Skip to main content

दिवाळीच्या निमित्ताने : वर्दीतला "तो" आणि आपण.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 26/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,एव्हाना सगळीकडे दिवाळी निमित्त धामधूम सुरु झाली असेल....नवीन खरेदी,फराळाची तयारी,छान छान बेत अशा उत्साह वातावरणात ओसंडून वाहतोय....एरवी महागाईने कंबरडे मोडलेले असले तरी ह्या दिवसात माणसं जमेल तशी हौसमौज करून घेतातच. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गणल्या जाणाऱ्या वर्गात तर दिवाळी हे मोठेच प्रस्थ असते.

सुखाच्या शोधात.....

लेखक गजानन५९ यांनी शनिवार, 26/10/2013 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या शोधात..... चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी

थरार..... एक विलक्षण अनुभव - भाग १

लेखक गजानन५९ यांनी शनिवार, 26/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझे लेखन इथे टाकत आहे. येथील हि माझी पहिलीच कथा त्यामुळे प्रतिसाद कसा मिळतोय याबद्दल भरपूर भीती आहे मनात. आशा करतो कि तुम्हा सर्वाना हि कथा आवडेल. आपला गजानन अवांतर – हि कथा इतर ठिकाणी पूर्वी प्रसिध्द केली आहे, मिसळपाव आधी माहित नव्हते गेले काही महिने इथले दर्जेदार लेख आणि एकूण साहित्य वाचून इथे हि कथा टाकायचे साहस करत आहे सांभाळून घ्या इतकीच विनंती हाये. ----------------------------------------------------------------------------------------------------------- गाड्यांच्या आवाजाने सकाळी शेखरला जाग आली वैतागून त्याने मोबाईल मध्ये पहिले तर आठ वाजून गेले हो

डोंबिवली डाटाबेस.....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 26/10/2013 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १७ नोव्हेंबरला दिवाळी कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. साधारण पणे दर ३/४ महिन्यांतून एकदा तरी एकत्र येण्याचा मानस आहे. बर्‍याच जणांची कट्ट्याला हजेरी लावायची इच्छा असते पण वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे, इच्छा आणि वेळ असून देखील, प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही. त्यामुळे मला असे वाटते, की आपण एक डाटाबेस तयार केला तर? त्यात मोबाईल नं. आणि इमेल आय.डी. असेल तर प्रत्येक वेळी त्यांना निरोप हमखास मिळेल. त्याची एक एक्सेल शीट तयार करू आणि मग ती वेळोवेळी अपडेट करून ग्रुप मधल्या सगळ्यांना पाठवु. सध्या सोयीसाठी म्हणून फेसबूकवर मिपा डोंबिवलीकर कट्टा बनवला आहे.

हायकू -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 25/10/2013 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाठमोरी तू सळसळणारी तू मनात फडा . . . भिंतीला कान कानात गोळा प्राण वाद अबोल . . . एक मनात दुसरेच जनात हेही जिणेच . . . पान पिकले मन हिरवटले नसती नशा . . . गुलाबी गाल उत्साहाची धमाल वेळ गेलेली . . .
काव्यरस

आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….

लेखक घन निल यांनी शुक्रवार, 25/10/2013 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली … माझे मला वागण्याचे कोडे का पडावे , आसे काहीसे विपरीत का माझ्या हातून घडावे माझीच व्यथा अनावर … माझा पोटशूळ ठरली … आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. माझ्याच दोन आसवांचे सामने खेळतो मी , बेधुंद यातनांच्या कैफात लोळतो मी … डोळ्यात अखेर माझ्या आसवेंच उरली …. आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली …
काव्यरस

भांडणानंतर...

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 25/10/2013 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
खोटेच आहे रागावणे, तुझेही अन् माझेही तोंड फिरवून झोपणे, तुझेही अन् माझेही अबोला जरी धरून, आसमंत आज सारा अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही कोण चुकले कोठे, जाणतो मनी दोघेही माघार परी न घेणे, तुझेही अन् माझेही घन बरसत आला होता, त्या कोणी ना पाहीले सांग कसे हे वागणे, तुझेही अन् माझेही अंगार निवता जरा, स्वत:शीच हासून मग ते विषय बोलण्या शोधणे, तुझेही अन् माझेही - चाणक्य २०/१०/२०१३
काव्यरस

नाही म्हणायला शिका.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 25/10/2013 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला आजवरच्या आयुष्यात अनेक विविध प्रसंगांत वेळोवेळी कधी न कधी तरी "नाही" म्हणण्याचे राहून गेले असे झाले असेल. आपले नातेवाईक, शेजार पाजारी समाज काय म्हणेल या भीतीने वेळोवेळी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत असतील. तसे बघा यला गेले तर त्याची सुरुवात आपल्या घरातल्या माणसांपासूनच होते असे म्हटले तरी चालेल. पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतो. मुलगा/ मुलगी १ ० पास झाली कि कला, वाणिज्य आणि शास्त्र यापैकी शास्त्र हा विषय घेवून त्याने डॉक्टर किवा इंजिनियर व्हावे असे वाटते. भले मग तो विषय त्याला आवडो अगर न आवडो किवा त्याला अभ्यास झेपेल/ नाही झेपेल या विषयी त्याचे मत विचारात घेतले जात नाही.जर तो मुलगा/ मुलगी ठामपणे वेळीच नकार देवू शकला, तर आपल्या हव्या त्या विषयात निपुण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.--break--> आज अशी बरीच उदाहरणे आपल्याला अभिनय क्षेत्रात दिसतील कि जे पेशाने डॉक्टर/इंजिनियर असून सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. उदा. डॉक्टर काशिनाथ घाणेकर , डॉक्टर सलिल कुलकर्णी, डॉक्टर गिरीश ओक तर मेडिसीन मध्ये उच्च शिक्षण घेता घेता ते अर्धवट सोडून समाजकारणात शिरलेल्या मृणाल गोरे हे एक वेगळे उदाहरण. जे गोष्ट शिक्षणाची तीच लग्नाची. मुले उपवर झाली कि त्यांचे लग्न ठरवताना कित्येकदा पालक मुलांच्या मनाचा विचारच करीत नाही. काही वेळा धाकाने तर काही वेळा कौटुंबिक परिस्थिती जाण असल्याने मुले/मुली लग्न उरकून घेतात पण मग पुढे संसारात त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. काही जण मग मन मारून नमते घेतात आणि आलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेतात हे जुळवून घेणे म्हणजे काय तर पुढे आयुष्य भर ते "नाही" हा शब्दच कधी उच्चारात नाहीत. तर काहींनी नंतर नाही म्हटल्या मुळे त्यांचा संसार सुखाचा होत नाही. हे सर्व वेळीच "नाही" म्हटले असते तर टाळता आले असते. --break--> या गोष्टीत तर मुलीना तर ती फक्त मुलगी आहे हे मनावर बिंबवून "तू हे करू नको, ते करु नको"असे वारंवार बजावले जाते. आणि मग ती मुलगी पुढे कुठल्याच गोष्टीला विरोध करित नाही.

तुझे एकेक विचार.......

लेखक psajid यांनी शुक्रवार, 25/10/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे एकेक विचार जपलेत मनांत, तूच दिलेले श्वास आज पिंजऱ्यात......!! आज पिंजऱ्यात जन्मा जन्माची साथ, तन बंबाळ जखमांनी अन वाट पायात......!! वाट पायांत अन आग दही दिशात, होरफळत चाललो मी तुझ्या एका वचनात......!! तुझ्या त्या वचनात प्रेम बलिदानात, हृदय घायाळ पण हसं डोळ्यात.......!! हसं डोळ्यात वाराही शांत, थकून गेलो मी शेवटच्या सहवासात........!! तुझ्या शेवटच्या सहवासात अनोळखी क्षणात, पानगळीच जगणं .....आणि बाकी शून्यात ...........!! .....आणि बाकी शून्यात ...........!! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

तेंव्हा आणि आता ...

लेखक माशा यांनी शुक्रवार, 25/10/2013 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा नुसती अश्शी भिरभिरायची नजर आता बाजूला माझ्यावरच तिरकी नजर ! मनात येताच मित्र जमून करायचो कल्ला 'विचारून' बाहेर जाताना आता ऐकतो सल्ला ! तेंव्हा चापायचो हॉटेलात जाऊन चिकन हंडी आता आवडून घेतो सात्विक मुगाची खिचडी ! तेंव्हा कशी वेगात बुंगाटत होतो बाईक आता 'मागून येणा-या' सूचनेचा पाईक ! तेंव्हा कधी बाळगली नाही तमा आयुष्याची आता जाणवते जबाबदारी तुझ्याही आयुष्याची ! - माशा
काव्यरस