Skip to main content

मी- एक शून्य

लेखक सन्जोप राव यांनी बुधवार, 16/11/2011 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणांचा सध्या सुकाळ आहे. विसुनानांच्या शब्दांत सोपे फुलटॉस. घड्याळ थोडे हळू झाले आहे आणि हाताशी अखंड आंतरजाल आहे. असे आउटसाईड दी ऑफस्ट्म्प चेंडू मिळाले की रावसाहेबांच्या शब्दांत 'कसं आवरायचं हो मन?' धनंजय, माफ करा शून्य खांद्यावरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - आता तो पदर असला काय आणि नसला काय. महत्त्वाचा राहातो तो गड्डा म्हणजे खांदा. 'पिंजरा' मध्ये संध्या म्हणते तसा 'अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वार्‍यावरी' खांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते.

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

एक हे विश्व, शून्य हे विश्व

लेखक धनंजय यांनी बुधवार, 16/11/2011 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते. शून्य कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही. गाभा शोधायला गेले, तर कांदा असा नसतोच. म्हणजे "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. शून्य कल्पनेकरिता असलेला शब्दही शून्य. कांद्यासारखी कुठलीही गोष्ट घेतली, तरी असेच दिसते.

पेपर प्लेट पासून बनवलेले वॉल हेन्गिंग!!

लेखक पूनम ब यांनी बुधवार, 16/11/2011 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: २ चौरस आकाराच्या पेपर प्लेट व्हाईट स्कूल ग्लू रद्दी पेपर टिश्यू पेपर सेलो टेप अक्रालिक कलर कृती: रद्दी पेपर घेऊन त्याचे बारीक रोल करून घ्यावे. ते सेलो टेप ने प्लेट च्या मागच्या बाजूला काठावर चिटकवून घ्यावे. पेपर रोल वापरून हवे तसे डिझाईन करून घ्यावे. व्हाईट स्कूल ग्लू पाण्यामध्ये घालून मिक्स करावे. टीश्यु पेपर चे छोटे छोटे तुकडे करून ते ग्लू च्या सहाय्याने प्लेट वर चिटकवून घ्यावे.

बिगारी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 16/11/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
बिगारी
रोज सकाळी बांधून भाकर कामावर निघतो सायकलीवर उचलूतो खडी रेती डबर माती शिमीटाची डोक्यावर पाटी उघडं डोकं तापून जातं उन्हातान्हानं सडकून निघतं रचतो मालात विटेवर विट भिंतीत चिणतो मलाच निट बांधले बांबू वासे लाकडी फळ्या जगतो झालंय लोखंडाच्या सळ्या कांक्रीट मिक्सर गोल फिरतं मातीधुळीतच आयुष्य जायचं बाकीचे एखादंच घर बांधतात गरीब बिगारी घरं बांधतो - पाषाणभेद

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/11/2011 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

मासे ३५) सुरमई

लेखक जागु यांनी मंगळवार, 15/11/2011 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते. सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई फोटोत दाखवल्या प्रमाणे.

यू.पी चे विभाजन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 15/11/2011 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मायावतीने यू.पी चे विभाजन ४ भागात करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. उत्तर प्रदेश हे आकाराने आणि खरेतर लोकसंख्येने अगडबंब असलेले राज्य. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य. .. प्रदेश लहान असेल तर त्याचा विकास.. व व्यवस्थापन प्रभावी पणे करता येते असा सिद्धांत मांडला गेला आहे... हा प्रस्ताव यू.पी विधान सभेत मांडला जाईल... आता उत्तर प्रदेशाचे विभाजन झाल्यावर त्याचा सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हा बिरूद राहणार नाही. तो मुकुट महाराष्ट्राकडे येईल. महाराष्ट्रात असा विभजनाचा प्रयोग होऊ शकतो का? विदर्भाची मागणी जुनीच आहे...