Skip to main content

राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 24/02/2026 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल. प्याज कचोरी जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले.

दरम्यान

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 24/02/2026 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
गच्चीवर असाच पडलो होतो. चांदणं बघत. वाऱ्याबरोबर धूळही उडत असल्याने तंद्रीभंग व्हायचा. इतक्या प्रचंड आकाशाच्या पोकळीत तारे तरी किती. भिती वाटेल एवढे भयंकर हे आकाश. चंद्राकडे कधी टक लावून बघीतलेय? चटईवरुन उठून ग्लासातलं पाणी पिलो. आजूबाजूला नजर मारली. एक सुन्न शांतता अंधारात गडद होऊन मिसळली होती. किती वाजले असतील ? माहीत नाही. अचानक जाग आली आणि मी असा. झोपायचा वायफळ प्रयत्न केला. मग डोळे सताड उघडे ठेवून चंद्राकडे बघत बसलो. चंद्र कधी कधी तांबूस वाटतो. नीट बघितलं तर तिथे माणसं राहत असतील असंही वाटतं. अचानक तो मोठा झाल्याचा भास झाला. आता तो सरळ खाली येऊन आपटणार. मला घाम फुटतो.

दोसतारः शाळेत लग्न लागते २

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 22/02/2026 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी वर्गात सर उभे असतात मुले बाकावर बसलेली असतात. आज सर खुर्चीत बसलेले होते आणि आम्ही उभे होतो. फळा असलेली भिंत जरा इकडे सरकवली असती तर आम्ही सगळ्यानी शिकवायला सुरवात केली असती. हा विचार मनात येतोय तोच शाळा सुटल्याची घंटा होते. आम्ही तसेही उभेच होतो. आणि दप्तरेही आवरलेलीच होती. सगळ्यानीच न ठरवता दप्तरे उचलली आणि पटकन वर्गाबाहेर धूम ठोकली , सरांच्या अगोदर.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53531 इतके कंटाळलो होतो की रोजच्यासारखे जित्या बोलावत असतानाही ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलो नाही.

संध्येच्या व्याकूळ छाया.

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 22/02/2026 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
संध्येच्या व्याकूळ छाया अंधार माखुनी येती हा डोह अंतरीचा दुःखाने ढवळून जाती. मी व्याकूळ होतो जेव्हा दुःखाने मेघही झरती अश्रूंनी विझुनी गेल्या नभीच्या चांदणं ज्योती. सावली उन्हाची व्हावी तशीच शीतल माया गेले प्रहर निघुनी छळती स्मृतींच्या छाया. अंधार भारल्या राती नभी चांदणे झरते अंधाऱ्या डोही दुःखाच्या सुख तसे पाझरते. https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa
काव्यरस

राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 22/02/2026 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
२०२५ च्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला होता. ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली. जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती. मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

लेखक मार्गी यांनी शनिवार, 21/02/2026 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अंध गायकासोबत विशेष भेट ✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली! ✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स! ✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला ✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद ✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब! ७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता.

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 21/02/2026 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी 1 युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो.

खाडीवरचे दिवस!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 21/02/2026 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक जुना मित्र बरेच दिवसांनी भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात गप्पा खाडीवर पोहण्याकडे वळल्या. आणि झरकन सगळ्या आठवणी एक एक करून डोळ्यापुढे नाचू लागल्या. मी गोष्ट सांगतोय साधारण ९० ते २००० या काळातील. कल्याणात जरी इमारती बांधायचे पेव फुटले होते तरी अजूनही कुठेकुठे कौलारू घरे होती. रस्त्यावर रिक्षांबरोबर टांगेही चालत होते. पारनाका ,दूधनाका, बाजारपेठ टिळक चौक, अहिल्याबाई चौक इतक्या भागात चालत फिरता येत होते आणि दैनंदिन गरजा भागत होत्या. पण कल्याणात फिरायला जाण्यासारखी ठिकाणे दोनच. खाडी किंवा रेतीबंदर आणि सुभाष मैदान. आता खाडी म्हणजे कल्याणची उल्हास नदी.