Skip to main content

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 05/06/2026 23:01 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.

मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.

सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच. अनेक ठिकाणी रश्यात काही बाही पदार्थ "मिसळलेले" आढळले आहे. अगदी माश्याचा रस्सा, कालचा रस्सा वगैरे.

मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ असते. मुख्य असते मटकी, पण ती असते अगदी कमी

बाकी भुस्कट फरसाण ते तर आयते तयार असते अन कोणत्या तेलात अन पिठात बनवतात काय माहीती. अगदी मक्याच्या पिठाचेही फरसाण, शेव असते. 
(मी असे पदार्थ तयार करणार्या मशिनरीच्या कंपन्या अन सर्वीस जवळू पाहीली आहे. नावाजलेल्या कंपन्यांत कन्व्हेअर बेल्ट, मिक्सर मध्ये अगदी आळ्या सापडलेल्या आहेत.)

बाकी पाव तर तयार असतात. अन बहुतेक वेळा ताजे असतीलच असे नाही.

अन आजकाल पापड, जिलेबी, गुलाबजाम काय देतात!!

नुसते कौतूक.

#MisalPav #मिसळपाव


वाचने 470
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

आमच्या शेजारी मुळचे सिन्नर  तालुक्यातील होते. ते गावाहून मटकी आणत त्या मटकीची  उसळ खूपच चवदार लागायची . मिसळीची चव मटकीवर अवलंबून  असते. त्यामुळे खेड्यात मिळणारी मिसळ ही शहरात मिळणाऱ्या मिसळीपेक्षा चवदार असते.  

 


In reply to by आग्या१९९०

खेड्यात एकमेकांना तोंड दाखवायचे असते. सामाजिक दबाव असतो.

शहरात कोणी कोणाला ओळखत नाही. खायचे तर खा नाहितर येतील छप्पन.


दुर्दैवाने हे खरे आहे. मिसळीत भजी टाकली, उसळ नी शेव जास्त असलेले फरसाण! चविष्ट रस्सा असेल तर मिसळी इतका उत्तम पदार्थ नाही! कधी धुळ्यात आला तर सिंधीची मिसळ चाखा! 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

सिंधी धुळ्यात अन नाशिक मुंबैत आण्णा मिसळ बनवतो. भैये जिलबी फापडा कारागीर आहेत. वेटर ओरीसाचे, बंगालचे.

या अन चढा आमच्यावर. खा आमचे धंदे..


In reply to by पाषाणभेद

हाहा, खरं आहे! बाकी धुळ्यात हजारेंची मिसळही फेमस आहे. ९.३० च्या आधी पोहोचावे लागते नाहीतर संपते.


बहुतेक वेळा लेखक आणि प्रतिसादकर्ते वेगळ्या ग्रहांवर असतात असे वाटते. इथे पाभेंना मिसळीला शिव्या घालणे अपेक्षित आहे तर पब्लिक इथं चांगली मिसळ मिळते नि तिथं चांगली मिसळ मिळते करुन राह्यलेत. लेखकाला उभारी येईल असे प्रतिसाद देत चला लोक्स !


In reply to by धर्मराजमुटके

धर्मराज सर,

 __/\__

 

बघाना, मिसळीचा ९०% कच्चा माल आयता मिळतो. आजकाल तर हाटेलींना मटकी देखिल आयती तयार मिळते. बाकी हाटेली, हातगाडीवाले केवळ व्यवस्थापन बघतात.

 

अन मोठे मोठे हाटेलीवाले गावाबाहेर जागा घेऊन हाटेल पर्यटन सुरू करत आहेत. त्यात पक्षी दाखवाणे, जत्रेतली खेळणी ठेवणे, फुगे फोडणे असे असते. एक कुटूंबाला सुटीचे पर्यटन समजू शकते पण मग तेथे मिसळीच मिळते.

 

घरातल्या गृहीणी याच्या पेक्षा जास्त निगूतीने, कष्टाने इतर अनेक पदार्थ चविष्ट, स्वच्छ, आरोग्यपूर्ण बनवत असतात.

 

२०-२० क्रिकेट सारखी मिसळ चटपटीत, लवकर पोटभरू पदार्थ आहे. 


In reply to by धर्मराजमुटके

धर्मराज सर,

 __/\__

 

बघाना, मिसळीचा ९०% कच्चा माल आयता मिळतो. आजकाल तर हाटेलींना मटकी देखिल आयती तयार मिळते. बाकी हाटेली, हातगाडीवाले केवळ व्यवस्थापन बघतात.

 

अन मोठे मोठे हाटेलीवाले गावाबाहेर जागा घेऊन हाटेल पर्यटन सुरू करत आहेत. त्यात पक्षी दाखवाणे, जत्रेतली खेळणी ठेवणे, फुगे फोडणे असे असते. एक कुटूंबाला सुटीचे पर्यटन समजू शकते पण मग तेथे मिसळीच मिळते.

 

घरातल्या गृहीणी याच्या पेक्षा जास्त निगूतीने, कष्टाने इतर अनेक पदार्थ चविष्ट, स्वच्छ, आरोग्यपूर्ण बनवत असतात.

 

२०-२० क्रिकेट सारखी मिसळ चटपटीत, लवकर पोटभरू पदार्थ आहे. 


90 टक्के वेळा खराब मिसळ मिळते! फक्त १० टक्के दुकानातच मिसळ मिसळूसारखी मिळते.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

उसळ अगदी कालची असली तरी केवळ गरम रस्सा यावर हाटेल चालू शकते.

 

वा रे ते रे डाव,

एक मिसळ

दहा दहा पाव.

 

ए आण रे रस्सा.


पुष्कळ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी मिसळपाव हा एक नवा पदार्थ (विशेषत: पुण्यात) प्रचलनात येत होता. दिल्ली, इंदूर वगैरेमधे ऐकिवात नव्हता. आमचे सगळे नातेवाईक पुण्यात असल्याने एकदा पुण्याला गेलो की सगळ्यांकडे जावे लागायचे (त्याकाळी अगत्याने घरी बोलवायची प्रथा संपलेली नव्हती) पण गम्मत म्हणजे सगळ्यांकडे "मस्तपैकी मिसळपाव बनवली आहे" हेच. अगदी वैताग आला होता. भेट नको पण मि.पा. आवर असे झाले होते. फालतू पदार्थ आहे. 


In reply to by चित्रगुप्त

नाशकात तर मखमलाबाद रोड हा मिसळपाव रोड गणला जातो आहे. 

लोकं पर्यटनाला जावे तसे मिसळपाव खाण्याला जातात.

 

माझा मुख्य आक्षेप मिसळपाव हा अतिशय कमी पाककौशल्य असलेला, अवाजवी प्रसिद्धी दिलेला पदार्थ आहे.

 

त्यापेक्षा थालीपिठ, सांजा, घावण वगैरे बनवायला जास्त कष्ट पुरतात. परंतु ते आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने चांगले, स्वच्छ, आरोग्यपूर्ण असतात.

 

मिसळीच्या किंमतीही गैरलागू आहेत. 


२०-२० क्रिकेट सारखी मिसळ चटपटीत, लवकर पोटभरू पदार्थ आहे.  >>>>
  मी ह्याबाबत असहमत आहे. अनेक ठिकाणी वाईट मिसळ मिळते मान्य! पण ज्या ठिकाणी चविष्ट मिसळ मिळते तिथे नक्कीच कष्ट घेतलेले असतात! रस्सा वडा आणी मिसळसाठी काही दुकाने फेमस असतात, तिथला रस्सा हा तेलकट नी मसालेदार नसतो तरीही चविष्ट असतो त्या साठी कष्ट असतात!  अश्या ठिकाणची मिसळही चविष्ट असते. मी मैदा खात नाही त्यामुळे पावही खात नाही मिसळ पोळीसोबत खातो. त्यामुळे ९० टक्के ठिकाणी वाईट मिळत असली तरीही ज्या दहा ठिकाणी मिसळ मिळते ती चांगलीच असते. बाकी घरात बनलेली मिसळ भयंकर असते, कुणाच्याही घरी खा. चित्रगुप्त काकानी बरोबर सांगितले, कुणाच्या घरी गेलो नी मिसळ आली खायला तर समजायचं कार्यक्रम झाला. 🤣

 


ऐक्चुअली मिसळपाव हा ओव्हर्हाईप्ड पदार्थ झाला आहे. 

सर्व मराठीभाषकांची सामायिक मालकी आणि प्रत्येकाचे त्यात योगदान असताना केवळ प. महाराष्ट्राच्या काही भागाने विषेषत: पुणेकरांनी जणू काही याचा सातबारा आपल्या नावावर केला आहे. बरं केला तर केला पण काही व्हैल्यु ऐडिशन म्हणावे तर ते तसे नाही. उगी उपासाचीच कर, चुलीवर कर, तंदूरला कर, आत कोळसा टाकून स्मोकी इफेक्ट दे असले हांडगे प्रकार मिसळपाव संदर्भात सुरु आहेत. मिसळपावचे खरे दर्दी चाहते मिसळपावकडून काय अपेक्षा करतात त्यापेक्षा स्वत:ला काय पाहिजे तेच घालायचे आणि सर्वांना ते आवडायला पाहिजे, त्याचे रिव्ह्युस चांगले आले पाहिजेत , ओरिजैनिलिटी ला कोलून, प्रतिस्पर्ध्याची उणेदुणी काढूनच स्वत:ला सिध्द करायचा अट्टाहास ह्यामुळे अट्टल खवय्ये आता "नको मिसळपाव" ह्या लेव्हलला आले आहेत. खवय्यांना आता असल्या पुळचट प्रयोगांचा आणि ते करणाऱ्या लोकांचाही राग आला आहे. कदाचित अशा प्रयोगातून मिसळपावचा मूळ आत्मा कुठेतरी गवसेल म्हणून वारंवार मिसळपाव कडे येणाऱ्या खवय्यांचाही भ्रमनिरास होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपला वेळ आणि पैसा खर्चून काहीतरी भुस्सा भरण्याची वेळ सतत येत गेल्यास इतर चवींकडे आणि ते मिळणाऱ्या स्थळांकडे लोकांनी आपला मोहरा वळवायची वेळ आली आहे. 

मूळ मिसळपाव म्हणजे काय आहे हे आता खरोखरच सम्जून घ्यायची वेळ आली आहे. 


महाराष्ट्रात लोकांचे दोन प्रकार आहेत.  

१) ज्यांना मिसळ आवडते ते --विविध ठिकाणी मिसळ चाखायला जातात आणि मिसळपाव सारख्या स्थळावर सुद्धा येतात.

२) बाकी लोक -- मिसळ ही पदार्थ म्हणून कशी चांगली नाही यावर  फालतू चर्चा करतात  


हा हा हा.. मला सर्वात जास्त रोचक वाटणारा प्रकार म्हणजे मिसळीसारख्या पोटभरू आणि कधीकधी चविष्ट निघणाऱ्या पदार्थाबाबत भाषिक अस्मितेपेक्षा तीव्र प्रादेशिक अस्मिता असतात. आमची मिसळ खरी अस्सल.. वाटाणा विरुद्ध मटकी, जहाल विरुद्ध मवाळ.. पापडी विरुद्ध फरसाण.. पोहे विरुद्ध बटाटा..


पाव सॅम्पलची पुढची जनरेशन आहे.

बेकरीतून मिळणारे पदार्थ  पुर्वी वर्ज्य होते. हळूहळू ब्रिटिश स्थिरस्थावर झाले व याचा  प्रसार  दोन स्तरावर  झाला. एक उच्चभ्रू जे साहेबांचे अनुकरण करण्यात  धन्यता  मानत होते. दुसरे गरीब कष्ठकरी ज्यांना ही गोष्ट  पोटभरण्यासाठी सहज व स्वस्त  होती. त्यातून 

 

चहा बटर

चहा पाव 

बन मस्का

पाव सॅम्पल 

वगैरे पदार्थ पुढे आले.

 

भारतातील  पहिली बेकरी केरळ मधे सुरू झाली. नाताळ करता केक हा प्रमुख  पदार्थ  साहेबासाठी अनिवार्य असल्याने तो तिथेच बनू लागला. मग पुढे पाव,बटर, बिस्किट, पेस्ट्रीज अशी अनेक रूपे विकसीत  झाली.  असो ही एक वेगळीच जिल्बी पडू शकते. 


In reply to by कर्नलतपस्वी

बिस्कीट हा तर वेगळाच मूर्ख पदार्थ आहे, २५ टक्के साखर ७० टक्के मैदा पाम तेल नी काय काय व्याक! 


In reply to by कर्नलतपस्वी

बिस्कीट हा तर वेगळाच मूर्ख पदार्थ आहे, २५ टक्के साखर ७० टक्के मैदा पाम तेल नी काय काय व्याक! 


अजिबात खात नाही. 

 

बिस्किट पेक्षा गोड शंकरपाळी खावी.

 

तसेही मैदा,साखर  गुळ कमीच  जवळपास खातच नाही.