Skip to main content

पार्टी रे पार्टी

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 10/04/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस अगदी विवाहित, कुटुंबवत्सल वगैरे असला म्हणून काय झाले, कधीतरी तो कनवाळू, दयाळू वगैरे जगन्नियंता त्यावर प्रसन्न होतो. कधीतरी अती होते आणि 'साल्यो, काही लाजाबिजा आहेत की नाही? किती दिवस झाले एकत्र बसून. तुमच्या साल्यांच्या रविवार -गुरुवारच्या सुट्ट्या, पोरांच्या परीक्षा आणि बायकांच्या कटकटीतून सवड अशी कधी मिळणार? असं ठरवून काही बसायला मिळणार नाही. बसायचं का आजचं? कुणाचं घर रिकामं आहे? तुझं? मग ठरलं तर! दोन तीन पेग हाणू, हा ठोंब्या चिकन करेल. व्हिस्कीचं माझ्याकडं लागलं. सोडापण आणतो मी. शिग्रेटी आपापल्या. साडेसातला बसायचं, अकरा वाजता आपापल्या घरी. पुढे ज्याच्या त्याच्या वकूबानुसार.

लावणी : मुंबईची सहल

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/04/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईची सहल
नागपुर पाहून झालं , नांदेड पाहून झालं , अमरावती पाहून झाली, लातूर पाहून झालं.... अहो इकडे बीड झालं, नगर झालं, नाशिक झालं, पुणं पाहून झालं.... तिकडे कोलापूर पाहून झालं, सांगली झाली, सोलापुर ही पाहून झालं.... आख्खा महाराष्ट्र पाहून झाला..... कोरस : आसं का? व्ह्यय तर मग.... अहो नागपुर पाहून झालं, नाशिक झालं, पुणं झालं ठाणं झालं, आता पाळी हाये मुंबईची इथं फिरून फिरून अंग माझं दमलं सवय नाही घामाची उपाय करा काही लाज राखून या गोड हुकूमाची अन मला चाखवाना कुल्फी

(या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 10/04/2010 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच अन्य स्थळावर एका धाग्यात मी काही प्रतिसाद लिहिलेला असताना अचानक 'कंपू तुमचा पाठलाग न करो ही प्रार्थना' अशी धमकीवजा सूचना आली. मी भांबावलो. त्याच धाग्यात आधी मी औद्धत्य करून कंपूबाजीला आव्हान देतोय असं प्रश्नवजा विधान आलं होतं तेही दिसलं. तेव्हापासून ही भाई लोकं नक्की काय म्हणत असावेत याविषयी मनात विचार सुरू झाले. (त्यातूनच मूळच्या उत्कृष्ट काव्याचं विडंबन, केवळ भीतीपोटी झालं म्हणून कवीची क्षमा मागतो.) पुन्हा, अन्य स्थळावर हे मी अधोरेखित करतोय. मिपावर कंपूबाजी वगैरे काही नाही.
काव्यरस

शिव शिव जय हो!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 09/04/2010 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री आवरासवर करून मीनाताईंना झोपायला थेट साडेअकरा झाले. दमलेला, शिणलेला देह अंथरुणावर लोटून दिला तरी उकाड्याने झोप येत नव्हती. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक तर सोडाच, पण रस्त्यावरच्या लोकांचे, वाहनांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते. हलके हलके झापड येऊन त्यांना डोळा लागणार एवढ्यात कसल्यातरी गलक्याने त्या दचकून उठल्या. रस्त्यावरून बऱ्याच बाइक्सचे एकसाथ येतानाचे, हलगीचे आणि कसल्या कसल्या घोषणांचे आवाज येत होते. आत्ता? रात्री साडेबारा वाजता? ह्या लोकांना काही काळवेळ आहे की नाही?

"नेत्यास इशारा"

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 09/04/2010 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
विडम्बन काव्य 'देवा तुझे किती सुन्दर आकाश ' वर आधारित : नेत्या तुझा किती | भकास प्रभाग | लुटोनी बोडका | झाला ऐसे ||१|| उजाड़ शिवार | कोरडे कालवे | घोडे नाचविले | कागदांमाजी ||२|| भुकेली लेकरे | खंगली हो गुरे | शेतकरी झुरे | उदासोनी ||३|| कर्जाचे डोंगर | डोईजड झाले | रस्त्यावर आले | सारे लोक ||४|| तुम्बडी भरोनी | हाव आटपेना | भस्म्या, क्षयरोग | माणुसकीचा ||५|| नको आता तुझी | फोल आश्वासने | नादी न लागणे | चोरट्यान्च्या ||६|| तुझी प्रकरणे | लटके बहाणे | भारता ग्रहणे | ग्रासियेले ||७|| --- अरुंधती कुलकर्णी http://iravatik.blogspot.com/

त्सुनामी मनांतले ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 09/04/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भारतातील सगळ्या टी. व्ही. चानेल ला एकाच बातमीने ग्रासले होते इंडोनेशियांत त्सुनामी येणार ! झालं ! सगळ्यांचे मला इंडोनेशियांत फोन जप रे बाबा ! कुठे बाहेर जाऊ नकोस बुधवारी ! वगैरे वगैरे ! ! माझ्या मनांत मात्र विचारांचे वादळ सुरु होते विदेशात नोकरीसाठी एकट्या राहणाऱ्या इतर अस्वस्थ भारतीयांप्रमाणे ……………………. ! त्सुनामी मनांतले ! ! ! त्सुनामी ! त्सुनामी ! ! येणार ! येणार ! सगळेच अस्वस्थ, भितिग्रस्त. आले, आले ! गेले ! ! हु..S...S...श्य ! !

चांदोबाच्या जगात... राजमाचीला

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 09/04/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे... मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही चौघे राजमाचीच्या दिशेने चालत होतो... मंद चंद्रप्रकाशात रात्रीच जग वेगळच भासत होतं... मेघा-हायवे मागे टाकला आणि लहानसा चढ चढून आम्ही तुंगार्ली तलावाजवळ पोहचलो... रात्रीच्या उजेडात तळ्यातलं पाणी मस्त चमकत होतं...

मदत हवी आहे...

लेखक चिऊ यांनी शुक्रवार, 09/04/2010 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मला थोडी माहिती हवी आहे.... चेन्नई मधे रहाणे, खाणे कसे आहे, घर भाडे... ही माहिती कोणी देऊ शकेल का??