मान्य आहे, की कोणी एक पाणीपुरीवाला एक घाणेरडे कृत्य करतांना पकडला गेला.
शक्य आहे, की असे समाजविघातक आणखीही काही असतील.
समाजत घडलेले असे एक उदाहरण पाहिले आणि हातावर पोट असलेल्या ३०० कष्टकरी लोकांचे स्टॉल्स फोडले.
वड्याचे तेल वांग्यावर?
हे सगळेच स्टॉलवाले असे बेजाबदार होते?
अशी शिक्षा ३०० निरपराध लोकांना देणारे हे कायद्याचे रक्षक होते की आणखी कोणी?
एका घाणेरड्या कृत्याने येवढी चीड निर्माण केली. मग पोट फुगेस्तोवर खाऊन देखील भूक न भागलेले, आणि पुढच्या सात पिढ्यांची तरतूद स्वीस बँकेत करून ठेवणारे भ्रष्टाचारी, त्यांची किळसवाणी भूक बघून सगळे गप्प का बसतात?