Skip to main content

ह्या परदेशात.....!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 19/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पायवाट चालून आलो खूप चढण चढून झाली मागे वळून बघतो तेव्हा आम्ही खूप सुखी होतो असे खरेच वाटून जाते असे मनात अलगद येते कठीण होते सगळे जगणे तरी खूप सुख होते एक खांबी तंबू होता तरी मनगटात जोर होता तसा शप्पत घोर नव्हता पाठीवरती हात होता भक्कम असा आधार होता हे शप्पत खरे होते .....!! !
काव्यरस

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 19/08/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

धिक्कार हो!

लेखक दैत्य यांनी शुक्रवार, 19/08/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा धिक्कार हो तुझ्या जिण्याचा तू एक पणती मिणमिणती भिकार ते दिवाळीतले फटाके जे ऊजळती राहून तुझ्या संगती भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू लेखणी सुतकी रडू लागली वासना तुझ्या विनोदी झुरळ ते वहाणही कच खाऊ लागली जोहार हे जगणे तुझे अन न मागताच तू मुंडके दिले सशाचे फुकाचे हृदय तुझे अन ढगाने मदाने हसूं पाहिले पाटच्या पाण्यातसुद्धा रंग तुजला दिसला खूनाचा वारही तूच केलेस अन खर्चही मागशी आता वेदनांचा प्रेम जे केलेस तेही चोरट्यांना भरपूर दिसले मद्य जे प्यालेस तेही शंभरांना आधीच प्याले प्रार्थना जशी तुझी ती भज्यांवरची माशीच की कंटाळूनी तो हाकली देवही शिळे लपविण्या त्यासही यत्न की अ
काव्यरस

क्रांती -- काही असे काही तसे ,,, पुन्हा पुन्हा जगावेसे

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 18/08/2011 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला). मा.

अनुभव : मिसळ आणि जीवनातले

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 18/08/2011 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी अनेकांनी तो चित्रपट पाहीला असेल. त्यात अगदी सुरुवातीच्या प्रसंगात रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर कुणी चोर सुनील दत्तचे पाकीट मारतो. बघणारे असंख्य लोक लगेच पुढे येतात, म्हणतात "याला आमच्याकडे सोपवा, आम्ही याला ठीक करू" यावर सुनील दत्त म्हणतो," ये है मेरे देश की जनता, यहां हर आदमी किसी ना किसी चीज से परेशान है, सरकार के भ्रष्टाचार से लेकर इंडियन क्रिकेट टीम की हार तक सब चीजों से ये लोग परेशान है , लेकीन ये सब चूप है, किसी की मूंह से आवाज नही आयेगी, कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा" आणि सुनील दत्त पुढे त्या चोराला म्हणतो, " कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा,

विचारवंत!

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 18/08/2011 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा विचारवंत हवे आहेत... या देशाला हवे आहेत विचारवंत, अस्सल विचार करणारे विचारवंत, मेंदू चालत असूनही वैचारिक षंढत्व बाळगून लाठ्याकाठ्या, दगडफेकी करणाऱ्या स्नायूप्रतापींच्या घोळक्यात अचल रहाणारे विचारवंत, अडाणीपणाला अन आडमुठेपणाला आपल्या बलदंड निर्धारांनी, तिलांजली देणारे विचारवंत विचारांची धार असलेल्या कणखर लेखणीपुढे तलवार वाकवणारे विचारवंत सडकेपणावर थुंकणारे विचारवंत, वादळांना फुंकणारे विचारवंत, शून्यात स्वर्ग पाहू शकणारे विचारवंत, राष्ट्रासाठी मरण्याऐवजी राष्ट्र जगवणारे, जागवणारे विचारवंत, कुठे मिळतील असे विचारवंत?, इतिहासात अंधारच होत
काव्यरस

गुलझार ह्याना वाढदिवसाच्या शुभेच्या...

लेखक पान्डू हवालदार यांनी गुरुवार, 18/08/2011 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिशकालीन भारत के झेलम जिले (अब पाकिस्तान में) 18 अगस्त, 1936 को एक सिख परिवार में जन्मे गुलज़ार लेखक और कवि बनने से पहले दिल्ली में एक कार मैकेनिक हुआ करते थे... गुलझार ह्याना वाढदिवसाच्या शुभेच्या...

उहापोह

लेखक निनाव यांनी गुरुवार, 18/08/2011 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
झिजलेल्या काठची माती गिळून विस्तारणारे तळे ऊंच लाटांमधल्या रागाचे सुटणारे संयमाचे कडे पाउस न पडताच मातीतली दडपण पाउलवाटे वरची विचारांची वण्-वण! पानगळीतल्या गीतात नव्या पालवी चे स्वर न बदळणार्या रीतीं वर बदळणारे अगणित मत! ओळखीचे भाव अनोळखी चेहर्‍यांवर भिंत्यांवरची ओल उतरते हळुच फरशी वर खिडक्यांवर डोकावते सुंदर पानांची वेल नव्-आकृतीत जागा शोधण्याचे खेळ! परिस्थिती? कि मात्र एक क्षण? अभिव्यक्ति? कि मात्र एक अनुभव? खेळ? योगा-योग? कि भाग्यच हे? बहुतेक, नकळत मनावर उठणारे वण!