Skip to main content

मी शिवाजी बोलतोय !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 14/04/2008 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ - म्हणजे तुमच्या भाषेत हां ! आज तुमच्यापैकी काहींच्या मते माझी जयंती-बाकी काहींच्या मते ती ६-एप्रिल रोजी आहे !

भारतरत्नाची जयंती

लेखक विकि यांनी सोमवार, 14/04/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि अनावश्यक गोष्टी संपादित केलेल्या आहेत. :संपादक

मिसळ!

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 13/04/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम पावणं.. मला तर वळिखलं असनंच म्हना तुमी.. अवो, तात्या म्हनं माज्यावर इष्टोरी लिवनार हाय म्हनून वाट बगून राहिले ना मी,पन किती दिस झालं त्यानं काय अजून लिवल नाय ते व्यकतीचित्तर का काय ते!
Taxonomy upgrade extras

काही संवाद

लेखक ॐकार यांनी रविवार, 13/04/2008 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव! संवाद १ ( वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ माध्यम : जीटॉक-चॅट स्थळ : नसत्या चौकश्या करू नका. ) १: नमस्कार २: नमस्कार १: नविन काय लिहिले? २: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही!

बेंगलोर मिपा ओसरी ...

लेखक छोटा डॉन यांनी रविवार, 13/04/2008 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत "बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला. आधी प्रोग्रॅमचा जास्त गाजावाजा न करता तो घेण्याचे ठरवून काल तो यशस्वी झाला. कार्यक्रमास सर्वश्री " अबब, स्वयंभू , छोटा डॉन तसेच काळोख [ आगामी आकर्षण] " उपस्थीत होते. या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या... यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.

दु:खद निधन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 13/04/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध स॑गीतकार श्री. दशरथ पुजारी या॑चे काल डो॑बिवली येथे कर्करोगाने देहावसान झाले. पुजारीसाहेबा॑चे नाव घेतले की आठवितात त्या॑नी निर्मिलेली साधी-सोपी, पण अवीट गोडीची भावगीत॑ आणि सात्विक वृत्तीची भक्तिगीत॑. त्या॑च्या गाण्याशिवाय आकाशवाणीचा तर दिवस जात नसेल. पुजारीसाहेबा॑नी स॑गीत दिलेली सुमन कल्याणपुरा॑च्या सुमधूर आवाजातील किती तरी गीत॑ रसिका॑ना आठवत असतील. 'रिम झीम करती श्रावण धारा' 'गरजत आले वारे' 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' ' अजुन त्या झुडुपा॑च्या मागे' यासारखी एक से एक सरस भावगीते आजही मनास व्याकूळ करतात. सकाळी आकाशवाणीवर 'केशवा माधवा' 'देव माझा विठू सावळा' 'हरि भजनाविण काळ' इ.

विसरणे - हसु आणि आसु

लेखक शितल यांनी रविवार, 13/04/2008 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अहो॑चा विसरणे हा ३६ गुणा॑पैकी एक गुण. ते कधी आणि काय आणि कसे विसरतील याचा नेम नाही. नविनच लग्न झाल्यावर मी खिचडी केली होती, त्या॑ना डिशमध्ये घालुन दिली , मग मी इतर कामाला लागले, हे मला विचारत आले अग! तु माझी खिचडी खाल्ली का ? मग आम्ही दोघे ही ती खिचडी शोधु लागलो, एकदाची ती पु़स्तका॑च्या कपाट मिळाली. दुसरी गंमत. आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहत होतो, तर हे, त॑द्रीत ४ मजल्यावर गेले आणि बेल कशी दिसत नाही म्हणून मग हसत खाली आले. क॑बरेला मोबाईलचे कव्हर आणि मोबाईल घरी हे तर वरचेवर असायचे.

संडे स्पेशल (मँगो सुफ्ले)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 13/04/2008 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
विजुभाऊंच्या आंब्याच्या बनात बसून खाण्याकरता :))))))) मँगो सुफ्ले साहित्यः ४ पिकलेले आंबे २ टे.स्पून पाणी १ टे.स्पून जिलेटीन (पावडर) २ अंडी (पिवळे व पांढरे वेगळे करणे) अर्धा कप दुध अर्धा कप साखर दिड कप क्रिम सजावटी साठी वाळलेल्या खोबर्‍याचे थोडे भाजलेले पातळ काप १.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. २.पाण्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.(एका बाऊलमधे पाणी घेऊन त्यात जिलेटीन घालणे.
Taxonomy upgrade extras

आजकालचे मराठी चित्रपट

लेखक अघळ पघळ यांनी रविवार, 13/04/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आजकाल गाजलेल्या इंग्रजी चित्रपटांवर अधारीत (म्हणजेच कॉपी मारलेले) चित्रपट काढायची टूम हिंदीतून मराठीमध्ये पण आली आहे. व्हॉट विमेन वॉन्ट आणि माय कझिन विनी ह्या दोन इंग्रजी चित्रपटांवर आधारीत अग बाई अरेच्च्या आणि कायद्याच बोला हे दोन चित्रपट बरेच गाजले. ह्या नविन लाटेविषयी आपल्याला काय वाटते? मराठी शिणेमांचा दर्जा सुधारण्यासाठी हे गरजेचे आहे का? -अघळ पघळ