Skip to main content

(केवढे चावणे हे गजल दरगजल)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 06/04/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली जालावर वावरताना असं लक्षात येतं की गजलांचा आणि शायरांचा सुकाळ झालाय! अरे काय असतात एकेक गजला! आजच एक 'गजल' मला चावली आणि मग कळवळलोच.... केवढे चावणे हे गजल दरगजल... काय जाणे कुणी मारली ही मजल! मी कितीदातरी नाडि ओढायचो अन तुमानीमधे व्हायचे मग बदल काय दुर्भिक्ष हे कल्पना आटल्या... का अशी देत आहेस घंटी डबल? जाम हैराण मी जाहलो याइथे जो उठे तो म्हणे मी नवाबे गझल फासतो आज कोणी ... उद्या वेगळा का 'मनोगत' विकल 'मायबोली' विकल? आज सैलावल्यासारखे वाटते पापडांच्यामधे एक चपटी तरल मेंढरासारखी मेंबरे कावली हाण तू, हाण तू, हाण 'रंगा' बुकल चतुरंग
काव्यरस

भगवंत दयाळू आहे.. न्यु प्रिंट संचित

लेखक shaileh vasudeo pathak यांनी मंगळवार, 06/04/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
भगवंत दयाळू आहे... लहानपणी चांदोबा नावाचे एक मासिक(कदाचित पाक्षिक असेल...) यायचे त्यात एक कथा होती,कोणी एक लहान मुलगा सतत असे म्हणतो, भगवंत दयाळू आहे.एकदा तो आपल्या आई-वडीलां सोबत फ़िरायला गेला असतो.. अचानक बाहेरील काही दृष्य पाहुन तो गाडी थांबावतो आणि पळत सुटतो.. येथे पुढे गेलो तर एक मंदिर आहे.. मंदिरात मी राहत होतो..देवाची पुजा व साधना करत होतो अचानक मृत्यु आला..वै...मग तेथील लोक त्याला तेथेच राहायला सांगतात.तो आपली साधना पुन्हा सुरु करतो....भगवंत दयाळू आहे इ..कथा पुर्वजन्म या गोष्टीशी निगडीत होती. आता उरलो उपकारा पुरता..

एक फिरकी अशीही!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 06/04/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कोणाची, कधी, कशी फिरकी घेईल ह्याचा नेम नसतो! आमच्या पूर्वीच्या घराच्या मालकीणबाई ह्या एरवी अतिशय चलाख, लबाड म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांना कोणी सहसा उल्लू बनवू शकायचे नाही. पण एकदा त्यांच्या मैत्रिणीनेच त्यांची कशी फिरकी घेतली ह्याचा हा एक भारी व विनोदी किस्सा : मालकीणबाईंच्या थोरल्या लेकाचे लग्न झाले. भरपूर स्थळे आधी नाकारून झालेली. मालकीणबाईंना त्यांच्या लेकासाठी सर्वगुणसंपन्न आणि मुख्य म्हणजे श्रीमंताघरची सून हवी होती. मिळाली ती सून थोरा-मोठ्या घरची. तिचं माहेर अतिशय गर्भश्रीमंत, मुंबईच्या उच्चभ्रू वर्गातले. माहेरी खानदानी पण आधुनिक वातावरण.

आडवाटंनं जाता जाता

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 06/04/2010 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, परवापासून तुमी लावन्या वाचू वाचू कटाळला असाल. तवा एक युगलगीत ऐका. हिरो आन हिरवीन आपले त्येच हायती. पन ती काय आता लावनी म्हनत नाय. तवा ऐका जरा कान देवून त्ये काय म्हनत्यात त्ये.
काव्यरस

नाडी घ्या नाडी

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 06/04/2010 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्ट्राँग स्ट्राँगर स्ट्राँगेस्ट डिस्क्लेमर: हे लेखन केवळ मौजमजेसाठी आहे. कोणाचाही वैयक्तीक नावे घेण्याचा उद्देश नाही. मिपा अन इतरत्र असलेली नावे अन या लेखात असलेली नावे, त्यांच्या स्वभावांचा, वैशिष्ठ्यांचा गुणधर्मासहीत कोणास समान वाटत असतील तर तो योगायोग समजावा. कोणाचीही मानहानी करण्याचा आमचा हेतू नाही. तरीही काही हेवेदावे, तक्रार अर्ज असतीलच तर ते नाडी (आमचीच) पाहूनच सोडवीले जातील.
काव्यरस

लावणी : उसाचा रस तुमी पाजा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 06/04/2010 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
सिच्युयेशन: आपल्या हिरो चं रसाचं दुकान हाये. त्यो रस काढत आसतो. तवाच हिरवीन तहानेनं व्याकूळ होवून त्याच्या दुकानी येती. उन्हामुळं हिरवीन पानी प्याया मागते. हिरो तिला रसाच्या दुकानात पाहूनशान लय गोंधळून जातो. त्याला काय करावं त्येच समजत नाय.
काव्यरस

फ्लॅशबॅक

लेखक jaypal यांनी सोमवार, 05/04/2010 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
निव्वळ वासाने/गंधाने सुद्धा मी नास्टालजिक होतो. कुणाला मातीचा वास, तर कुणाला फ़ुलांचा वास आवडतो. कुणाला फ़ळांचा आवडत असेल तर कुणाला आजुन कश्याचा वास/गंध आवडत असेल. मला खुप विविध गंध आवडतात. पेट्रोल च्या धुराचा, फ़टाक्याच्या धुराचा. कुठेही व कधीही फ़टाक्याच्या धुराचा वास आला की लगेच मला माज़्या बालपणाच्या दिवाळीची आठवण येते. मुसळधार पावसात आडोश्याला म्हणुन बंद दुकानच्या पायरीशी उभ -हाव आणि कुठुनतरी जळत्या सिगरटेचा वास यावा. या पावसाळ्यात भिजताना तर खुप भास होतात आल/गवती चहाचा नाही तर कांदाभजीच्या तळणाचा खमंग वास हमखास गारुड घालतात मनावर.