Skip to main content

रेल्वे प्रवास!

लेखक amit_m यांनी रविवार, 25/03/2012 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2 TIER या वर्गातून सुमारे १०००किलोमीटर प्रवास केला. आरक्षण तत्काळ कोट्यातून आंतरजालावरून केले होते. सांगायचा मुद्दा असा की तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला, त्यामुळे तिकीट परीक्षकाने माझ्याकडे तिकीटाची पूर्ण रक्कम + २५० रुपये असा दंड मागितला. मी दंड द्यायला नकार देऊन त्याच्याशी बरीच हुज्जत घातली आणि शेवटी विजयी झालो. याबाबत रेल्वे चा नियम काय आहे? तिकिटाचे पूर्ण पैसे दिले असताना फक्त नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा असल्याने दंड भरावा काय? (मी ओळखपत्र म्हणून PAN card दाखवले होते)

शाळा?

लेखक किचेन यांनी शनिवार, 24/03/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला.मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही.पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय.नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे.

[मदत हवी] टाटा कम्युनिकेशन्स/व्हीएसएनेल पासून सावध राहा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 24/03/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
टाटा कम्युनिकेशन्स (पूर्वीचे व्हीएसएनेल) ने माझे जवळ जवळ १४-१५ वर्षे जुने पोस्टपेड डायल-अप अकाऊंट अचानक बंद केले. त्यामुळे मला सध्या भयानक मनस्ताप होत आहे. कारण हा माझा ईमेल पत्ता असंख्य ठिकाणी दिलेला आहे. चवकशी केल्यावर त्यांनी मला पैसे न भरल्याचे कारण सांगितले. वास्तविक मी त्यांना माझ्या क्रेडिट कार्डवर बील चार्ज लावण्याकरता योग्य ती परवानगी दिलेली होती. त्यांनी मला कोणतीही नोटिस/पूर्वसूचना दिलेली नाही. मला याबाबतीत कायदेशीर कारवाई काय करता येईल याची माहिती हवी आहे.

सांब भोळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 24/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
रानात सांब भोळा उघडा असे दुपारी 'देवा कसाही तू रे...!?' मी एक त्या विचारी म्हणतो मलाही सांब 'मी खेळ तव मनाचा, असतो निसर्ग सारा.. कधी देव का कुणाचा..?' 'पडणार साऊली जी माझेच अल्प रूपं.., का बांधता तुम्ही हे.. नसते खुळे हिशेबं..?' 'व्यापुनि चराचरी या मी विश्वरूपं सारे..., माझेच भोग मजसी.. छळतीलं का कधी रे..?' 'तुमच्या खुळ्या स्वभावी मज देव-जन्म आहे.., कुणी 'देवं' का म्हणा ना..? अंती निसर्ग आहे...!' 'त्याचीच शुद्ध किमया भासे तुम्हा उन्हाळा, निर्जीव मूळचा मी तुमचाच सांब भोळा...!'
काव्यरस

खानदेशी वांग्याचे भरीत

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 24/03/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाकृ मला आपल्या मिपावरची मैत्रीण स्मिता हिने सांगितलेली आहे :) झटपट आणी एकदम चविष्ट अशी ही पाकृ आहे :) भरीताला पाहून नेहमी नाक मुरडणारे मी आणी माझा नवरा आवडीने हे खाऊ लागलो :) स्मिताचे मनापासून आभार :) साहित्यः मोठे भरीताचं वांगं २-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) २-३ लसूण (लसूण आणी हिरव्या मिरच्या कोरड्याच तव्यावर भाजून घ्यायच्या) मुठभर कोथंबीर मुठभर कांद्याची पात चिरून १ टीस्पून ओवा मीठ चवीनुसार

शब्द...!

लेखक वेणू यांनी शनिवार, 24/03/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
सुटीची मस्त सकाळ म्हटलं की हातात वाफाळत्या चहाचा कप आणि समोर वृत्तपत्र, ठरलेलंच!! "घरकाम होत राहतील आरामात" कसली घाई नाही, गडबड नाही हा आल्हाददायी विचार करत पहिला घोट घेतला अमृततुल्याचा- चहाची चष्म्यावर आलेली वाफ साफ करत, वृत्तपत्रात घातलं डोकं... 'पुंजके' नावाचा स्तंभलेख वाचताना, सुधीर मोघे म्हणतात- येथे रेंगाळले, ओळी सुंदरच होत्या, "शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते, वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!" वाचन खुंटलं इथेच... खरंच शब्द म्हणजे नक्की काय, नितळ पाणी? भावनांचा रंग मिसळला की तेच भाव व्यक्त करणारे!

महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 24/03/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अनेक वार्तापत्रातुन प्रसीध्द होणा-या बातम्या वाचल्यावर "महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?" असा प्रश्ण पडतो आहे. आजची ताजी बातमी वाचा. (सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल अनेक अहवालांवर चर्चा चालू आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याबद्दल अनेकांचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच एक धक्कादायक बातमी वाचण्यात आली.) धक्कादायक आंतरजालावरील वर्तमानपत्रातील ताजी बातमी पुढील प्रमाणे. दिवेआगरःसोन्याच्या गणपतीची चोरी राज्यातील मंदिरांमध्ये चो-यांचे प्रमाण प्रचंढ वाढले आहे.

काहीतरी नवीन..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 23/03/2012 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे! मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली.