Skip to main content

छंदाच्या पलीकडे

लेखक केतन बारापात्रे यांनी गुरुवार, 31/12/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक भेटी पूर्ण झालेल्या किंवा न झालेल्या, अनेक संवाद झालेले किंवा न झालेले त्यांच्याशी अतुटपणे जोडल्या गेले असतात समाधान आणि असामाधान दोन्ही एकाच रथावर जुंपल्यासारखे त्यांच्यासोबत चालत राहतात, समाधान आणि असमाधान एकसोबत जुंपलेले असूनही त्यांच्या सुरात तालात कमालीची शांतता आणि धीर असतो आणि ते फक्त आणि फक्त अनुभवायच असत. गझल किंवा ठुमरी यांचं माझ्यासोबतच वेगळच नात आहे खरंतर त्यांच्याशी नात जुळायला वेळ लागत नाही हे अत्यंत हळवं आणि तितकच जिव्हाळ्याच असत, विशेष म्हणजे याला कसलीच बांधिलकी नसते,कुठले करार नाही,कुठलीच मागणी नाही हे नात फक्त देण्यासाठी असत.

ऑपरेशन

लेखक समीर१२३४५६ यांनी गुरुवार, 31/12/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज रोहित हॉस्‍पीटलमधून लवकर घरी अाला, त्‍याची तब्‍येत ठिक नव्‍हती. येताक्षणीच त्‍याने आपला राग श्‍वेतावर व अश्विनवर काढायला सुरवात केली. श्‍वेता ही रोहितची दुसरी बायको होती, तर अश्विन त्‍याच्‍या पहिल्‍या बायको रंजनाचा मुलगा होता. होता.काही महिन्‍यांपूर्वी एका अपघातात रंजनाचा मृत्‍यु झाला होता, तेव्‍हापासून तोच आश्विनचा सांभाळ करत होता. आईच्‍या सांगण्‍यावरुन त्‍याने दुसरे लग्‍न केले होते,परंतू आल्‍या दिवसापासून त्‍याची दुसरी बायको श्‍वेता अश्विनचा छळ करीत होती, ती त्‍याला दिवसभर रगाडयाला लावत असायची आणि धड त्‍याला काही खायला ही देत नसे.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 31/12/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

विरहाची कास

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 31/12/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
देह फुलवात सांजेची ज्योत त्यागते कात नागिणीची माया ! अत्तराचे बंध वाहती सुगंध कपाळी गंध ओल्या चंदनाचा ! वाहता पान्हा कोरडा कान्हा जाहला गुन्हा देह बळजोरीचा ! अंतरात काटा फुटती लाटा जोगीयाच्या बटा कश्या विखुरल्या ! राऊळी नगारा राखेचा ढिगारा मोराचा पिसारा रानात गळाला ! सांगा साजणीस मनातले क्लेष उरात विष साठून ठेवले ! कुवार गर्भास पिशवीची आस विरहाची कास धरू नये ! सजली शेज वेगळाच बाज समुद्राची गाज ऐकू नये ! विजयकुमार......... 07 . 01 . 2010 , मुंबई

सोशल नेटवर्किंग (भाग १)

लेखक लाडू. यांनी गुरुवार, 31/12/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत. (कथा अन्यत्र पूर्वप्रकाशित) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मयंक सकाळी उठतो तो बेडवर कुठेतरी असलेला फोन चाचपडतच. ही त्याची नेहमीची सवय. रात्री डोळे आपोआप बंद होईपर्यंत फोन वर chat. मग फोन पडतो कुठेतरी. तो सकाळी उठल्या उठल्या हातात घेऊन मग बाकीची कामे. दिवसभर २४ तास मोबाईल हातात हवाच. चार्जिंग करणार तेव्हाही त्या फोनला आराम म्हणून नाही. online असण्याच जणू व्यसनच लागल होत.

माझ्या आठवणीत

लेखक माहीराज यांनी बुधवार, 30/12/2015 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेलो कधी सोडून तरी     मला कधी विसरु नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। हाती हात तुझाच होता        आता कोणती आस प्रीत माझी अखंड राहील        थांबेल जरी श्वास नाही दिली जन्माची साथ     म्हणून राग मनी धरू नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। जीवन होते माझे तरी      आधार तु जगण्याचा  प्रश्नच आता उरत नाही      मी तुला विसरण्याचा जीवन माझे संपले तरी      नाते आपुले तो
काव्यरस

शोध राजीव हत्येचा भाग १

लेखक गुल्लू दादा यांनी बुधवार, 30/12/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते , अंगातून घाम सतत पाझरत होता . मनाने तर संपच पुकारला होता , कशातच मन लागत नव्हते . 2 महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता . तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती . शरीर आता आराम मागत होते . तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला . मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले . बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच , मोहन ताडकन उठून बसत म्हणाला , " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं ." साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली .

ऋतू प्रेमाचा ( अंतिम )

लेखक मयुरMK यांनी बुधवार, 30/12/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
साधू संत महात्याम्यानी 'प्रेम करा, प्रेम करा, असे सांगितले आहे; खरे पण पण प्रेम म्हणजे काय माणसाना कळत नाही ते जर त्यांना कळले आसते ; तर प्रेमाविषयी पोकळ वल्गना कुणी केल्या नसत्या. प्रत्येकजन स्वत:च्या प्रेमभावनेला श्रेष्ठ समजत आसतो. तुझ्यासाठी जीव देईन तुझ्यासाठी जगाला ठोकर मारेन , अशा राणाभीमदेवी गर्जना सरार्स प्रेमिकाकडून केल्या जातात. आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करू शकू , असे प्रत्येक स्त्रीला वाटत आसते व तसे ती वारवार बोलून दाखवत आसते; पण तिला आढळून येते कि, तिचे प्रेम किती तकलादू व कमजोर आहे.

प्रयास

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 30/12/2015 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
(काल पोस्ट केलीली कविता ‪#‎वीट‬ , ही प्रियेसीच्या च्या नजरेने होती , आजची ‪#‎प्रयास‬ ,ही कविता प्रियकराच उत्तर …). तू जानारस होतीस , अन जाशीलही , मला राग आलाय , मी सालस असल्याचा तुला माहितेय, मी प्रयास सोडला नव्हता …… .माफी मागण्यात मी कच्चा आहे तुला माहितेय , मी हटहास सोडला नव्हता……. कदाचीत देव तरी इथं सच्चा आहे मला माहितेय … कि तुला माहितेय , मी एकदा नाही … चूक दोनदा केलीये अन दोनदा नाही …चूक तीनदा केलीये अन तीनदा नाही…. चूक शंभरदा केलीये म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये …. माझ्या चुकांना सुधारायची म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये ….
काव्यरस