किलर
या काही दिवसात शहरात एकामागे एक घडलेल्या पाच हत्येने बरीच खळबळ माजून गेली. दोन-तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात, एकामागून एक असे पाच खून म्हणजे, खूप मोठी गोष्ट होती. शहरात काही मोजकीच रहदारीचे ठिकाणे होती. हेरून त्याच ठिकाणी खून होणे, म्हणजे खुनी शहरातीलच असावा. आणि त्याला शहराची इत्यंभूत माहिती असावी. हत्या करताना प्रत्येक हत्येमागे एक काहीतरी विचारमालिका लपलेले असावी. कारण हत्यारा मानेच्या पाठीमागून सुरा फिरवून तो गळ्यापर्यंत आणायचा. म्हणजे गळा पूर्णपणे गोल भागात चिरलेला असायचा. त्यामुळे खून झालेल्या इसमाचे डोके केवळ कंठाच्या हाडावरच टेकलेले असायचे.
मिसळपाव
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले.
रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत.