Skip to main content

सवाल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 24/10/2016 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
सवाल लालचुटुक ओठ तिचे मऊसूत गाल पापण्यांआड दडलेले डोळे तिचे कमाल नजरेत तिच्या तलवार अन नजरेतच ढाल तिरपा एक कटाक्ष होतो मी हलाल गाली गुलाब फुलतो उधळीत सुगंधी गुलाल कुरळ्या केसात फिरतो कर करी शांतता बहाल रोज झोपतो मी हि ओढून स्वप्नाची शाल सत्यात कधी उतरेल हाच नशिबाला सवाल राजेंद्र देवी

तीर्थरुपांच्या काही आठवणी!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत. माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे.

उंबरठा!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
उंबरठा! गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ... चांगला सिनेमा कोणता ? मनोरंजन हाच एक निकष मानला तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात . पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही.

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
२. समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट ) माणूस हा समुहात रमणारा प्राणी असल्यामुळे लहानपणापासून त्याचे सामाजिक शिक्षण सुरु झालेलेच असते. सामाजिक शिक्षण घेण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाजात मिसळणे, अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येणे आणि लहान वयात हे शाळेत सगळ्यात उत्तम तऱ्हेने होते. शाळेतल्या वर्गात काय शिकवतात! हा वादाचा मुद्दा असू शकतो पण तिथे ४०-५० मुलांमध्ये, सदासर्वकाळ आपल्या पाठीशी असणाऱ्या आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय स्वतःच्या हिम्मतीवर एखादे मूल इतर मुलांशी कसे वागायचे, बोलायचे हे स्वत: ठरवते, शिकते..

द कॅमब्रियन पट्रोल

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी रविवार, 23/10/2016 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ? ह्याला उत्तर म्हणजे ते ठरवायला आजकाल आयोजित केले जाणारे संयुक्त अभ्यास, तसे पाहता आपापले मित्रदेश पकडून आजकाल प्रत्येकच देश संयुक्त अभ्यास करतो, मग परत जागतिक नामांकनांची पंचाईत होऊ शकते.

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही शिक्षणतज्ञ नाही. माझा लौकिकार्थाने शिक्षणक्षेत्र अथवा शिक्षकीपेशाशी काहीही संबंध नाही. शालेय, महाविद्यालीन शिक्षणानंतर माझा या क्षेत्राशी गेली १५-१६ वर्षे काहीही संपर्क नाही. पण माझ्यासारखे अनेक जण, ज्यांची मुलं आताशा शाळेत जाऊ लागली आहेत अशांचा, या ना त्या कारणाने शिक्षणाच्या सद्यस्थितीशी आणि एकंदर शिक्षण नावाच्या ह्या कमालीच्या गुंतागुंतीच्या आणि जराशा भीतीदायक अशा गोष्टीशी, मनात इच्छा असो वा नसो संबंध येतोच. त्यात जे मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातील पालक आहेत ते तर या बाबत जास्तच हळवे/ संवेदनशील असतात.

माहेर

लेखक प्रास यांनी रविवार, 23/10/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
असे माहेराचे घर नसे कसली कसर नुरे कसलाही भार डोक्यावर माहेराचे गणगोत भला नात्यांचा हा पोत प्रेम बहर भरात ओतप्रोत माहेराचे हे सदन माझे स्वीकारे वंदन असे माझाही राखून एक-कोन अरे माझिया माहेरा राहो कितीही मी दूरा फिटे दुःखाचाही भारा मोदसारा
काव्यरस

जन्मभर

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 23/10/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
नेसत्या वस्त्रानिशी मी हा असा आता निघालो ना कळे जन्मामध्ये या काय मी कमवुन गेलो? झाकण्या लाखो उणिवा केवढी केली शिकस्त दाटले आभाळ होते मी दिखाव्यात व्यस्त ल्यायलो रेशीम वस्त्रे घ्यावया सन्मान खोटा भाळलो का मी कळेणा पाहता त्या चोरवाटा जे मुळी नव्हतेच माझे वाहिले आयुष्य त्यांना वंदिले समजुन सूर्य त्या भ्रमाच्या काजव्यांना जाहला सूर्यास्त जेव्हा पांगले सारे घरोघर मग जणू मिटताच डोळे जाणिला गुंता खरोखर जन्मभर केला दिखावा मानुनी आयुष्य त्याला खेळ सारा जीवनाचा तो चितेवर ज्ञात झाला - शार्दुल हातोळकर
काव्यरस

कातर वेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 23/10/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- संध्याकाळची ती वेळ एकटाच खिडकीत उभा राहून नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे पहात उभा होतो कशी कोण जाणे पण तुझी आठवण त्या भरून आलेल्या ढगांबरोबर वाहत आली --- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- आभाळ इतकं भरलं ढगांनी इतकी दाटीवाटी केली की त्यांना आभाळ पुरेना कोणता ढग कोणत्या ढगात विलीन होतोय तेच कळेनास झालं आणि मग गडगडाटाने सारा आसमंत भरुन गेला या सगळ्या गोंधळात तो चंद्र दिसेनासा झाला अन् उगाच जीव कासाविस झाला ---- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- पाहता पाहता त्या ढगांना ओझं असह्य होऊन त्यांनी शरणागती पत्करली जश्या समुद्राच्या लाटां वर ल

सल...

लेखक राजेंद्र देवी यांनी रविवार, 23/10/2016 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
सल लाव धार माझ्या खंजिरी घेईन म्हणतो जरा ऊरी नाही सहन होत आता तुझ्या आठवणीची मुजोरी तुझी आठवण आहे काचरी दिवस रात्र मला जाचरी नको आता आयुष्याची शंभरी नको तुझ्या आठवणींची शिदोरी सांग तुला पण हेच का वाटते माझी आठवण डोळा दाटते बुडवून टाक अश्रूच्या सागरी आयुष्यातील एक सल बोचरी राजेंद्र देवी