Skip to main content

आकाशातील मी घन काळा

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 15/02/2011 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशातील मी घन काळा रोज शृंगारीत होतो मी लेऊन रंग शलाका नाही सीमा नाही बंधन नभात स्वैर फिरणारा मी मेघ-राजा पण लोभ असा मज जडला प्रवास संपून गार हवेच्या प्रेमात जीव अडखळला प्रीतीत तिच्या मी जग विसरून गेलो अस्तित्वास मुकून मी आज बरसून गेलो आसवांच्या झाल्या जलधारा जीवनाचा हा खेळ सारा जन्मण्यास पुनश्च देह माझा नदीसागरात विलीन झाला --------- शब्दमेघ ( २००७)

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ५

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 15/02/2011 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16785 *** उन्हाळातल्या लाहा लाहा होणार्‍या दिवसांत अचानक कुठुन तरी चुळुक चुळुक आवाज येतो. घूंगरांचा तो परिचित आवाज येताच मनाला जवळच रसवंती असेल असे समजते आणि कोरड्या झालेल्या घशाला अन तापलेल्या डोक्याला थंड करण्यासाठी पाय आपोआप त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतात. कधी जोरजोरात आवाज करणारा टेपच जवळच्या रसवंतीची सूचना देत असतो. गेल्याबरोबर हाफ नाही तर फुल्ल ची ऑर्डर देत आपण हाश्श हुश्श करत बसतो. समोर रस येताच पटकन ते अमृत घेत, तृप्त होत परत आपल्या मार्गाने निघुन जातो.

एक सर्व्हे- आय.टी. कामगारांचा !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 15/02/2011 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
(मला आलेल्या एका इ-पत्राचा मराठी अनुवाद) * १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात. * २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला) * ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही. ;) * ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???) * ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते. :( * ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात. * ७०% आय.टी.

<< प्रेमदिनाच्या खस्ता >>

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 15/02/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमदिनाच्या रस्त्यावर असलेले अनेक वेडे काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले गुलाबांचे झेंडे लावतांना काही तर काही असेच खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले. टुकार पाखरं मधुनच समोर येत मनाला टोचत आणि फाट्यावरती अम्हास्नि उडवत मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे. कॉलेजपणात नंतर आल्यावर कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या, मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन मनात आठवणींनी गंधलेला सुगंध शहरभर पसरत असे. आता नव-शहरीकरण झाल्यावर व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते काहीतरी टोचतं आणि मॉनिटर समोर बसुनही आठवणींच्या सुगंधाचा भास जाता जात नाही.
काव्यरस

आपण आपला आधार ( UNIQUE ID) क्रमांक घेतला का नाही ?

लेखक सुकामेवा यांनी मंगळवार, 15/02/2011 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
भारतामध्ये नुकताच आधार ( UNIQUE ID) क्रमांक देण्याचे काम चालू झाले आहे हे ऐकले आणि मागच्या आठवड्यात गुरवारी वेळ मिळाल्यामुळे स्वतःचा आधार क्रमांक काढून घेतला. आज सहज वेळ मिळाला म्हणनू http://uidai.gov.in/ ह्या साईट ला भेट दिली तर महाराष्ट्राचा क्रमांक सातवा असल्याचे पहिले या वरुन असे वाटते की जास्ती लोकांना ह्या गोष्टीची माहिती नाही असे वाटले म्हणून माहिती देण्याकरिता हा काथ्याकुट. कृपया जिथे आंग्ल शब्द वापरले आहेत तिथे मराठी शब्द सुचवल्यास बदल करण्यात येतील. संपादक मंडळीनी हे बदल परस्पर केले तरी चालतील धन्यवाद.

रंगिबिरंगी पनिर बुरजी.

लेखक जागु यांनी मंगळवार, 15/02/2011 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: पनिर लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन) २-३ हिरव्या मिरच्या चिरुन १ ते २ मध्यम कांदे चिरुन मटार अर्धा वाटी कोथिंबीर थोडी चिरुन मिठ १ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस. तेल थोडा गरम मसाला ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या हे काही लागणारे वरील जिन्नस क्रमवार पाककृती: पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या.म्हणजे सोप्या शब्दात कुस्करुन घ्या हो. तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिर

दारासमोरचा रस्ता

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 15/02/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
दारासमोरचा रस्त्यावर असलेले अनेक खड्डे काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले क्रिकेटचे स्टंप लावतांना काही तर काही असेच काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले. चुकार दगडं मधुनच वर येत पायाला टोचत आणि धुळमाती अंगावर उडवत खेळतांना वेळेचे भान नसे. पावसाळ्यात डबके झालेल्या रस्त्यावर थपथप भरलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या अन् पायाला लागलेला चिखल घरभर पसरत असे. आता डांबरीकरण झाल्यावर मऊसुत रस्त्यावरुन चालतांना उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो काहीतरी टोचतं आणि चिखल लागल्याचा भास जाता जात नाही.
काव्यरस

"माझी व्यथा"

लेखक वपाडाव यांनी मंगळवार, 15/02/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
चीगोंच्या मार्गाथा वरून आम्हाला आणी एक किस्सा आठवला... आणी हो तो सांगण्यासारखा पण आहे.. त्याची अगोदर पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. म्हणून हा परिच्छेद !!! टीप: हा भीत-भीत का होईना इतक्या दिवसानंतर पहिला-वहिला लेख (वाटला तर लेख, नाहीतर टवाळगिरी म्हणा) मिपावर टाकतोय, विशाल मनाने ह्याला झोळीत घ्या.