे भारतीय माझे...
भारतीय उपखंडाच्या बाबतीत साधारणतः १९व्या शतकापासून एक विधान केले गेले आहे की येथे दक्षिणेत द्रवीड नामक समाज होता आणि उत्तरेत युरोप आणि इतर ठिकाणाहून आर्य आले त्यांची वसाहत वाढली आणि बघता बघता त्यांची भाषा आणि संस्कृती यांनी देश व्यापला गेला. मॅक्समुल्लरशी झालेल्या वैचारीक देवाणघेवाणीतून लोकमान्य टिळकांचा आणि त्यानंतर बहुतांशी अनेक विचारवंतांचा असाच समज झाला होता की आर्य आणि पर्यायाने संस्कृत देशाबाहेरून आली आहे वगैरे...
कालांतराने दोन गट पडले एक आर्य-द्रविड असा भेद मानणारा. दक्षिणेत या भेदामुळे एकेकाळी देशातून फुटून जाण्याची भाषा पण होती. अजूनही स्वतःचे वेगळे पण सांगितले जातेच.
मिसळपाव