Skip to main content

लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

लेखक सतिश पाटील यांनी सोमवार, 17/10/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये. २८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली.

तू नाहीस ...

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 17/10/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
तू येणार नाहीस हे माहित असताना, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो, न पुन्हा एकदा मैफिल जमवावी म्हणून, जुन्या आठवणींना नव्याने हाक देत होतो !!१! संध्याकाळ डोक्यावरून हळूहळू सरत होती, धरणीने आकाशाला दिलेलं आलिंगन पाहून भारावलो होतो, न आपण एक असण्याच्या एखादा तरी पुरावा म्हणून, तिथल्या दगडांवर आपले दोघांचे नाव कोरत होतो !!२!! सरोवराचा गारवा अंगाला भिडत होता, तु जवळ होतीस त्या आठवणींनी उब घेत होतो, जड पावलांनी घरी परतल्या हे कळलं की, मी उगाच तुझ्या आठवणींचे ओझे वागवत होतो !!३!! त्या रात्री झोप वैरी झाली होती, उघड्या डोळ्यांनी तुझ्या आठवणींच्या स्वप्नात बुडालो होतो, रात्रभर चमचमणाऱ्या तारे प
काव्यरस

अशी स्मिता होणे नाही...

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 17/10/2016 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
लौकिकार्थाने काही लोक आपल्यात नसले तरीही त्यांच्या कार्याने, कलाकृतीने ते कायम आपल्या सोबत असतात. पु.ल. , वसंतराव देशपांडे हि अशीच काही माणसं. स्मिता पाटील पण अगदी याच रांगेत सहज सामावून जाते, ते तिच्या अभिनयामुळे. आज तिचा ६१ वा वाढदिवस. मी वाढदिवस या साठी म्हणतोय कि ती कुठे गेलीच नाही, ती कायम आपल्यात वावरत असते कधी उंबरठा मधली सुलभा बनून तर कधी जैत रे जैत मधली नाग्याची चिंधी बनून. उण्यापुर्या ७५ चित्रपट आणि ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने अनेकांच्या हृदयावर अमीट छाप सोडली. दूरदर्शनची निवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री हा तिचा प्रवास खरंच रोमांचक होता.

“मेरे प्रिय आत्मन् . . ."

लेखक मार्गी यांनी सोमवार, 17/10/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच इथे ओशोंवर झालेली चर्चा वाचली. अनेकांनी मांडलेले विचार बघितले. छान वाटलं. त्यातून थोडी भर घालावीशी वाटली व म्हणून इथे लिहितोय. . . ओशो. . . . जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . .

गुरबानी!

लेखक उल्का यांनी सोमवार, 17/10/2016 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका वेगळ्याच विषयावर लिहायचा मोह झाला आहे. आज सकाळीच मोबाइलवर गाणी ऐकताना अचानक माझी अत्यंत लाडकी गुरबानी ‘इक ओंकार सतनाम’ ऐकायला मिळाली आणि लिहावेसे वाटले. (गुरबानी हा शब्द ईकारान्ती असल्यामुळे मी स्त्रीलिंगी वापरत आहे.) मन अशांत असताना ही गुरबानी ऐकल्याचे असे खास आठवत नाही परंतु ही जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा मनाला अतिशय शांत, प्रसन्न वाटतं हे मान्य करायलाच हवं. मला वाटतं कोणत्याही श्लोक/मंत्र उच्चारात ते सामर्थ्य असतं. त्यातील लय आणि शांत रस याचे ते फलित असावे. आपले ‘मनाचे श्लोक’ किंवा ‘गायत्री मंत्र’ हे सुद्धा तितकेच प्रभावी आहेत.

नशीब...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 17/10/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
नशीब... जागोजागी फाटले नशीब किती ठिगळे लावू विरणावर काय काय भोगले हे न आठवे नाही विश्वास आता स्मरणावर आयुष्यभर रडत होतो कोण रडेल माझ्या मरणावर आजवर जळत राहिलो तरी टाकिती सरणावर राजेंद्र देवी

छंदांतून अर्थार्जन अथवा आवडीचे व्यवसायात रूपांतर

लेखक तेजस आठवले यांनी रविवार, 16/10/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, बऱ्याच जणांना काही छंद असतात, किंवा वैयक्तिक आवडीनिवडी असतात ज्याचे रूपांतर व्यवसायात केले जाऊ शकते अथवा केलेले असते. अशा लोकांच्या वाटचालीची माहिती मिळवण्यासाठी हा धागा काढतो आहे. मला वैयक्तिकरित्या अश्या लोकांचे कौतुक वाटते. आपल्या पैकी काही लोक जर असे व्यवसाय/ अर्थार्जन करत असतील तर जरूर माहिती द्यावी. अर्थार्जन हा मुख्य हेतू नसलेल्या पण कामाचे समाधान देण्याऱ्या व्यवसायाबद्दल पण माहिती आली तर उत्तमच ,प्रत्येक वेळेला पैसे हा घटक महत्वाचा असेलच असे नाही.

ओढ घरट्याची

लेखक माहीराज यांनी रविवार, 16/10/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पाखरे उडता आकाशी या    घरटे सुने सुनेच उरते.. परतीची ही ओढ लागता    तसे पाऊल मागे वळते.. कानोसा घेऊ राञ निघाली.. कात टाकुनी पहाट ही आली.. रानपाखरे घरट्यातुन या उंच भरारी घेऊ लागली... उन्हे दाटता डोक्यावरती  घरटे आतुर रडु लागले... डोळे शिणले वाट पाहुनी काळजीचे मग बांध ही फुटले... तु असा गेलास कुठे की हरवलास या वाटेवरती... शोधलास तु मार्ग नवा की विसरलास ही माझी प्रिती.....
काव्यरस

भांडण

लेखक वटवट यांनी रविवार, 16/10/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचे नि माझे एकदा लागले भांडण.. भलताच भावनिक मुद्दा आणि भलतंच अवघड प्रकरण.. बाह्या सरसावून भांडू लागलो आम्ही एकेकाळचे दोस्तं.. भांडणाचं कारण एवढंच कि "त्याचं प्रेम श्रेष्ठ कि माझं प्रेम श्रेष्ठं...." चंद्र म्हणे, "बघ मी आणि रात्र कसे भेटतो..? आमच्या नुसत्या चाहुलीने सारा आसमंत कसा पेटतो..? अश्या उसळतात लाटा आणि बेभान होतो समुद्र...." बोलता बोलताच अजून उत्कटतेनं सांडू लागला चंद्र.. ऐक म्हणे, "आम्ही भेटताच होतं तारांगण लुप्त.. उरतो फक्त शुक्र, जो आधीपासूनच विरक्त आणि अलिप्त.. सारी सृष्टी गाऊ लागते मग आमचंच गुणगान.. मग मीही भरभरून देऊ लागतो त्यांच्या झोळीत चांदणदान.. सांग...