शेअर बाजार उच्चांकावर---- आपण काय करावे ??
मुंबई, फेब्रुवारी १९९२,--- तो स्व. हर्षद भाईंचा जमाना होता, संध्याकाळी उशीरा ICWAI च्या अभ्यासिकेतुन बाहेर पडताना शेअर बाजाराच्या ईमारती जवळ फटाक्यांचे बरेच आवाज ऐकले. पुढे ट्रेन मध्ये कळले की सादर झालेल्या अनुकुल अर्थसंकल्पामुळे 'सेन्सेक्सने' म्हणे पहिल्यांदाच 3,000 अंकाची पातळी गाठली होती. जिकडे तिकडे बाजारातील तेजीचच चर्चा होती. "काय जोशी साहेब, आता पुढे काय वाटते?? अहो, रिटायरमेंटसाठी म्हणुन घेतले होते ACC चे शेअर्स, पण वर्षभरातच दामदुप्पट झाले की ---" एक यशस्वी गुंतवणुकदार त्यांच्या दुसर्या, तितक्याच यशस्वी, मित्रास विचारत होते.
मिसळपाव
“डोळे हे जुल्मि गडे… रोखुनी मज पाहू नका ”…
च्यामारी, आज पहाटे स्वप्नात पुन्हा मधुबाला, आणि तीही चक्क डोळे हे जुल्मि गडे म्हणणारी ?
… अगदी पूर्वी स्वप्नात शिवाजी महाराज, टारझन, वज्रहनुमानमारूती वगैरे यायचे…
… आणि आता चक्क मधुबाला ?
मजा आहे बेट्या तुझी. चल चहा कर आता.
“पाणी-दूध मिसळलं? मिसळलं.
साखर टाकली ? टाकली.
उकळी आली? आली.
चहापत्ती टाकली? टाकली.
आलं किसून टाकलं? टाकलं.
झाकण ठेऊन ग्यास बंद ? बंद”.