वाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस
आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बहुतेकांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडतेच. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो.
संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा असतो.
असाही ऊपदेश
फार पुर्वी माबो वर टाकली होती ही कविता. आता हे परत वेगवेगळे विषय घेऊन पुढे वाढवावे असे वाटतेय. ही कविता मित्राचे लग्न ठरले होते तेंव्हा त्याला सल्ला देण्यासाठी लिहिली होती. नंतर सासरे मंडळींची बाजू घेऊनही याच कवितेचा दुसरा भागही लिहिला होता. हळू हळू पुढेही लिहिलच.
ुकाळरात्र होता होता उषःकाल झाला.
यमनोत्री,गंगोत्री,केदारनाथ,बद्रिनाथ अशा चारधाम यात्रेतील घटना आहे ही.हरिद्वार,ॠषिकेश,यमनोत्री,गंगोत्री,केदारनाथपर्यंतची यात्रा छान पार पडली होती आणि बद्रिनाथ यात्रा सुरु झाली होती.
सुक्या सोड्यांचे कालवण
सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे.
मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात.
(साहेब असेच) ठोकत राहा
ठोकत राहा
घडत जाईन
बोलत राहा
ऐकत जाईन
येऊन दे मनातले बाहेर सारे
कल्पनेला अनाहूत बळ मिळेल
शब्दपंखानी उडत जाईन
पोहोचेन सत्वर कवींच्या गावा
सुंदर कविता लिहीत जाईन
रांगतोय सध्यातरी असं वाटतेय
हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन
प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन
ठोकत राहा असेच
हळूहळू घडत जाईन
शोधत राहा स्वतःमध्ये मला
इथेच पुढे असेन तुमच्यासमोर
जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन
बनायचंय थंडगार बर्फ़ावानी
माया करा मजवर आपुल्या लेकरावानी
कल्पनेच्या जगात रमतो मी
गाठेन मना " उन्मनी "
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही
नजरेतून पायउतार होणं
कधी जमलंच नाही
काय शोधत होतो अखेरपर्यंत
ते कधी कळलंच नाही
तो वेग मंदावला असाच
वारा बेभान वाहतच होता
धावता धावता कधी थांबलो
ते कळलंच नाही
खाली जमिनीवरूनच घेतला
वेध मी आकाशाचा
इच्छा मनात धरिता
तारा निखळून पडला
काय मागितलं होतं
अन काय पदरात पडलं
ते समजलंच नाही
सांगोपांगी कथा बहू ऐकल्या
काही ठेवल्या मनात
तर काही ओठात
जे घडलं प्रेमात माझ्या
ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही
माझं प्रेम माझ्याकडेच राहिलं
मला कधी फळलंच नाही
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
काव्यरस
सुवर्चला, ह्या कोणाच्या कोण बरे ?
मागच्या आठवड्यात नरसिंह जयंती निमीत्ताने एका मंदिरात जाणे झाले. मंदिराचे नाव लक्ष्मी- नरसिंह मंदिर होते , माझ्या सोबतच्या अलिकडील जनरेशनच्या एका नरसिंहभक्ताने लक्ष्मीचे नाव नरसिंहासोबत कसे ? हा प्रश्न विचारला ! बहुधा , नरसिंह हा वीष्णूचा अवतार म्हणून, असे त्रोटक उत्तर दिले कारण मलाही तेवढाच अंदाजा. सोबतच्या व्यक्ती तेवढ्यावर थांबली हे बरे झाले. 'अमूक हा तमूकचा अवतार म्हणून तमूकच्या पत्नीचे अमूक सोबत नाव जोडणे' असा काही अवघड प्रश्न त्याक्षणी नाही विचारला गेला हे नशीब कारण पुराणकारांप्रमाणे हजर जवाबी कथा तयार करण्याचे कौशल्य आपल्यात -म्हणजे माझ्यात- नाही.
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधायला जाऊ नये अशी एक म्हण आहे, पण मला वाटते वयाच्या एका टप्प्यावर सगळयांनाच "कस्त्वं कोऽहं कुत आयातः" असे प्रश्न पडत असावेत आणि मग माणूस आपल्या मुळाचा म्हणजे मूळ ठिकाण गाव देश कुलदैवत वगैरेचा विचार करू लागतो आणि शोध घेऊ लागतो.
माझेही थोडेसे तसेच झाले आणि मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. बरीच वर्षे इकडे तिकडे चौकशी केली, जे जे कोणी मेहेंदळे आडनावाचे भेटत गेले त्यांच्याकडे विचारत गेलो.
आमचा पण पुस्तक दिन
आज सकाळी सकाळीच आपल्या बावळट बाळूला कळलं की आज पुस्तक दिन आहे ते. सकाळी सकाळी म्हणजे असं की त्याच्या फेसबुक क्रश मातकट माऊने रात्रभरात कुठकुठल्या पोस्टला लाईक केले हे बघायला त्याने गोपाळमुहुर्तावर फेस्बुक उघडल्यावर. पण ही ‘प्रोसेस’ आम्ही जितकी सांगितली तितकी सहज नसते. ती समजण्यासाठी त्याआधी त्याने काय केलं हेही जाताजाता बघून घेऊ.
म्हणजे झोपेतून उठल्यावर त्याने आधी डोळे उघडले हे महत्वाचं.
मिसळपाव