Skip to main content

मी ..... कोण ?

लेखक फिझा यांनी रविवार, 02/10/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी ..... कोण ? मी कोण तुम्ही कोण जन्माच्या वेळीच ठरवतात जात ,पात ,धर्म,देश ओळख तेव्हाच सांगून टाकतात ! 'मी' म्हणायच्या आधी "तू कोण " हे शिकवून टाकतात ! आधी होते बर मी यजुर्वेदी लग्नानंतर झाले म्हणे ऋग्वेदी, कुटुंबामध्ये आमच्या आहेत कोकणस्थही चार , बिल्डिंग मध्ये आहेत ब्राम्हणच फार ! कॉलनीमधले मला 'मराठी' म्हणून ओळखतात शहरात इतर ठिकाणी फिरताना 'कोणत्या भागातली' म्हणून विचारतात ? शहराबाहेर गेले तर ही' पुण्याची ' असे म्हणाले लोक , परप्रांतात गेले तेव्हा 'महाराष्ट्रयीन' म्हणाले ते कैक .

ब्लॅक अँड व्हाईट

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 02/10/2016 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
चेक इन झालं. सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं झालं. आता फक्त विमानाची वाट बघत बसायचं. यावेळी पाय निघत नाहीये इकडुन. बाबा आता अर्ध्या रस्त्यात असतील. असं वाटतंय त्यांना फोन करून पुन्हा बोलवावं, आणि तिकीट कॅन्सल करून पुन्हा घरी जावं. पण किती दिवस राहणार असं. आज ना उद्या तर पुन्हा स्वतःच्या घरी सॅनफ्रॅन्सिस्कोला जावंच लागेल. किती दिवसांनी एवढी मजा आली, एवढी हसले खुलून मी. दीपेशला कितीदा म्हटलं चल सोबत, तर काही आला नाही. कामाचा आणि सुटीचा बहाणा केला. खरं कारण बोलुन नाही दाखवलं तरी दोघांना माहित आहे. यावेळेस त्याच्या एका आतेबहिणीचं लग्न तर होतंच पण माझ्या बॅचचं रीयुनियनसुद्धा होतं पहिलं.

मक्केतील उठाव २

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 02/10/2016 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग इस्लाम स्थापन झाल्यापासून किंबहुना त्याआधीही मक्का हे शहर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मुसलमानाला अशी धर्माज्ञा असते की आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक मुस्लिम आयुष्यात एकदा तरी ही तीर्थयात्रा करतोच. सौदी अरेबियाकरता मक्का हे एक प्रतिष्ठेचे स्थान आहे. जगभरातील मुस्लिमांनी पवित्र मानलेल्या जागेची व्यवस्था बघण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्याचे पावित्र्य टिकवणे हे त्यांचे ते कर्तव्य मानतात. अर्थात ह्या यात्रेमुळे सौदी सरकारला मोठा महसूलही मिळतो.

सुगंधसय

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 02/10/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल चाहूल, सोनचाफा, मंद पाऊल, बकुळीला; तीट काजळीला, साजिरा प्राजक्त, आणि वाटेवर, आकाशमोगरा. त्याचा निवारा, चांदण्यात.. सुगंधसय, पाझरे मनात- गेली अत्तरे, कधीची उडून..

दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 02/10/2016 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याआधी- दीपशिखा दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस . पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो, ट्रेनमध्ये एकटी बाई बघून लुटले आणि चालत्या गाडीतून ढकलून दिले. आपण हळहळतो, चुकचुकतो.आजकाल साधं जगणंही कसं सगळं अनसेफ झालंय अशा चर्चा करतो आणि पेपरचे दुसरे पान उघडत अजून एक चहा पितो.

'रफाल'

लेखक पराग १२२६३ यांनी शनिवार, 01/10/2016 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे. रफाल डेल्टा विंग बहुपयोगी मध्यम पल्ल्याचे ४++ श्रेणीतील लढाऊ विमान आहे.

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 01/10/2016 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती.

दोन उपास कथा

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 01/10/2016 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकः कोंढवा बोपदेव सासवड मार्गावरील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणातील उपहारगृह. "उपवासाचे काही आहे का?" "बालाजीचे बटाटा वेफर्स आहेत" "एक पाकीट द्या" दोनः पुणे गेस्ट हाऊसमधील रात्रीच्या जेवणाची वेळ. एक वयस्कर जोडपे एका टेबलावर बसलेले. फक्त आजोबा जेवत होते. आजी आजोबांशी बोलत असतानाच आजूबाजूचे निरिक्षण करत होत्या. ते वृद्ध जोडपं हिंदी भाषिक होतं. आजींची नजर भिरभिरत असताना व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या मेनूवर स्थिरावली.

संज्जीं नां

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 01/10/2016 21:32 या दिवशी प्रकाशित केले.

संज्जीं नां

"बाबा संज्जीं नां" "काय?" "संज्जीं नां" "काय ? नीट स्पष्ट बोल , काहीही कळत नाहीये" "संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां" "अगं हा काय म्हणतोय , काही कळत नाहीये " "संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां ...संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां " (आंवं आंवं आंवं SSS ) ______________________________________________________ ऑफिसातुन घरी आलो की कपडे बदलायचे अन टीव्ही समोर येवुन बसायचे. सौ चहा आणुन देई पर्यंत साहेबांकडुन फर्माईशी सुरु होतात अन चहा येई पर्यंत आपला युट्युब जॉकी झालेला असतो... हे आपले रुटीन!

‘चाळ’ आणि मुळाक्षरे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/10/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी तेव्हा इयत्ता सातवीत असेन. मराठी विषय शिकविण्यासाठी आम्हाला रौंदळ आडनावाचे शिक्षक होते. आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ ह्या पुस्तकातील एक धडा समाविष्ट झालेला होता. शिक्षक त्या धड्यातील एकेक उतारा वाचून आमच्या चेहर्‍यावरील प्रतिक्रिया न्याहाळत होते. धड्यातील उतार्‍यात ‘बटाट्याची चाळ’ असा उल्लेख येत होता व त्याला अनुसरून लेखकाचे जे भाष्य होत होते, ते ऐकून आम्ही हसून प्रतिसाद द्यावा अशी शिक्षकाची अपेक्षा होती. तसा प्रतिसाद आमच्याकडून मिळत नव्हता म्हणून शिक्षक वैतागले.