Skip to main content

नुग्गेहळ्ळी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी गुरुवार, 05/03/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
होयसाळा राज्यघरण्याने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत दक्षिण भारतात राज्य केले. त्यांनी जवळपास दोनशे मंदिरे बांधली. त्यातील हळेबेद बेलूरची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. पण इतर बरीच मंदिरे दुर्लीक्षीत आहेत किंवा मोडकळीला आलेली आहेत. नुग्गेहळ्ळी हे हसन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. श्रवनबेळगोळा पासून अवघ्या २६ किलोमीटर असूनहि प्रवाश्यांपासून लपून राहिले आहे. ह्या गावात तेराव्या शतकातील दोन सुंदर मंदिरे आहेत - लक्ष्मी नरसिंह आणि सदाशिव .

फोटो ओळखा.

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 05/03/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत

लेखक jaydip.kulkarni यांनी गुरुवार, 05/03/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत कर्ज घेवून १८ महिने झालेत , एकूण मुदत २४० महिन्यांची आहे , व्याज दर कमी होण्या साठी हा विचार सुरु आहे १) Balance Transfer साधारण मार्च महिन्यात करणे योग्य होईल का , का नवीन आर्थिक वर्षासाठी वाट पहावी. २) Balance ट्रान्स्फर नंतर माझा मासिक हप्ता barypaiki कमी होतोय ( सध्याचा interest rate : 10.75 एक्सिस बँक ,तर SBI कडून मिळणारा १०.१५ ) पण ह्यात काही छुपे खर्च आहेत का . ३) pre-payment charges RBI ने बंद केले होते असे कळले , तरी काही बँका घेतात म्हणे तर ह्या विषयी कुठून योग्य माहिती मिळू शकेल.

धुळवड

लेखक bharatm यांनी गुरुवार, 05/03/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशचतुर्थी प्रमाणेच कोकणातील आणखी एक मोठा आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे 'होळी'. थंडीचे दिवस संपत आल्यावर कोकणी माणसाला शिमग्याची ओढ लागते. 'होळी' या शहरी शब्दापेक्षा 'शिमगा' हा शब्दच कोकणच्या मातीला जुळून जातो. एकंदरीत कोकणापेक्षा तळकोकणातील शिमग्याची प्रथा थोडीशी वेगळी आहे. फाल्गुन पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण तळकोकणामध्ये साधारणता ५, ७ किंवा ९ दिवस चालतो. पोर्णिमे दिवशी घरोघरी गोड जेवण बनवले जाते. पुरण पोळ्या किंवा शिरवाळे आणि गोड रस हे जेवणाचे पदार्थ असतात. म्हणूनच त्याला 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असेही म्हटले जाते. शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते.

सावल्यांनी पोळलो आहे इथे मी ...

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 05/03/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
खोल मी आहे किती पाहून घेतो मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो सावल्यांनी पोळलो आहे कधी मी ऊनही आता जरा फुंकून घेतो बेगडी आहे तुझी दुनियाच सारी मी अता रानीवनी भटकून घेतो मी उद्या होईनही काफर कदाचित ये, तुला थोडी फुले वाहून घेतो तू किती भिनलीस माझ्या आत राणी- ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो डॉ.सुनील अहिरराव

कागाळी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/03/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
यशोदे कसा गं बाई श्याम तुझा मातला ओलेती तनु कोमल माझी अन द्वाडाने रंग टाकला अंग अंग माझे जाळी होळीच्या रंगेल ज्वाला अंगांगाची होय काहिली कान्ह्याने गं डाव साधला गोपाळांचा जमवून मेळा चहाटळ अडवी पांदणीला लोण्याची त्यां लाच हवी अन रंगाचा तो हाती बुधला नंदाचा पोर्‍या गाली हसला मैय्या, मी गं अगदीच भोळा गोपी सार्‍या एक होवूनी उगाच करती बघ कागाळ्या माय यशोदा त्रासुन गेली बांधुन घातला सावळा धास्तावल्या गौळणी सार्‍या बंधन कृष्णा अन आम्हां कळा ! विशाल
काव्यरस

कालव्यवस्थापन (Time Management) : एक अपसंज्ञा (चुकीचे नाव, misnomer)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 05/03/2015 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी संज्ञा (term, name) पकडून तिचे व्यापारीकरण करणे हे काही नवीन किंवा विरळ नक्कीच नाही. एखाद्या संज्ञेची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करून मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो असे लक्षात आले की मग त्या संज्ञेभोवती जाणीवपूर्वक इतके मोठे वलय निर्माण केले जाते की, त्या संज्ञेचा अर्थ समजला जातो तसाच आहे की ती अपसंज्ञा आहे, इकडे लक्ष न देता तिचा उदो उदो केला जातो. अश्या परिस्थितीला "पूर्वग्रहदोष (cognitive bias)" असे म्हटले जाते आणि शब्दाच्या आशयाशी प्रामाणिक नसलेल्या संज्ञेला "अपसंज्ञा (misnomer)" असे म्हणतात. कालव्यवस्थापन ही अशीच अनेक दशलक्ष डॉलर उद्योगाला जन्म देणारी अपसंज्ञा आहे.

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -

लेखक विदेश यांनी बुधवार, 04/03/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी .. 'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला 'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. .

वाडा ( भाग 1 )

लेखक जयंत माळी यांनी बुधवार, 04/03/2015 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
------ वाडा ------------- नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी जयंत माळी घेऊन आलोय एक खास भयानक कथा. ही कथा पुर्णत: काल्पनीक असून या कथेतील पात्रे , घटना , स्थळ यांचा कोणत्याही खर्या घटनेशी संबंध नाही. तसे आढळल्या तो निव्वळ योगायोग समजावा कथेचा लेखक :- जयंत माळी कथेतील पात्रे : 1} रामराव चंद्रकांत पाटील ( माजी सरपंच ) 2} विकास रामराव पाटील 3} सुखदा विकास पाटील 4} सचिन शर्मा 5} विनायक शर्मा डोंगराच्या कुशीत वसलेले आई जगदंबेची कृपा असणारे करेवाडी गाव. रामराव पाटील या गावचे माजी सरपंच. रामरावांना गावात भरपुर मान होता.

वजन कमी करणारा आहार

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 04/03/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री