माझे मराठी लोकांबाबतचे निरीक्षण. आपण आपल्या वडिलांच्या, आईच्या, आजोबांच्या वा आज्यांच्या नावांकडे बघितले तर लक्षात येईल की त्यांची नावे हौसेने कुणी ठेवत नाही. अलीकडच्या ३०-४० वर्षात नव्यानव्या नावांची फॅशन येत आहे. मिलिंद, पराग, अतुल, प्रमोद, संदीप, राजेश, राहुल, वैशाली ही नावे एकेकाळी नवी समजली जात असतील. आज अथर्व, ऋग्वेद, शुभम (हे काय विचित्र नाव बुवा?), मिताली, गंधाली, शेफाली (की शेफारली), अंकिता, अनिका, करीना असली काहीतरी नावे ऐकू येतात. अजूनही काही असतील.