शब्दांच्या मालगाड्या
काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे.
काव्यरस
तुम्ही बी घडाना ....!
कोल्हापूरशी एक घट्ट छान भावनिक नातं आहे. मामाच्या गावाशी असावं तसंच. त्यामुळे पुढे आयुष्यभर वेळोवेळी चघळाव्या अशा लहानपणीच्या अनेक आठवणींचे भले मोठे गाठोडे आहे. एकटे असताना प्रवासात, तासंतास मित्राची, कस्टमरची वाट बघताना किंवा नुसतेच रिकामे असताना जवळ असणा-या समृद्ध अडगळीतुन कधीतरी असे एखादे गाठोडे अचानक बाहेर येतं. मग गाठोड्यातल्या एकएक आठवणींशी गप्पा मारायला, आता थोड्या वेगळ्या संदर्भातून बघायला धमाल येते. कोल्हापुरच्या महलक्ष्मी मंदिराच्या म्हंजे अंबाबाईच्या देवळातल्या आठवणींचाच एक भला मोठा संच आहे.
गुडबाय बेळगाव
४८ तासानंतर मी कर्नाटक सोडून परत माघारी महाराष्ट्रात जाणार ! बऱ्याच महिन्यांनी परत कोकणात जाणार याची उत्सुकता आहेच पण बेळगाव सुटणार याची पण रुखरुख लागलीये .पूर्वी संयुक्त महाराष्ट्र बद्दल फक्त घरी मॅगी खाताना टि.व्ही.वर पाहिलेलं.
असेलही कुठे कुठे
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे
खडतर वाटेवर सापडेल जिणे
कशासाठी कुणासाठी रडावे अपार
काय सख्या आणले तू, काय तू नेणार ?
रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची
लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ?
हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला
स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
काव्यरस
निरुत्तर
हॉल खच्चुन भरला होता.
विद्यार्थी -पालक सभा.
नविन सिलॅबस.
दहावीच्या पालकांना हायपर व्हायला आणखी एक कारण.
दोन कार्यक्रमामधे अर्ध्या तासाचा ब्रेक.
त्यात तो भेटायला येणार होता.
शाळेतल्या गुणवंत मुलामधला.
मुख्याध्यापकांची आग्रहाची विनंती.
टाळणे शक्य नव्हते.
-----------------------------------------------------------------------------------------
सभा सुरु झाली.
चौथ्या वाक्यात मांडीवरील लहानगीने भोकाड पसरले.
मी थांबलो.
सुज्ञ शिक्षीकेने आईला वर पक्षाच्या खोलीकडे नेले.
कुणी तरी दबल्या आवजात कॉमेंट केली.
मुले फिदीफिदी हसली.
-------------------------------------------------------------------------------
'तार्यांचे बेट' - प्रसन्न करणारा अनुभव
कामाच्या व्यापात बर्याच गोष्टी करायचे राहून जाते. सकाळी निवांत बसून वर्तमानपत्र वाचणे असो किंवा सहजच मारलेला एखादा फेरफटका असो; मोठ्या आनंदाच्या मागे दमछाक करणारी दौड करतांना छोट्या-छोट्या गोष्टींमधून विनासायास मिळणार्या आनंदाचा आपण नेहमीच बळी देत असतो. नंतर 'माझ्याच वाट्याला का अशी पळापळ' असे गळा काढून ओरडण्यात ही आपण मागे हटत नाही.
पाखरा जा..
'पाखरा जा त्यजुनिया..' हे भाईकाकांनी गायलेले गाणे म्प३ स्वरुपात कुणाकडे आहे काय? असल्यास ते कृपया मला tatya7@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकाल काय? त्याचप्रमाणे आंतरजालावर हे गाणे कुठे मिळू शकेल याबद्दलही माहिती हवी होती..
या गाण्याचे संगीतकारही माझ्या मते भाईकाकाच आहेत. कवी कोण आहेत हे कळू शकेल काय?
धन्यवाद,
तात्या.
प्रथम क्रमांक स्पर्धा विजेता कविता
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे
कधी भाट होई सख्या चेहर्यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कस
मिसळपाव