Skip to main content

कवि बिल्हणाची 'चौरपंचाशिका' - एक शृंगाररसपूर्ण काव्य.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शनिवार, 09/12/2017 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
११व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या 'बिल्हण' ह्या काश्मीरी कवीच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या 'चौरपंचाशिका' ह्या कमीअधिक ५० श्लोकांच्या काव्यामागची कथा अशी आहे. काव्याचा कर्ता एका राजकन्येचा शिक्षक म्हणून कार्यरत असतांना तरुण शिक्षक आणि त्याची शिष्या हे परस्परांवर अनुरक्त झाले आणि कवि गुप्ततेने रात्री आपल्या प्रियशिष्येच्या सहवासामध्ये प्रणयक्रीडा करण्यात घालवू लागला. अनेक रात्री ही गोष्ट गुप्त राहिली पण अखेरीस राजाच्या कानावर ही गोष्ट पडली. संतप्त राजाने अपराधी कवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

लेखक गबाळ्या यांनी शनिवार, 09/12/2017 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514 अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो. बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. भू नकाशा लांघणारे चित्र आहे टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे कवळी शाबीत गळती नेत्र आहे शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे अंत ना आदि असे अजस्त्र आहे प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....

मृतदेह, संधीकाळ आणि सह्याद्री

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 08/12/2017 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
जगदीश्वराच्या प्रासादाचे शिखर स्पष्ट दिसत होते, कारण त्याच्यामागेच सुर्य हळुहळु मावळत होता. मावळतीच्या केसरी रंगाच्या पार्श्वभुमीच्या अलीकडे, जगदीश्वराच्या कळसाची गडद आकृती इतक्या लांबुन देखील समजत होती. पुर्वेकडुन चंद्रप्रकाश हळुहळु आकाश व्यापत होता. सुर्य आणि चंद्राच्या दरम्यानचे आकाश मात्र धुकटसे झाले होते. मध्येच एखादासा इवलासा ढगुला, कदाचित वाट चुकलेला ही असेल, आकाशात तरंगत दिसत होता. त्या ढगांच्या ही वर आकाशात घिरट्या घेणारे तीन भले मोठे गरुड कमी अधिक उंची वर एका विशिष्ट कक्षेत फिरत होते.

हिवाळी भटकंती: चंदेरी ( Chanderi )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/12/2017 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई - पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना उजवीकडे एक डोंगररांग दिसते, ती म्हणजे बदलापूर डोंगररांग .नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोयी, पेब , माथेरान ही शिखरे याच डोंगररांगेत येतात.

प्रातःस्मरण

लेखक शरद यांनी शुक्रवार, 08/12/2017 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रात:स्मरणम् पूर्वी सकाळी उठल्यावर प्रथम पुढील श्लोक म्हणावयाची सवय होती समुद्रवसने देवी पर्वत:स्तनमंडळे ! विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्व मे !! आता सकाळी उठल्यावर सोडाच पण दिवसाभरात सुद्धा भूमीला पादस्पर्श होत नाही.तेव्हा हा श्लोक संपला. सकाळी उठोनी देवाला भजावे ! गुरूला नमावे प्रेमभावे !! हे काही प्रात:स्मरण नव्हे व ही कविता आम्हाला नव्हती. लक्षात कशी राहिली देव जाणे. तेव्हा तीही नाही. पुढे संस्कृत वाचावयास सुरवात्र केली आणि विष्णु, श्रीराम, शिव, सूर्य इत्या॒दि अनेक देवांची प्रात:स्मरणे वाचनात आली.

|| गुरु महिमा ||

लेखक गबाळ्या यांनी शुक्रवार, 08/12/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

शेजाऱ्याचा डामाडुमा - मास..अहारू... गारुनु.... - मालदीव भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 07/12/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील आधीचे भाग येथे वाचता येतील :- http://www.misalpav.com/node/41427 http://www.misalpav.com/node/41552  जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडात मानवी संस्कृती नांदतात-बहरतात आणि मग कालौघात ह्या ना त्या कारणाने नाश पावतात. ह्या सर्व संस्कृती मागे काही ना काही ठेवा सोडून जातात.

एक कविता

लेखक रामदास यांनी गुरुवार, 07/12/2017 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
अरे , उधार माग , देतो ना चार करकरीत नोटा कधी देणार परत असं न पुटपुटता ... अरे, हिशोब माग , देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत , पण उंबरठ्यावर अडकण घालून , एक गाणं दे , एक गाणं दे असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला कसं माघारी पाठवायचं ??
काव्यरस

एका कथेची गोष्ट

लेखक दर्शना१ यांनी गुरुवार, 07/12/2017 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
उबदार पांघरुणाखाली पडल्या पडल्या श्रेयसीनं खिडकीतून बाहेर पाहिलं. आभाळ भरून आलेलं. अंधार पडायला सुरुवात झालेली. जरा पडू अजून म्हणता म्हणता संध्याकाळ उलटून गेलेली. घाईघाईनं उठताना खोकल्याची एक उबळ आली. तशी ती एकटीच होती घरी पण तरीही जणू काही ती खोकल्यावर भिंती कुरकुरतील म्हणून तिनं ती आतच दाबून टाकली. तिनं उठून टेबल लॅम्प लावला आणि खुर्चीवरची शाल ओढणीसारखी अंगावर घेत चहा करायला किचनकडे निघाली. पण त्याआधी टेबलवर विखुरलेल्या कागदातून ती लिहीत असलेल्या पुस्तकाचं शेवटचं पान उचलून, एक भिरभिरती नजर टाकून तिनं वाचलं. चहा करता करता तिच्या कथेतल्या पात्रांचा विचार करू लागली.