Skip to main content

सगुणा बाग

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 27/03/2013 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा माझ्या “रौप्य महोत्सवाच्या” निमित्ताने कुठे तरी फिरायला जावे अशी मीच टुम काढली.. घरची मंडळी पण भलत्याच उत्साहात चर्चा करू लागली. मी पण तातडीने मि .पा वर माहित असतील नसतील त्या सगळ्यांना व्य.नि करून टाकला आणि वर ही पण तंबी दिली की "सोबत १० महिन्याचा छोटा अबीर आहे तेव्हा त्या हिशोबाने काय ते सुचवा.." ५० राव, मोदक, बॅटमॅन सगळ्यांनी उत्साहानी ठिकाणे सुचवली.शेवटी भरपूर शोधाशोध करून "सगुणा बाग " हे ठिकाण निश्चित केले.खरं तर तिथे ट्रेननेच जायला पाहिजे,नेरळ स्टेशन वरून फक्त १० मिनिटा वर हे ठिकाण आहे. पण मी "अबीर ला झेपेल का? नाही जागा मिळाली तर त्याला घेऊन कुठे बसू?

तो आवाज आजही मला साद घालतो..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 27/03/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
"प्लॅटफॉर्म क्रमांक दो पे आनेवाली लोकल अंधेरी के लिये धीमी लोकल है..." एका महिला निवेदिकेचा गोड आवाज कानावर पडत होता. पण ज्या ट्रेनसाठी ही अनाऊंसमेंट होत होती त्या ट्रेनने मात्र केव्हाच स्टेशन सोडले होते. तीन-तीन भाषांमध्ये अनाऊंसमेंट करायच्या नादात हे असे होत असावे. पण निदान मग शेवटच्या वाक्यात आनेवालीचे जाने’वाली तरी करायचे. असो, कोणाला काय फरक पडतो. तसेही मुंबई लोकलने प्रवास करणार्‍यांमध्ये या बाईच्या आवाजावर विसंबून राहणारे मोजकेच असावे. आवाजावरून आठवले, या आवाजाच्या उगमाचा शोध कधी ना कधी तरी नक्की घ्यायचा होता मला.

अन्नपुर्णा

लेखक शरद यांनी बुधवार, 27/03/2013 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नपुर्णा आपल्या येथे भक्त व देव यांचे एक अतूट नाते आहे. देव आपला माय-बाप असतो, बंधु-भगिनी आणि सखा-शेजारीही असतो, आपल्यातलाच एक असतो. आता शेजारी म्हटले की आपण शेजारच्या घरांत चाललेले नवरा-बायको यांचे तंटे-बघेडे जेवढ्या चवीने ऐकतो व इतरांना रसभरीत भाषेत, थोडा पदरचा मसाला घालून, सांगतो, तेचढ्याच तन्मयतेने कवींनी देवांच्या घरी चाललेली भांडणे रंगविली आहेत. आता घरांत लक्ष्मीची चणचण असेल तर भांड्याला भांडे जास्त वेळेला लागणार व आवाजही मोठा होणार हे ओघानेच आले. एकदा काय झाले आता शंकर हा "विश्वनाथ", विश्वाचा अधिपती, पण यांनी त्याच्या हातात दिले काय तर भिक्षापात्र !

हौसेने उन्हाचा भिमाशंकर होणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 27/03/2013 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रांसाहित हा लेख येथे वाचता येईल. http://sagarshivade07.blogspot.in खांडस मार्गे भीमाशंकर "हौसेने उन्हाचा भीमाशंकर होणे" हि सागर बाबांनी मराठी भाषेला बहाल केलेला वाक्रप्रचार आहे. पू.ल.

फक्त मराठी

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 27/03/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या एका पुढाऱ्याने असे फर्मान काढले कि .महाराष्टात राहीचे असेल तर फक्त मराठीतच बोला ,लिहा ,इंग्रजी,हिंदी, किंवा इतर भाषांचा प्रयोग चालणार नाही ,जो असे करणार नाही त्यास कडक शिक्षा दिली जाईल . फक्त मराठी चे फर्मान निघताच अनेकांचे धाबे दणाणले ,पुष्कर टेलर्स असे नाव लिहिलेली पाटी पुश हा इंग्रजी शब्द असल्याने ढकलकर शिंपी अशी पाटी दिसू लागली ,दिनकर ,दिवसकर झाला ,गोकुळ चे जाकूळ झाले,ऐअरटेल चा फलक वायू गोष्ट असा दिसू लागला ,कोलगेट टूथ पावडर ,कोळसा दरवाजा दंत पूड झाले,एका दुकानदारां कडे एक मुलगा काकाचक्त्या मागू लागला . दुकानदारास काहीच समजले नाही,मुलाने बोट दाखवले तेथे अंकल चिप्स

तो हसत होता

लेखक निमिष ध. यांनी बुधवार, 27/03/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी चालत होतो. भोवताली अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिव्यांची लखलख होती पण हा भाग तसा अंधाराच होत. वातावरणात चांगलाच गारवा होता. थोड्यावेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे पायवाट ओली होती. अंदाजे मैलावर असलेली प्रकाशाने न्हाहून निघालेली इमारत माझी मंझील होती. तिच्याकडे पाहत कशाचीही परवा न करता मी चालत होतो. आजूबाजूला अगदी तुरळक वावर होता. चुकूनच एखादा माझ्यासारखा वाटसरू दिसत होता. जसा जसा उशीर होत होता तसा माझ्या पावलांचा वेग वाढत होता. मोठ्या स्तंभाला मागे टाकून मी आता परावर्तीत तळ्याच्या काठावर आलो होतो. तळ्यामध्ये एका बाजूने स्तंभाचे तर दुसर्या बाजूने इमारतीचे प्रतिबिंब पडले होते.

युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ५ भाग शेवटचा...........!!

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/03/2013 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१) युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २ युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ३ युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ४ हिमलरने ऑशविट्झला १७ जुलै १९४२ च्या संध्याकाळी भेट दिली. या भेटीदरम्यान त्याने तेथे असलेल्या अधिकार्‍यांना ज्यूवंशसंहार हे आता राईशचे अधिकृत धोरण आहे हे उघडपणे सांगितले.

रंगुनी रंगात मधुर.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 27/03/2013 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
रंगुनी रंगात मधुर............ दिन रंगांचा आजला कल्लोळ भावनांचा उरी, रुसलीस तू, खुलवींन मी आज उधळूनी रंग तुजवरी !. विरतिल गडद रंगांत ह्या राग रुसव्याच्या खुणा, उरतील मागे पुन्हा प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा ! विविध रंग घेउन सवें पोहोचलो द्वारी तुझ्या, बावरली तू गोड अईसी फुलले गुलाब गालीं तुझ्या ! ढळला पदर, आरक्त मुखचन्द्रम़ा, स्मितबरसात इन्द्रधनुसम भासली,
काव्यरस

दुबईची काळी बाजू!

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 27/03/2013 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वी मध्यपूर्वेतील कुठल्या तरी देशात वेठबिगार करायला भाग पडलेल्या कामगारावर लेख होता. आज तसाच एक लेख दुबईवर सापडला. वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारा हा देश खरे तर गरीब कामगारांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेला आहे. ह्या कामगारांना बांगला देश, पाकिस्तान आणि भारत अशा देशातील गरीब लोकांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का दुबईत उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपला देश आणि तिथली गरीबी परवडली अशी त्यांची परवड होते. अगदी उच्चपदस्थ परदेशी लोकही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते.

राजेश सातमकर

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 26/03/2013 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” असे बोलून माझ्या मनातली नेमकी कळकळ एकेकाळी शब्दात व्यक्त करणारा आणि त्या वाक्याने एकदम जीवलग बनलेला एक साधा सरळ मुलगा, राजेश सातमकर. १९९० साली दहावी नंतर आमच्या शाळेच्या परंपरेप्रमाणे (आमची शाळा तंत्र-निकेतन होती, आठवी ते दहावी टेक्निकल) डिप्लोमासाठी भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेतली. त्यावेळी वर्गात शिकवलेले सगळेच्या सगळे इंग्रजीत असल्याने काही म्हणजे काही कळायचे नाही.