लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

सतिश पाटील जनातलं, मनातलं
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये. २८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय. त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी. 1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या... आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य? २) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे. ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला? अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे. काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय... साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव? असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......
वर्गीकरण
लेखनप्रकार

98 टिप्पण्या 19,521 दृश्ये

Comments

कपिलमुनी नवीन

कित्ती चांगला आहे तुमचा मित्र ! माझे निर्लज्ज , हलकट मित्र कितीतरी पोरींनी हाकलल्यानंतरसुद्धा बसायला बोलवत नाहीत. एक ठाणेकर मित्र तर पुणे ते लंडन व्हाया थायलंड नकारघंटा घेउन आलाय पण बसायचे नाव घेइना !

नाखु नवीन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्या घेतलेल्या पत्यांचे पुढे काय करतात ते कळेना. आम्च्या कॅटमधून घेतलेल्या किलवर छक्का आणि बदाम गुलामचे काम झाले असेल तर परत देणे . अखिल मिपा उगा पत्ते नका मागू आणि फुका नावे नका सांगू या संघटनेचा सक्रिय सभासदांकडून मिपा कट्टाहितार्थ जारी

चित्रगुप्त नवीन

त्याच्या छातीवर केस आहेत ना ? मिळेल मग मुलगी. (कुणीतरी दुवा द्या रे आधीच्या धाग्याचा).

सानझरी नवीन

पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो,
हेच नको असेल पोरिंना.. माझ्या दादासाठी मुली बघत होतो तेव्हा हा अनुभव आलेला. आमचे २ फ्लॅट्स एकत्र आहेत. मुलीला बघायला गेलो तेव्हा मुलीचे वडील सरळ म्हणाले की हां, लग्नानंतर वेगळे करुनच घेऊ.. ओळख पाळख नसताना, पहील्याच भेटीत ते हा निर्णय घेऊन मोकळे झाले. आम्ही हे ऐकुनच चाट पडलो..

विवेकपटाईत नवीन

आपण काय बोलणार, आमच्या (स्वर्गीय) मातोश्रीने अस्मादिकांना न विचारता मुलगी ठरवून टाकली होती. बहुतेक तिला हि विचारले गेले नसावे. अस्मादिक मातृभक्त, एक हि प्रश्न विचारला नाही. होकार / नकार काय प्रकार असतो, याचा अनुभव घ्यायला मिळाला नाही. असो.

खटपट्या नवीन

दोन नकारात एवढं निराश होण्यासारखं काये? अजून कीमान एक डझन बघ म्हणाव. काय फरक पडतोय. मागे जे काही झाले ते विसरुन परत तयार रहा. (हायला मला हा अणुभव नाय मिळाला...:(

पैसा नवीन

महाराष्ट्रात स्त्रिया ९२५ प्रति एक हजार पुरुष. तुमच्या मित्राचा नंबर त्या ७५ मधे लागू नये ही सदिच्छा. बाकी मला तर मुलगा बघणे प्रकाराचा अनुभव नाही. कोणाला नकार दिलेला नाही. साहजिकच असली काही कारणे मी सांगू शकणार नाही. इतर अनुभवी लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत पॉपकॉर्न घेऊन फांदी पकडून बसत आहे. आता त्या संस्कृती, भावना, आशा, अपेक्षा, विनोद वगैरे येऊ देत सावकाश.

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by पैसा

लग्न न झालेली ७५ मुले वाजपेयी, मोदी, अडवाणी वगैरे बनतात. बाकीचे, ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करतात.

शब्दबम्बाळ नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

काल पर्वा पर्यंत तरी कलाम सर होते या जोक मध्ये! अडवाणींची एन्ट्री झाली वाटत आता! :D शतप्रतिशत भाजपा! ;)

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

नांवात काय आहे? असे कोणीतरी म्हणून ठेवले आहेच. (कोणी? ते नांव आठवत नाही) नांवे कोणाचीही लावा ३ शिट्ट्यांचा हिशोब कांही चुकत नाही.

अजया नवीन

नाही आवडलं तर द्यावा लागणार ना नकार.मग काहीतरी कारणं शोधावी लागतात.म्हणून पत्रिका मागतात लोक! नाही जुळली हे बर्यापैकी मन न दुखवणारे कारण असावे ;)

आदिजोशी नवीन

आमच्या एका मित्राला घरात कमोड नाही म्हणून नकार मिळालेला आहे :)

रेवती नवीन

असू द्या, नका वाईट वाटून घेऊ. पूर्वी नै का मुलीला गाता येत नाही, स्वयंपाकघरातल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नै म्हणून नकार यायचे तश्यातला प्रकार समजून विसरून जायचं. आता ज्या मुलींना गाता येत असे त्यांनाही असे काय मोठे प्रोत्साहन मिळायचे सासरी? पण आपलं उगीच काहीतरी. स्वयंपाकघरातील प्रश्नाचं उत्तर चुकलं तर आयुष्यभर तसंच राहणारे का? शिकेलच की ती! पण नाही! समदं कसं रेडीमेड पायजे.

बरखा नवीन

In reply to by रेवती

रेवती यांच्याशी अगदी सहमत. मागील काही काळ असा होता कि मुलं कसलीही शुल्लक कारणं मुलींना देउन नाकारत होते. त्यावर परत उलट जाब विचारता पण येत नसे. त्या वेळी त्या मुलींची मानसिक स्थिती काय होत असेल? मुली सुध्धा आता त्यांच्या अपेक्षा स्पष्ट सांगत असतिल तर त्यात नवल का वाटाव? मुलांनी या गोष्टीचे वाईट वाटून घेउ नये. आज ना उद्या कुणीतरी मिळेलच.

महासंग्राम नवीन

In reply to by बरखा

अपेक्षा सांगणे वाईट नाहीच, पण त्या काय अवाच्या सव्वा नसाव्यात... माझ्या एका मित्राला ४ चाकीगाडी, फ्लॅट या बरोबर आई-वडील सोबत रहायला नको अशी अपेक्षा व्यक्त केली. घर, गाडी त्याने सगळं मान्य केलं पण आता त्याच्या आई वडिलांना तो एकटाच मुलगा होता त्यांना कुठे ठेवणार. तसेही आताचे पालक समंजस झाले आहेत. ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत. आई वडील सोबत नको हि अपेक्षाच चुकीची आहे.

महासंग्राम नवीन

In reply to by संदीप डांगे

हाहाहा... असतीलही दुर्मिळ पण मग ते सारे दुर्मिळ पालक आमच्या मित्रांचे आईवडील आहेत असं म्हणावं लागेल. कसला लकीये ना मी ;) कायम शिंगल मंदार

रेवती नवीन

In reply to by महासंग्राम

ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत असं काही नाही. मुलग्यांच्या संसारात त्यांचे आईवडील लक्ष घालतात पण आजकाल मुलींचेही आईवडील यात अ‍ॅडवले आहेत. तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन. मिपाकरीण पिराच्या लाडक्या आहेत त्या! ;)

पिलीयन रायडर नवीन

In reply to by रेवती

सकाळी सकाळी प्रातःस्मरणीय ताईंची आठवण काढलीस! चला, त्या आनंदात आपल्या डिग्र्या चुलीत घालुन त्यावर इकडच्या स्वारीसाठी भाकर्‍या भाजायला घेऊ!!

धर्मराजमुटके नवीन

In reply to by पिलीयन रायडर

ताई, डिग्र्या चांगल्या भारी आहेत ना ? बीए बीकॉमच्या डिग्र्यांच्या जाळावर भाजलेल्या भाकर्‍या टेस्टी लागत नाहीत म्हणे !

पिलीयन रायडर नवीन

In reply to by धर्मराजमुटके

डिग्र्या दणदणीत आहेत हो.. अगदी विंजिनेरिंग वगैरेच्या! पण कसंय ना की त्यांना फक्त चुल पेटण्याशी मतलब आहे. तुम्ही शास्त्रज्ञ असा वा प्राध्यापक (का अगदी अंतराळात जाऊन आलेल्या असा..) घरी येऊन नवर्‍यासाठी भाकरी करता आलीच पाहिजे असा सोप्पा नियम आहे. तेव्हा स्वतःला का जाळेनात, भाकर्‍या होण्याशी मतलब!

पिलीयन रायडर नवीन

In reply to by संदीप डांगे

https://www.youtube.com/results?search_query=aparna+ramtirthakar+speech ह्या बाई कोण आहेत नक्की ते मलाही माहिती नाही. सामाजिक कार्यकर्त्या असाव्यात, वकिल आहेत. पण बायकांनी काय करावे आणि काय नाही ह्याबाबत मतं जहाल आहेत. नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने अर्थातच त्या ते सांगत नाहीत.

कैलासवासी सोन्याबापु नवीन

In reply to by पिलीयन रायडर

नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने अरे वा! सहिये, मी काय म्हणतो ताई आमच्या प्रकरणांस काढून देतो मिपा आयडी, तिला जरा समजावा नवऱ्याने काय करावे ते ठरवायची रीत नसते भारतीय संस्कृतीत म्हणून ! काय सांगू माझा सासुरवास (माझ्यापाशी पदर नाही/नसतो/कधीच नसेल म्हणून नाहीतर आत्ता बोळा तोंडात कोंबून हुंदका काढून दावला असता). ललिता पवारीणीला शरद तळवलकर नवरा मिळणे ह्यालाच कार्मिक न्याय म्हणतात का, असा एक भाबडा प्रश्न मला हल्लीच पडलाय :P :P

पिलीयन रायडर नवीन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हीच ती पुरुषांची मुस्काटदाबी!! ह्याच अन्यायाला तोंड फोडतात अपर्णाताई.. उगी उगी.. चला डोळे पुसा! बापुंसारखा दणकट माणुन तोंडात बोळा कोंबुन हुंदका काढतोय! आमचा पार्वतीच आठवला!! =))

कैलासवासी सोन्याबापु नवीन

In reply to by पिलीयन रायडर

सद्ध्या दणकट बापू टाईम प्लिज घेऊन बसलाय म्हणजे बघा हे आपला पार्वती विग गुडघ्यावर ठेऊन विड्या ओढतोय हो! =)) =))

सुबोध खरे नवीन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने कोणत्याही बाईला आपल्या नवऱ्याने काय करावे हे "दुसऱ्या" "बाई"ने( किंवा माणसाने सुद्धा पण माणसे दुसऱ्या माणसाला सांगायला जाणार नाहीत) सांगितलेले पटणार नाही. आणि जरी ते पटण्यासारखे असले तरी ते केवळ "दुसऱ्या बाई"ने सांगितले म्हणून त्यांना मान्य होणार नाही

पिलीयन रायडर नवीन

In reply to by सुबोध खरे

बरं आता इतक्यांनी चुकीचा अर्थ लावलाय म्हणुन सांगते.. जितक्या प्रमाणात आपल्याकडे बायकांनी कसे रहावे, काय करावे, काय घालावे इ इ इ इ गोष्टी बोलल्या जातात, त्याच्या १% सुद्धा त्या पुरुषांना सांगितल्या जात नाहीत. बायको म्हणुन कसे असावे हे रामतीर्थकर बाई तास न तास प्रवचन देऊन सांगतात, पण नवर्‍यांनी कसे वागावे ह्या बद्दल अवाक्षरही नसते. सासर आणि माहेर ह्या कन्सेप्ट टेक्निकली पुरुषालाही असतात. लग्न त्याचंही होत असतं. पण अजुनही स्त्रियांना बायको / सुन म्हणुन ठराविक चौकटीत बसवण्याचा अट्टाहास संपत नाही. तुम्ही सगळे एक बायको आपल्या नवर्‍याला काय बोलते, बोलत नाही ह्यावर बोलताय. मी समाजातला साधारण पद्धतीबद्दल बोलतेय. "बायकांच्या जातीने.." ह्या दोन शब्दांनी सुरु होणारी वाक्य..यु नो..

संदीप डांगे नवीन

In reply to by पिलीयन रायडर

रामतीर्थकर बाई भयाण प्रकरण आहे! तर, असली प्रवचने ऐकायला उतारवायतल्या बायका मुख्यत्वे जास्त असतात, त्यांना सुख व्हावे असे बोलले कि त्या वक्त्याला भारी मान देतात, सर्व खुश होतात पण घरातल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात. आमची आत्या देवाच्या गायनाचे कार्यक्रम (मोफत) करते, तिचे एक गाणे आईबापाला विसरू नये, त्यांचा सांभाळ करावा या विषयावर आहे, त्यात मुलाला जाम उपदेश केले आहेत. हे गाणे सुपरहिट आहे, कारण जे लोक हे कार्यक्रम ऐकतात त्यांच्यासाठीच आहे ते! सुनांशी-मुलांशी कसं वागावे ह्याची परखड भाषणे-गाणी केली तर कोण ऐकणार! समाजाला -ह्यात स्त्रीपुरुष दोन्ही- स्त्रीने टिपिकल वागणे अपेक्षित आहे, चौकटीबाहेर वागले कि संस्कृती बुडेल ना? बाकी पुरुषकडून अपेक्षाच नसतात असे नाही, वेगळ्या असतात. ज्या अपेक्षा स्त्रीकडून त्याच पुरुषकडून नसतात पण म्हणून पुरुषाचे काही प्रश्नच नाहीत असे समजणे हेही गैर!

पिलीयन रायडर नवीन

In reply to by संदीप डांगे

पुरुषांचे प्रश्नच नाहीत असं कधी म्हणणंच नव्हतं माझं. त्यांनाही भरपुर स्टिरिओटाईप्सचा सामना करावा लगतो जसे की कमावलेच पाहिजे, रडता कामा नये, अमुक-तमुक केले की बायकी इ इ. फक्त त्यांना हे इतक्या प्रमाणात ऐकवले जात नाही. शिवाय संस्कृती पासुन ते खनदान की इज्जत असं खुप काही बायकांच्या मागे लावुन दिलंय. पुरुषांना प्रश्नच नाहीत असं म्हणायचं नाहीचे.. पण बायकांचे प्रश्न बरेच जास्त आणि गंभीर आहेत हे तरी मान्य असायला हरकत नसावी. (मी सास बहु ड्रामाच्याही पलीकडे जाऊन असणारे प्रश्न म्हणतेय.. लग्न आणि त्यातल्या वैतगावाडी भानगडी स्त्री असो वा पुरुष.. कुणालाही चुकत नाहीत.)

कैलासवासी सोन्याबापु नवीन

In reply to by पिलीयन रायडर

आमची जुन्या अमदानीतली आजी आठवली (आईची आई) अस्सल ग्रामीण म्हातारी! आमच्या वाईफला पहिल्यांदा भेटली तेव्हा पहिला प्रश्न "भाकरी करायला येते का?" आमचं प्रकरण हो म्हणताच आईला म्हणाली "बरी सून शोधलीस गो आक्के राजस्थान भाकरी पण बडवती म्हणजे आक्रीतच आहे" आमचं प्रकरण फ्लॅट!

महासंग्राम नवीन

In reply to by रेवती

तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन.
नको नको एकदाच पहिले होते या आजीचे व्हिडीओज परत पाहणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली . बादवे ठाण्याला असतात ना या आजी

बाजीप्रभू नवीन

पौर्णिमेच्या रात्री घेऊन या तुमच्या मित्राला. एक तावीज देईन बांधायला. मुलगीच काय मुलीची आईसुद्धा तयार होईल लग्नाला. इति, तंत्र मंत्र सम्राट, काले इल्म और सिफली इल्म के माहिर, बाबा अकबर खान थायलंडवाले.

सतिश पाटील नवीन

त्याच्याच चुलत भावाचा हा किस्सा ... शिकलेला शेतकरी, नगर जिल्ह्यात एक मालकीची ईमारत एल आय सि ला भाड्याने दिलेली, थोडक्यात नोकरीची गरज न्हावतीच, परंतु मुलींची अपेक्षा याला नोकरी असयाला पाहिजे होती तर पसंत केला असता. शेवटी बापाने १३ लाख भरून नगरच्या प्रसिद्ध अश्या मामांच्या ब्यांकेत " चिटकवले". पोस्टिंग पनवेल.१४ हजार रुपये पगार घेतो, शेवटच्या ज्या मुलीने नोकरी नाही म्हणून नाकारले होते, तिनेच त्याच्याशी लग्न केले. मुलगी घरीच असते. सास्रयाने राहण्यासाठी 1 RK फ्ल्याट दिलाय स्वतःचा. शेती संभाळनारा मुलगा शहरात गेल्याने, बापाने २ गडी कामाला ठेवले शेतात पगारावर !!!!!

पाटीलभाऊ नवीन

नकाराची कारणे काहीही असोत हो...कोणी होकार कसा मिळवावा यावर उपाय सांगा कि राव...!

महासंग्राम नवीन

In reply to by संदीप डांगे

अण्णा, पाटील भाऊ तेच म्हनायले तुम्ही उपाय सांगा कि राव...! ते लगेच पिरेमइवाह करतील

संदीप डांगे नवीन

In reply to by महासंग्राम

प्यार किया नही जाता, हो जाता है केल्यावर निभावायची हिम्मत असेल तर नकाराची भीती नाही

पाटीलभाऊ नवीन

In reply to by संदीप डांगे

प्यार किया नही जाता, हो जाता है
अहो त्याचीच वाट बघत होतो इतकी वर्ष...पण कसलं काय.. :( अजून एकटा, पाटील

शब्दबम्बाळ नवीन

In reply to by पाटीलभाऊ

आधी होकार देण्यासाठी कोणीतरी शोधा! शोधली असेल तर आमच्या अति आवडत्या चित्रपटात (रांझना) मुरारी ने सांगितलेल्या स्टेप्स वापरून बघा! ;) लडकी का सुबह शाम पीछा करो! घर के बाहर, स्कुल के बाहर, सडक पे, सायकल पे, टेम्पो मे, रिक्षा मे, रो दो, खाना खाना छोड दो, वजन घटा दो... और लडकी को इतना थका दो के लडकी थक के हा बोल दे! :P

मराठी कथालेखक नवीन

लग्नाबद्दल अपेक्षा /निकष काहीही असू शकतात, हरकत नाही. पण आपल्या निकषांत समोरची व्यक्ती बसत नाही हे आधीच माहित असताना विनाकारण 'वधू/वर परि़क्षण' करण्यात वेळ वाया घालू नये आणि समोरच्याला मानसिक त्रासही देवू नये उदा: वर लेखकाने सांगितलेला पहिला नकार. मुलाला सरकारी नोकरी नाही हे आधीच माहित होते ना, मग आलेत कशाला बघायला ?

स्मिता. नवीन

अय्या, अजून दोनच मुलींकडून नकार आला आणि एवढं नैराश्य आलं!! किमान डझनभर नकारांनंतर हा लेख वाजवी होता.

संदीप डांगे नवीन

In reply to by स्मिता.

असतात हो काही लोक स्वतःला ग्रेट समजणारे, दोन नवीन लेखांना नकारात्मक प्रतिसाद मिळाले तर मिपावर लिहणे सोडणारे,

ट्रेड मार्क नवीन

ही मुलाने नकार दिलेली दोन्ही माझ्या नजरेसमोर घडलेली उदाहरणे . माझ्या एका मित्राला परीसारखी बायको पाहिजे होती. आम्ही त्याला किती समजावले की अरे आधी स्वतःकडे बघ. म्हणजे तो काही वाईट नव्हता दिसायला पण गंधर्व किंवा गेलाबाजार राजबिंडा म्हणावा असा पण नव्हता. परीच्या नादात त्याने कितीतरी चांगल्या मुलींना नकार दिला. शेवटी वयाच्या ४० नंतर त्याला शोभेश्या मुलीशी लग्न झाले. गमतीची गोष्ट म्हणजे ती त्याच्या घरापासून ३ किमी वर रहात होती. अजून एकाचे आईवडील भयंकर संशयी. गुजरातमध्ये स्थायिक असलेले मराठी कुटुंब आणि एकुलता एक मुलगा. संपूर्ण गुजरात, मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या मुली बघून झाल्या. नकाराची काही मजेशीर कारणे, अर्थात वेगवेगळ्या मुलींसाठी - १. मुलगी येताना scooty वरून गॉगल लावून आली - मग ती फॅशनेबल वाटतेय. २. कारखानदार वडिलांची एकुलती एक मुलगी - लग्नानंतर घरजावई करून घेतलं तर ३. कार चालवता येते असं मुलीने सांगितलं - लग्नानंतर तिने कार पाहिजे म्हणून हट्ट धरला तर ४. बाकी सगळं ठीक होतं (मुलगी आवडली पण होती) - पण मग अजून तिचं लग्न का बरं झालं नसेल. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि ते सांगत नाहीयेत. हे संभाषण माझ्या समोर चालू होतं तर मी नकळत म्हणलं सुद्धा की या न्यायाने याचे पण अजूनपर्यंत लग्न झालं नाहीये त्याचं काय? अशी काही मजेशीर तर काही विचित्र कारणे. शेवटी याचे पण लग्न ४० नंतर घरापासून २ गल्ल्या सोडून राहणाऱ्या मुलीबरोबर झालं. ४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या टीम मधला एक मुलगा MPSC ची तयारी करत होता. मी विचारलं त्याला की तुला चांगल्या बहुद्देशीय IT कंपनीमध्ये नोकरी आहे, चांगला पगार आहे, पुढे मागे परदेशी जायला मिळेल मग एकदम सरकारी नोकरीच्या मागे का लागलास? तो म्हणाला आजकाल मुली IT वाले नको म्हणतात. कामाचे अनिश्चित तास, प्रोजेक्टचे टेन्शन, कंपनी कधी कुठे पाठवेल सांगता येत नाही. त्यापेक्षा सरकारी नोकरी बरी. ९-५ ऑफिसला जायचं त्यात काम केलं तर केलं नाहीतर नाही. ६व्या वेतन आयोगामुळे पगारही IT च्या तोडीसतोड आहेत आणि वरकमाईचे मिळतील ते वेगळेच. सरकारी घर मिळायची पण शक्यता असते. त्यामुळे म्हणे मुली आजकाल IT वाला मुलगा असेल तर आधीच नकार देतात.

रेवती नवीन

In reply to by ट्रेड मार्क

पूर्वी रोहिणी की अश्याच कोणत्यातरी वधुवर मासिकात अपेक्षा असायच्या. आमच्या राजकन्येला शोभेसा राजपुत्र हवा जो तिला प्रेमाच्या पंखांवर बसवून परदेशी नेईल. किंवा मग आमच्या ज्येष्ठ राजकुमाराला अमक्या तमक्या विवाहमंडलाने स्वप्नांची राणी मिळवून दिलीये तश्याच अपेक्षेने कनिष्ठ राजकुमाराला एखादी राजकुमारी मिळावी म्हणून पुन्हा येथे आलोय. जिच्या हसण्याने आमची मंगलप्रभात होईल वगैरे वगैरे. अश्या जाहिराती देऊन किंवा वाचून ज्यांची लग्ने झालियेत ते आता काय करत असतील असे एकदा मनात आले होते.

सुबोध खरे नवीन

In reply to by रेवती

ओ ताई त्या रोहिणी मासिकाला नावं ठेवायचं काम नाही. आमचं लग्न पण त्यातूनच झालेलं आहे आणि २४ वर्षं झाली. मागच्या वर्षी तोच हनिमून परत रिपीट करूनही झाला. आता या वर्षी सिमल्याला जातोय. हि पहा झैरात http://www.misalpav.com/node/33431

रेवती नवीन

In reply to by सुबोध खरे

मासिकाला नावं ठेवत नाहिये पण स्थळाची माहिती देताना जे लिहितात ते पाहून मजा वाटायची. तुमच्या लग्नावेळीही स्थळाचे वर्णन असेच केले होते काय? ही चेष्टा म्हणून विचारत नाहीये. सिमल्याची जाहिरात आवडलीच. लग्नाच्या पंचविसाव्या वादीला लोक आवर्जून न ऐकलेल्या, वेगळ्या ठिकाणी जातात. तुम्ही कुठे जाणार आहात?

सुबोध खरे नवीन

In reply to by रेवती

झैरात मागच्या वर्षी कुणूरला गेलो होतो त्याची होती सिमल्याला आता जाणार आहे. आणि पंचविसाव्या वाढदिवसाचे अजून ठरवलेले नाही. महाबळेश्वर पासून स्वित्झर्लंड पर्यंत कुठेही. तेंव्हा खिशाकडे पाहून

अभिजीत अवलिया नवीन

In reply to by ट्रेड मार्क

ह्या प्रचंड ब्रह्माण्डात योग्य वेळी जन्म झाला, जवळ स्वतः:चे घर, गाडी, स्मार्टफोन सुद्धा नसताना (घर अजून देखील नाही) देखील लग्न झाले आणी योग्य वेळी निरोप घेईन ह्याबद्दल भाग्यवान समजावे का मी आता स्वतःला ?