मी ..... कोण ?
मी ..... कोण ?
मी कोण तुम्ही कोण
जन्माच्या वेळीच ठरवतात
जात ,पात ,धर्म,देश
ओळख तेव्हाच सांगून टाकतात !
'मी' म्हणायच्या आधी
"तू कोण " हे शिकवून टाकतात !
आधी होते बर मी यजुर्वेदी
लग्नानंतर झाले म्हणे ऋग्वेदी,
कुटुंबामध्ये आमच्या
आहेत कोकणस्थही चार ,
बिल्डिंग मध्ये आहेत ब्राम्हणच फार !
कॉलनीमधले मला 'मराठी'
म्हणून ओळखतात
शहरात इतर ठिकाणी फिरताना
'कोणत्या भागातली' म्हणून विचारतात ?
शहराबाहेर गेले तर ही' पुण्याची '
असे म्हणाले लोक ,
परप्रांतात गेले तेव्हा
'महाराष्ट्रयीन' म्हणाले ते कैक .
मिसळपाव
पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो, ट्रेनमध्ये एकटी बाई बघून लुटले आणि चालत्या गाडीतून ढकलून दिले. आपण हळहळतो, चुकचुकतो.आजकाल साधं जगणंही कसं सगळं अनसेफ झालंय अशा चर्चा करतो आणि पेपरचे दुसरे पान उघडत अजून एक चहा पितो.