क्षितिजावरती पहाट होता..... !!!
क्षितिजावरती पहाट होता अचानक मज आज ये जागृती |
गिरिशिखरांच्या वाटेवरूनि अन् पाऊले मग घेती गती ||
फिरता फिरता असा थबकलाे पाहुनी सुंदर तो देखावा |
मुग्धपणाने अनिमिष नेत्रे तृषार्तापरी पिऊनच घ्यावा ||
पर्वतराजींमधूनि हिरव्या, सूर्यबिंब ते प्रकटत जाई |
झाडे, वेली, फुले, पाखरे, आसमंतही प्रकाशित होई ||
दूर कपारीतुनि एखाद्या, ये धावत फेसाळत धार |
शांत, संयमी, गंभीरपणे अन् विस्तारीतसे तनमनी अपार ||
स्तब्ध उभ्या त्या वृक्षावरती कुणी एखादा येई पक्षी |
दोन क्षणातच अवरोहाची फुलवूनि जाई अद्भुत नक्षी ||
असाच उभा असता मी तेथे, सृष्टीचे न्याहाळीत रूप |
चाहूल लागे मजला काही, व्यक्त करी कोणी अप्रूप ||
घेऊ
Four fundamental forces बहुत 'लोकां'सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना
राजा विक्रमाच्या राज्यात अभूतपूर्व अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रमाच्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वातच एक भयंकर रोगाची साथ आली होती. नवा रोग, नवी लक्षणे, नवीन उपचार, नवीन लस या सर्वात जगाचं लक्ष तर होतंच पण या रोगामुळे तयार झालेल्या नवीन धोक्यांची नक्की काय काय तयारी करायची आणि धोका नक्की कुठून येईल हे सारंच कळण्यापलीकडे गेलं होतं. संपर्कात येणारा कोणता माणूस आपल्यासाठी तो रोगकारक विषाणू घेऊन येईल आणि त्याने आपण आजारी पडू हे सारंच हाताबाहेर गेलं होतं.
तू ठरव...
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा
फायदा नात्यात आता फारसा नाही!
एवढा केला खुबीने खूनही माझा
वारही केला असा जो वारसा नाही!
सांगतो आहे जगाला कोण हा वेडा!
मी असा नाही असा नाही असा नाही!
कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना
एवढीही या मनाला लालसा नाही!
तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही...
—सत्यजित
प्रेम..
प्रेम..
प्रेम म्हणजे
अथांग सागर
प्रेम म्हणजे
वाळवंटातील मृगजळ
ज्याने तहानलेल्याची
तहान काहीकेल्या
भागत नाही
प्रेम म्हणजे
विश्वास
प्रेम म्हणजे
आपुलकी
जो वेळप्रसंगी
माणुसकीला जागलेच
असे नाही
प्रेम म्हणजे
अटी
प्रेम म्हणजे
बंधन
जे माणसाला
एक माणुस म्हणुन
वागवत नाहीत
मुक्तपणे जगु देत नाही
तरीही हे प्रेम
वाटे मजला हवेहवेसे
ते प्रेम
जे एकमेकांच्या
अबोल गोड शब्दांचे
एकमेंकाच्या साथीचे
समोरच्याच्या मंद गुढ
हास्यातले
ते प्रेम
जे आयुष्यात
देवघरातल्या
नंदादिपाप्रमाणे
अखंड तेवणारे
स्वतः जळून
काळोख मिटवणारे
-दिप्ती भगत
(२०जून,२०१९)
काव्यरस
सुंदर हे जग!
- डॉ. सुधीर रा. देवरे
‘मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येतात, की वाटतं, आता आहे त्यापेक्षा हे जग कितीतरी पटीनं नक्कीच सुंदर असू शकेल!’ हे अवतरण माझ्या ‘पंख गळून गेले तरी’ या आत्मकथनातील आहे. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, प्रांतभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्याला कमी लेखणं, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगुलचालन, मत्सर, व्देष, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी, कोणाच्या व्यंगांकडे पाहण्याचा दुषीत दृष्टीकोन आदी गोष्टींतून आपण बाहेर कधी पडायचं?
आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही.
भेट .....
भेट .....
सागर गोटे अन भातुकली
आठवते का ग आता ?
किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले
असतील अजून पण ......
तुझ्या वहीतल्या पहिल्या
पानावर माझे नाव लिहिताना
किती खाडाखोड ? ...पहिल्याच ओळीत !
आणि नंतर, पान भरून लिहिलेलं ... !
जेव्हा पुन्हा भेटशील तेव्हा
'ती वही' घेऊन ये .....
पानावरची 'तारीख ' सोडली तर ...
अजून काही जसंच्या तसं शिल्लक आहे का
हे तपासून पाहूया ......
नसेल तर .........
तर .....
मला कसलेही प्रश्न नको विचारू ... ... !
तुझ्या मनातल्या प्रश्नांपेक्षा ....
माझ्या डोळ्यांसमोर उभे असलेले प्रश्न .....
खूप मोठे असतील कदाचित .......
प्ले लिस्ट
दररोज भेटणारी माणसं आणि प्ले लिस्टमधली गाणी यांच्यात मला कमालीचं साम्य वाटतं. नव्या माणसाला भेटण्याचा अनुभव एखादं नवं गाणं ऐकण्यासारखाच असतो की. कधी ते माणूस/गाणं इतकं भावतं की आपल्या प्ले लिस्ट मध्ये त्यांच एक हक्काचं स्थान तयार होतं. काही गाणी मात्र आपण आयुष्यात एकदाच ऐकतो आणि काही व्यक्तींशी आपला संबंध येतो तो ही आयुष्यात एकदाच. ती गाणी ऐकण्याची किंवा त्या व्यक्तीला भेटण्याची परत इच्छा होत नाही. याचा अर्थ त्या गाण्यात/माणसात काही कमी होतं असा मुळीच नाही. फारफारतर त्यांची आणि आपली 'ट्युनिंग' जमली नाही इतकंच.
नक्की प्रॉब्लम काये ?
एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्याशी आंतरजालीय ओळख आहे.
सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.
कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.
____________________________________________
१. देवभोळे लोक :
जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे.
देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे.
थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही.
देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.
मिसळपाव