Skip to main content

हिंदु पुरुषांना एका पेक्षा अधिक विवाह करण्यास प्रतिबंध नसावा !

लेखक मारवा यांनी गुरुवार, 26/12/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचे कायदे विचीत्र आहेत इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही.

छोटीसी मुलाकात प्यार बन गयी...

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 26/12/2013 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावीचं वर्ष. शाळेच्या युनिफॉर्मचा त्याग करून कॉलेजच्या कट्ट्यावर फॅशनेबल कपड्यांत रॅम्पवॉक करायला उत्सुक असलेल्या शेकडो मुलींची चाल; आणि आपल्या सात-आठ जणांच्या घोळक्याला कॉलेज सुरु होऊन तीन-चार महिने उलटले तरी अजुनही एकाही संघभेदिकेचा लाभ का झाला नाही या व्यथेत पडलेल्या माझी नजर यांची सतत पकडापकडी चालायची. पकडापकडी का, झटापटीच म्हणा ना. या सुंदर मुली स्वत:बरोबर त्यांच्यावर जळणा-या, राहणीमानाच्या पद्धतीत त्यांची नक्कल करणा-या किमान एक-दोन मुलींना सोबत घेऊन फिरत असायच्या.

हिवाळ्याची मौज: फुलगोभी मटार पोहे

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 25/12/2013 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी रहात असेलेल्या उत्तम नगर भागात डिसेंबर महिना सुरु झाल्या बरोबर भाज्या स्वस्त होऊ लागतात. ४-५ किलोमीटर दूर एक मोठी सब्जीमंडी आहे व दिल्लीचा ग्रामीण भाग ही जवळ आहे. शिवाय येथे दररोज जवळपास (किलोमीटर आतच कुठे न कुठे साप्ताहिक बाजार लागतोच). गेल्या सोमवारच्या बाजारात सर्वच भाज्या पालक, बाथू, सरसों, मुळा, गाजर इत्यादी १० किलो होत्या. फुलगोभी ही १० रुपये किलो आणि कोथिंबीर ५ रुपये पाव, त्यामुळे ३५ रुपये किलो असलेले मटार घेणे परवडण्यासारखे. (मुंबई वाल्यांना जळण तर नाही होत आहे) दररोज संध्याकाळी घरी (७-७/३० मध्ये)पोहचल्या वर चहा बरोबर नाष्टा हा असतोच.

अनुप्रीती

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 25/12/2013 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
विलयखुणा जन्मावरती; मन उलगडते ती अनुप्रीती चिरंजीव; खडकावरही असते प्रेमाची अनुभूती काळ युगे हतबल शरणागत कली कळा निष्प्रभ भवती हरित वाण अंकूर सदा; ऋतु वयातीत जणु वावरती ओलांडे यातना पर्व वेदना पर्वतांच्या भिंती खळे अवखळे फ़ेसाळे निर्झर निर्मळतम ध्येयगती तमा ना कुणाची वा भीती लाघव सरिता ओघवती काठ किनारे तृप्त; सुप्त समृद्ध क्षणांची ही भरती …………………………. अज्ञात
काव्यरस

धर्मांतरे का होतात ?

लेखक सचीन यांनी बुधवार, 25/12/2013 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे? लोक धर्मांतर का करत असावेत? माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?. धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही.

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 25/12/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
Power Stations मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान मागील भागावरून पुढे चालू ... काही विशिष्ट रसायनांमध्ये दोन भिन्न धातूंचे कांब (रॉड किंवा इलेक्ट्रोड्स) बुडवून ठेवले आणि त्या कांबांना तांब्याच्या तारेने जोडले तर त्याम

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/12/2013 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ|| गेलो तुळशी मंजीरा घ्याया तेथे न तू गावला राया ||१|| गेलो राऊळी शोधाया शोध व्यर्थ गेला वाया ||२|| चंद्रभागेकाठी तू न सापडेना तुझ्याविण मन शांत होईना ||३|| शोध घेतला शोध घेतला अंती नाही तू भेटला ||४|| पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५|| - पाभे
काव्यरस

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी बुधवार, 25/12/2013 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

योग – प्रतिबंधात्मक उपाय

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 25/12/2013 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
योग – प्रतिबंधात्मक उपाय शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो कि उत्क्रांतीतून मर्कटाचा मानव झाला.मनुष्य प्राणी हा जरी जात्याच बुद्धिमान असला तरी त्यास पडलेले एक कोडे उलगडत नव्हते, ते म्हणजे या जीवनाचे ध्येय काय ? महामुनी पतंजलींनी हे कोडे उलगडले - नश्वर जीवनास योगरूपी संजीवनी देऊन ! योग हा शब्द संस्कृत धातू 'युज' पासून बनलेला आहे.युज म्हणजे संयोग पावणे वा एकत्र जुळून येणे. आत्म्याचा परमात्म्याशी संयोग म्हणजेच योग होय ! योगमध्ये प्रामुख्याने चार प्रवाह मानले जातात – कर्म योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि राजयोग .राजयोग हा महामुनी पतंजली प्रणीत अष्टांग योगाचाच एक भाग आहे.