Skip to main content

पाळ्णा

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 11/04/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा सण पहिला । गुढी उभारुन साजरा केला । नविन वार्षास प्रारंभ झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ दुसरा सण व्यासपौर्णिमा । सद्गुरु स्वारीचा गाऊ महिमा । त्रीजगती नाही उपमा । ये श्री दत्ता ये ये ॥ तिसरा सण पंचमी आली । नागराजाची पुजा ही केली । झोका खेळाया जमल्या मुली । ये श्री दत्ता ये ये ॥ चौथा सण रक्षाबंधन । भाऊरायाला राखी बांधीन । आई बाबांना प्रथम वंदन । ये श्री दत्ता ये ये ॥ पाचवा सण गोपाळ काला गोप्गोपींचा मेळा जमला हांडी फोडण्या त्वरे निघाला ये श्री दत्ता ये ये ॥ सहावा सण श्रावण पोळा । बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा । शेतकरीदादाला आनंद झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ सातवा सण गणे

सैर भैर २

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 11/04/2013 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० सालची गोष्ट असेल. मी नौदलाच्या कुलाब्याच्या अश्विनी रुग्णालयात मनोविकार विभागात विभाग प्रमुख कर्नल पेठे यांच्या बरोबर बसलो होतो. त्यांनी पुढच्या रुग्णाला बोलावले. पुढचा रुग्ण एक वरिष्ठ कर्नल आपल्या पत्नीसमवेत आत आला. कर्नल साहेब ४५ ते ५० च्या मध्ये होते आणि ते गणवेशात होते.ते कुलाब्याच्या थळ सेनेच्या महाराष्ट्र गुजरात आणि गोवा विभागाच्या मुख्यालयात कामाला होते. त्यांची अंगकाठी सडपातळ आणी चालण्यात रुबाब होता. पत्नी साधारण ४० च्या आसपास होत्या.टापटीप आणि छान पोशाख केलेल्या. मी विचारात पडलो कि यात रुग्ण कोण? पेठे सरानी पत्नीला विचारले कि काय म्हणताय आणि साहेब काय म्हणताहेत?

सरंजामशाही संपली आहे का?

लेखक शैलेंद्रसिंह यांनी बुधवार, 10/04/2013 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं. शिवरायांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले ह्यांचे जवळपास ११ हजार ४७० एकर शेतजमिनीवर भोगवटादार म्हणुन सातबाराच्या उताऱ्यात नाव आहे आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा कुळ म्हणुन उल्लेख आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीचे व्यवहार करतांना त्रास होतो.

वेडी....

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/04/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे ९० चं दशक असेल.. ठाणे स्थानकावर एक वेडसर भिकारीण दिसायची.. नेहमी तिच्या हातात एक तान्हं मूल असे..तिच्या हावभावावरून, वागणुकीवरून ती वेडसर होती हे निश्चित.. रहायचीही स्थानकाच्याच परिसरात.. आता सतत अगदी जातायेता तिच्यावर लक्ष जायचं असं नव्हे..परंतु ती दिसायचीच.. ती दिसली की माझ्यासारखे अनेक जण कदाचित तिला नोटीस करत असतील आणि अनेक जण नसतीलही.. या गोष्टीला, म्हणजे तिच्या अशा नेहमी दिसण्याला माझ्या आठवणीप्रमाणे ५-६ वर्ष तरी सहज झाली असतील.. त्यानंतर एकदा केव्हातरी देवेन्द्र मिश्राशी बोलताना अगदी सहजच तिचा विषय निघाला होता..

कधी वाटतं..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/04/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटतं.. नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं.. तर कधी वाटतं... भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या.. कधी वाटतं.. बाबूजींच्या पायाशी बसून 'झाला महार पंढरीनाथ..' किंवा 'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं.. तर कधी वाटतं.. थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं.. आणि तिच्या पायांना मिठी मारावी.. कधी वाटतं... हळूच, पावलांचा आवाज न करता कलाश्री बंगल्यात शिरावं... आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला पुरिया कानी पडावा.. वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन चुपचाप

'लेह' वारी, अंतिम भाग

लेखक मनराव यांनी बुधवार, 10/04/2013 14:56 या दिवशी प्रकाशित केले.

बाजारभाव (४-११-२००९)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 10/04/2013 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये बायका मारत होत्या गप्पा महगाईचा विषय होता साधा आणि सोपा काल बाई जेंव्हा मी मार्केटला गेले भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी एक रुपयाचे लिंबू पाच रुपयाला झाले कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले बारा रु.पाव किलो वांगी व कारले फ्लॉवर कोबी बघुन डोकेच फिरले वीस पंचवीस रुपये किलो होते तेथे गहू तंदुळ म्हणाला मला हातच नका लाऊ शंभर रु.किलो झाली तुरीची डाळ भडकलेले होते हरभरे आणि वाल साखरेचा भाव तर पस्तीसवर गेला तेलाचा डबा पण किती महाग झाला दुध झाले महाग चाळीस रुपये लिटर विचारायलाच नको चीज आणि बटर सगळीकडेच भडकली अशी ही महागाई

अहो चहा घेताय ना? (कथा)

लेखक मी_देव यांनी बुधवार, 10/04/2013 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.” दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली. कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने. विनायक बॅंकेत मॅनेजर होता. मात्र मागील वर्षी त्यानेही नोकरी सोडली होती.

लाल भोपळ्याच्या पुर्‍या (घारगे)

लेखक रेवती यांनी बुधवार, 10/04/2013 07:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: लाल भोपळा, कणीक, तांदूळ पिठी, गूळ, वेलदोडे, हळद, मोहनासाठी व पुर्‍या तळण्यासाठी तेल. कृती: पारंपारिक पद्धतीमध्ये लाल भोपळा किसून घेत. त्यात हळद व तेल घालून मिश्रण शिजवून घेत असत. मी मायक्रोवेव्हचा वापर केल्याने पद्धत थोडी वेगळी आहे. लाल भोपळ्याची मोठी फोड सालासकट मायक्रोवेव्ह सुरक्षित भांड्यात ठेवून त्यावर पाणी शिंपडावे. आता हा भोपळा पाच मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये झाकण ठेवून उकडावा. दोन मिनिटे तसाच ठेवून नंतर भोपळ्याची वरची बाजू खाली करून पुन्हा पाच मिनिटे उकडावा. कोमट झाल्यानंतर गर चमच्याने काढून घेता येईल. तो गर वाटीने मोजून घ्यावा.

गॅलेक्सी Y प्रो वर मराठी कसे लिहावे?

लेखक नानबा यांनी बुधवार, 10/04/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
अँड्रॉईडचा जमाना आल्यापासून त्याचे आकर्षण होतेच, परंतु त्या आधी हातात ब्लॅकबेरी असल्यामुळे क्वेर्टी किबोर्ड वाल्या फोनची सवय होती. त्यामुळे क्वेर्टी किबोर्ड असलेल्या फोनची बरीच शोधाशोध केल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी Y प्रो हा फोन सापडला. परंतु यात मराठी अथवा देवनागरी लिपीत लिहीता येत नाही. बाकी अँड्रॉईड फोन्स साठी प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले अनेक देवनागरी फोनेटिक किबोर्ड्स आहेत. पण माझ्या फोन मध्ये डिव्हाईस किबोर्ड असल्याने मला त्या किबोर्डस ना वापरता येत नाही. बरेच प्रयत्न करून झालेत, कस्टम लोकल वापरून सिस्ट्म भाषा हिंदी केली, पण त्यानेसुद्धा काहीही फरक पडला नाही.