Skip to main content

काक मृत्यू

लेखक मेघनाद यांनी बुधवार, 20/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता. काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.

सीमारेषा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/03/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं ------ श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित.... आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे फार अवघड असते गं ------- सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...
काव्यरस

जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!

लेखक साऊ यांनी बुधवार, 20/03/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!! तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्‍हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला.

पिझ्झा पुरी

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 20/03/2013 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - १ कप रवा - २ चमचे टोमॅटो प्युरी - १/२ कप बेसिल - १/४ चमचा ओरेगानो - १/४ चमचा काळि मिरी पावाडर - १/२ चमचा रेड चिली फ्लेक्स - १/२ चमचा चीज - १/२ वाटी खायचा लाल रंग - १/४ चमचा तेल तळण्यासाठी मिठ चवीनुसार कॄती: १. मैदा व रवा एकत्र करुन घ्यावा. त्यात टोमॅटो प्युरी, बेसिल, ओरेगानो, काळि मिरी पावडर, चिली फ्लेक्स, लाल रंग व चवीनुसार मिठ टाकुन पीठ मळुन १ तास झाकुन ठेवावे. p1 २.

तिरफळाची बांगड्याची आमटी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 19/03/2013 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)५-६ ताजे बांगडे. २)१०-१२ लाल मिरच्या. ३)हळद्पूड. ४)खवलेला नारळ(अर्धा नारळ) ५)५-६ आमसुले. ६)८-९ तिरफळे. ७)मीठ. ८)एक चमचा धणे. कॄती :-बांगड्याचे तुकडे करून घ्यावे.खवलेले खोबरे,मिरच्या,धणे,हळद एकत्र वाटावे.वाटण आमटी करणार त्या भांड्यात काढून घ्यावे.त्यात मीठ व ठेचलेली तिरफळे घालून शिजत ठेवावे.उकळायला आले की त्यात बांगडे व आमसुले घालावी.व आमटी चांगली उकळून घ्यावी.

शित्याची खोड

लेखक नरेश_ यांनी मंगळवार, 19/03/2013 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
शित्याशेट ज्याम दिवस गावातनं गायप झाल्ता.कुनाला कय खबर ना पता. नाय म्हनाल आशिला सांगला व्हता क मामासकरं जातू म्हनून! शित्याशेट म्हनजे सिताराम म्हात्रे- हा तोच तो. एक नं. झोलर मानुस.मागं पन आपल्याला तो भेटलावता.

चाकवतची ताकातली पातळ भाजी

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 19/03/2013 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज आमटी करून कंटाळा येतो. काहीतरी कढी, सार असा बदल छान वाटतो. याच उद्देशाने केलेली ही चाकवतची ताकातली पातळ भाजी!! चाकवत ऐवजी पालक वापरूनही याच क्रुतीने ही भाजी करता येते. साहित्यः एक जुडी चाकवत, अर्धा लीटर दह्याचे ताक, दोन-तीन चमचे बेसन, आठ-दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ओले अगर भिजवलेले काजूगर(ऐच्छीक), मीठ, साखर, वाट्लेली ओली मिरची अर्धा चमचा अगर लाल तिखट, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जीरे, सुक्या मिरच्या दोन-तीन्, मेथी दाणे दहा-बारा. क्रुती: प्रथम चाकवत निवडून, धुवून, चिरून कुकरला वाफवून घ्यावा. दही मिक्सरला घुसळून घ्यावे. चाकवत आणि बेसन पीठ एकत्र मिक्सरला थोडे फिरवून घ्यावे.

'लेह' वारी, भाग ७

लेखक मनराव यांनी मंगळवार, 19/03/2013 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
काही करणास्तव महिना दिडमहिना लिहायला उशिर झाल्यबद्द्ल क्षमस्व.....अता पुढे.... 'लेह' वारी, भाग १ 'लेह' वारी, भाग २ 'लेह' वारी, भाग ३ 'लेह' वारी, भाग ४ 'लेह' वारी, भाग ५ 'लेह' वारी, भाग ६ मनालीला जाताना रोहतांग पासला काळजी घ्या असा सल्ला त्य

द्रमुकने केंद्राचा पाठिंबा काढला

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 19/03/2013 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी अखेरीस द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे जाहिर केले आहे. श्रीलंकेतील तामिळींवर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात भारताने काही ठोस भुमिका घ्यावी ह्या उद्देशाने करुणानीधींनी पाठिंबा काढला असल्याचे कळते. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19061506.cms पण एकंदरीत पहाता १) हा करुणानिधींचा स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार आहे? २) करुणा निधींना खरोखर तामिळींची फिकीर आहे? ३) इतर काही यामागे घडामोडी आहेत? तुम्हाला काय वाटते?