Skip to main content

अस्तित्व

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 25/12/2015 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
. अस्तितत्वता नसते जिथे या जगाची दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती रम्य निर्मळशा सरिते काठी शांत-शांत ...
काव्यरस

मटार -कांदे परांठा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 25/12/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
हिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते. गेल्या रविवारी भाजी स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला. मटारच्या वरील सर्व भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली. साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला. त्याचीच कृती खाली देत आहे.

इंद्रधनुष्याचा पाठलाग.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 25/12/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
. “माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.” वसुंधरा नाडकर्णी एक चांगली पत्रकार आहे हे मला माहित होतं.एका स्थानिक वर्तमानात ती रिपोर्टर म्हणून सुद्धा काम करायची.अलीकडे ती पर्यावरणावर अभ्यास करीत आहे.पर्यावरण हा सध्या बहूतचर्चीत विषय झाला आहे.काही श्रीमंत देश स्वतःच्या जरूरी साठी आणि उर्जा मिळवण्यासाठी पृथ्वीवर भरपूर प्रदुषण करून आपली उर्जीतावस्था करून घेऊन श्रीमंत झाले आहेत

!! मद्य !!

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 24/12/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
या मदिरालयात सगळेच धुंद जाळुनी स्वत:स दिवे जाहले मंद पसरला सर्वत्र अस्पृश्य गंध रिचवुनी चषक, उरले रक्तांध !! किती बुडवावे क्लेष चषकात? मद्याने मेंदू बधीर कळ हृदयात जमतात इथे दुख: विसरण्या उद्याचे कोणी काही म्हणा, साम्राज्य आहे मद्याचे !! खर्चुनी पदर, स्वत:स विकतात हाय! पिळविटणा-या संगीतात रिझतात स्वत:ला फ़सवुनी, प्रतारणा करतील अम्रुताही लाजवेल हे विष, पिऊनी मरतील !! काजव्याची हि लढाई, करतील प्रकाशाशी स्वत:स पेटवुनी, ठेवतील कोळश्याच्या राशी ह्यांचे दु:ख कुणा का ऊमगेना ? ह्या मद्यमेळ्यात का मी उभा मज समजेना...............!! विजयकुमार.........

भय वाटते

लेखक मनमेघ यांनी गुरुवार, 24/12/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते, ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते! क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते! बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!! हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!! आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!! -मनमेघ टीप- ही गझल नाही. गझल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा तंत्राचा मुद्दा बाजूला ठेवून वाचावीत ही नम्र विनंती.
काव्यरस

कविता

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 24/12/2015 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणतेस कवितेतल, तुला काही कळत नाही पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही हलकी हसतेस नजरेतून, अदा जीव घेवून जाते मतल्यासह एक सुंदर, गझल सहज होवून जाते ही बेहोशी सखे, कुठल्या मैफीलीत मिळत नाही, अन म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही.. मुक्तछंदात बोलताना, गुंफून घेतेस सहज आर्या , तुझ्या मात्रा मोजताना, गाते अभंग माझी चर्या, काय लघु, काय गुरु, हिशोब काही जुळत नाही, पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही.. कविता म्हणजे काय ग, शहाण्यासारख वागायचं, थोडं जगात सांगायचं , अन बराच मनात भोगायचं, आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही, पण म्हणून काही आपल, कविता होण टळत नाही.. - शैलेंद्र
काव्यरस

प्रेम तुझे हे बरसणारे

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 24/12/2015 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम तुझे हे बरसणारे पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास तुझ्याच आठवणींची मनात रास असता जवळ तु हरपतसे भान दुर जाताच हे जीवन माळरान तुझ्यात रमले आणि विरघळले जशी विरघळावी दुधात साखर आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम
काव्यरस

सिंहलव्दीपाची सहल : ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 23/12/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...