पथ्थ्याच्या पाककृती
‘पडू आजारी मौज हीच वाटे भारी’ ही कविता लहानपणी अभ्यासाला होती. तेव्हा शाळा बुडवायला आवडत नसले तरी आजारपणाचा आहार ऐकून तरी आजारी पडावे असे वाटे. पण मोठे झाल्यावर आणि त्यातूनही लग्न झाल्यावर कोणाचे आजारपण म्हटलं की, धडकीच भरे. कारण आता कुटुंबियांचा आहार स्वत: सांभाळायची वेळ येत असे. शक्यतो घरातल्या सगळ्यांनीच तेव्हा आजाऱ्याला चालणारे पदार्थ खाल्ले तर काही हरकत नसते. पण कडक पथ्य असलेल्या आजारात असे शक्य मोठेच प्रश्न असतात. अशावेळी सुगरणीची कसोटी लागते. आजारी व्यक्तीची सहनशीलता पुढे येणारे अन्न आनंदाने खाण्यासाठी टिकून रहावी यासाठी तिला नाना प्रयोग करावे लागतात.
मिसळपाव
नमस्कार मंडळी!! झाले का जेवण? टाकलीत का सुपारी तोंडात?
मस्त सणावाराचे दिवस आहेत. काही ना काही निमित्ताने रोज गोडधोड खाल्ले जातंय. मग ते पचायला सुगंधी चविष्ट पान वा सुपारी हवीच की!
सुरेख पदार्थांनी भरलेल ताट त्याचा आस्वाद घेत घेत केलेले तुडुंब जेवण त्यावर तोंडात टाकायला तांबूल किंवा छानशी सुपारी, सूखच!
असे कितीहि छान जेवणानंतर पोट भरले तरी आठवण येते ती मुखवासाची. मुखवास म्हणजे जेवणानंतर पचनासाठी खाल्ली जाणारी सुपारी, तांबूल.