कालवर जो अढळ होता
सह्याद्रीचा एक कडा
आज तिथे फक्त उरलाय
एक उघडा, जखमी तुकडा
पोकलेनच्या सुळ्यांनी
त्याची कुस पोखरली
हिरवी शाल ओरबाडून
लाल माती पाडली
ज्या पठारावर खेळले
पाऊस, वारा नी ऊन
तेच पठार आज ओरबाडले
सुरुंगाचे घाव घालून
पक्षी उडाले घरटी सोडून
झाडं पडली कोलमडून
डोंगर रडतोय मुकाट्याने
आपलंच मरण बघून
कैक पिढ्यांच्या वहिवाटीच्या
मिटल्या त्या पाऊलखुणा
मुका झाला आसमंत सारा
भासे आज केविलवाणा
भस्मासूर होऊन माणूस
डोंगर राने खात सुटला
हात मारून कपाळावर
स्वतःच्याच मुळावर उठला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया