Skip to main content

धोकादायक चायनीज खाणे

लेखक ताजे प्रेत यांनी मंगळवार, 09/06/2026 12:49 या दिवशी प्रकाशित केले.

इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेला प्रुशिया येथील महान शास्त्रद्न्य १८६५ मध्ये चीन मध्ये जाऊन चायनीज खाण्यावर संशोधन करत होता 
त्याने गेल्या जाही शे वर्षांचा अभ्यास करून सिद्ध केले कि शेकडो वर्षा पासून चीन मधील जे मरण पावले ते लोक चायनीज खाऊन मेले.
त्याने सांगितले कि त्याच्या आसपास जे चीनमधील चिनी लोक चायनीज खात होते ते मरणार आहेत, जे खरे ठरले

उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीय हे कधी समजणार कि चायनीज खाणे धोकादायक आहे ?
 

तपपूर्ती

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/06/2026 21:41 या दिवशी प्रकाशित केले.

२६ मे २०२६ या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास १२ वर्षे पूर्ण झाली. सलग १२ वर्षे पंतप्रधानपदावर राहणारे मोदी हे स्वतंत्र भारतातील हे केवळ दुसरे पंतप्रधान. यानिमित्ताने त्यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. 

 

या कालखंडात घडलेल्या चांगल्या गोष्टी -

 

- One rank One Pension ही सैन्यदलाची अनेक वर्षे प्रलंबित असलेली मागणी मान्य करण्यात आली.

 

हवामान खात्याचे अंदाज: पावसाळ्यापूर्वीचे ‘सस्पेन्स थ्रिलर’!

लेखक अनिशासूत यांनी सोमवार, 08/06/2026 14:16 या दिवशी प्रकाशित केले.

 

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.

.

लेखक आशानिल यांनी सोमवार, 08/06/2026 13:41 या दिवशी प्रकाशित केले.

सह्याद्रीचा एक कडा

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 07/06/2026 00:51 या दिवशी प्रकाशित केले.

कालवर जो अढळ होता

सह्याद्रीचा एक कडा

आज तिथे फक्त उरलाय 

एक उघडा, जखमी तुकडा

 

पोकलेनच्या सुळ्यांनी 

त्याची कुस पोखरली

हिरवी शाल ओरबाडून 

लाल माती पाडली

 

ज्या पठारावर खेळले 

पाऊस, वारा नी ऊन

काव्यरस

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 05/06/2026 23:01 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.

मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.

सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच. अनेक ठिकाणी रश्यात काही बाही पदार्थ "मिसळलेले" आढळले आहे. अगदी माश्याचा रस्सा, कालचा रस्सा वगैरे.

मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ असते. मुख्य असते मटकी, पण ती असते अगदी कमी

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २१ (अंतिम): फक्त कृतज्ञता!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 05/06/2026 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी ह्या २० दिवसांमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" प्रवास झाला. तो ३१ जानेवारीला चेन्नै येथे पूर्ण झाला. आपला देश खूप वेगळ्या प्रकारे अनुभवता आला आणि आपल्या देशबांधवांना भेटता आलं. चेन्नैमध्ये हा प्रवास थांबवताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आणि कोणत्याच प्रकारे ही एखादी अचिव्हमेंट आहे असं वाटत नाही. सायकलिंगची आवड, त्यासाठीचं मार्गदर्शन, तयारी, निसर्गाने दिलेली क्षमता, निरामय सदस्यांची मदत, प्रवासासाठीची मदत अशा गोष्टी सगळ्या बाहेरून आल्या व मी त्या फक्त माझ्यामध्ये साकार होताना बघितल्या. प्रत्येकाला निसर्गाने दिलेली ही क्षमता असते.

चीन: रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग २

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 05/06/2026 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
४ जून १९८९ ला झालेली तियानानमेन चौकातील कत्तल  
 
प्रास्ताविक 
 
अगदीच थोडक्यात सांगायचं तर "तियानानमेन चौक" या बेजिंगमधील मध्यवर्ती चौकात सरकार विरोधी चळवळीसाठी एकत्र जमलेल्या काही लाख विद्य

सत्याचा क्षण

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 05/06/2026 00:58 या दिवशी प्रकाशित केले.

---

 

तळेगाव शिवारातलं कोकण कडेकडेपर्यंत पसरलेलं हिरवं गालिच्यासारखं दिसत होतं. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. भाताची रोपं लावायला गावकरी सज्ज झाले होते. पण यंदाचं वातावरण काही वेगळंच होतं. ग्रामपंचायतीची निवडणूक डोक्यावर आली होती. दोन गट आमने-सामने उभे होते – एकीकडे पंधरा वर्षांचा सरपंच असलेले मामासाहेब पाटील आणि दुसरीकडे गावातली नवी पिढी म्हणून उभे राहिलेले सिद्धेश देसाई, ज्यांना सगळे 'सिद्धूभाऊ' म्हणायचे.