आरक्षण!
(पहिल्यांद्याच स्पष्ट करु इच्छितो कि -- हलकेच घ्या!! :) )
नुकताच महाराष्ट्र सरकारने स्थानिक पातळीवरच्या निवडनुकात महिलांना ५०% आरक्षण जाहीर केले. मिपाकरांना याबद्दल काय वाटते यासाठी हा लेखनप्रपंच !!
अशा प्रकारचे आरक्षन देउन महीलांचे समाजातील स्थान खरंच सुधरेल का? आज आपण पाहतो कि भारतात किमान ५० वर्षांपासुन विविध जातिधर्माच्या व विशीष्ट आर्थीक गटातल्या लोकांना विविध प्रकारचे आरक्षण आहे तरी पण गरीबी व इतर समस्या समुळ नष्ट झाल्या काय ? महिलांचे समाजातिल स्थान सुधारले का ? बरं आनंदीबाई जोशी सारख्या काही महीला तर विना आरक्षणपण पुढे गेल्या .
मिसळपाव
