प्रलय
प्रलय.........
" येते “ म्हणून सांगून गेली,
परतुनी ना आली पुन्हा.
वाट पाहुनी जीव शिणला,
दाटल्या अन्तरी यातना.
परतीच्या वाटेवर तुझ्या,
सजविला आसवांचा ताटवा .
जाहले निर्माल्य त्याचे,
येशील तू केधवा ?
अनमोल निर्माल्य हे
गंगेत कुठल्या वाहवू ?
महापुराचा प्रलय नंतर,
एकला कसा मी थोपवू ?
निरंजन वहाळेकर
काव्यरस
मिसळपाव
लागणारे साहित्य:
तिसर्या (शिवल्या) १ ते २ वाटे
लसुण पाकळ्य ४-५
१ मोठा कांदा चिरुन
आल, लसूण, मिरची कोथिंबीर वाटण दिड चमचे.
अर्धा वाटी सुके खोबरे व १ मोठा कांदा भाजून केलेले वाटण
हिंग, हळद
२ चमचे मसाला
चविपुरते मिठ
अर्धा ते १ चमचा गरम मसाला.
पाककृती:
पहिला तिसर्या स्वच्छ धुवुन घ्यावात. मग त्या एका टोपात त्या बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचे. व त्याला एक उकळी आणायची. टोप मोठच घ्यायच. तिसर्या सोडून टोप अर्ध रिकाम राहील पाहीजे नाहीतर कधी कधी उकळल्यावर पाणी बाहेर येत.