Skip to main content

कदाचित चित्रपट परिचय : अभय (कमल हासनचा नव्हे)

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 15/10/2014 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला नाना पाटेकरचा एक जुना हिंदी चित्रपट आठवतो दूरदर्शनवर बघितलेला. रविवारी दुपारी चुकून हिंदीच लावला होता. नाना एका हवेलीमध्ये रहात असतो. जुना संस्थानिक वगैरे काही. वैतागलेला, चिडलेला असा नेहमीचाच. मरतो काही कारणानं. मेल्यानंतर त्याचा आत्मा तिथं राहून येणारांना पळवून लावत असतो. भंडावून सोडून, घाबरवून, चिडचिड करुन. एक कुटुंब येतं तिथं. मुलं आणि आईवडील. नाना सातत्यानं चिरडीला येऊन ह्यांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात. कधी नुसतं शरीर तर कधी नुसतं डोकं दाखवून वगैरे. पण त्या कुटूंबातली एक चिमुरडी धीट असते, अजिबात न घाबरणारी. ती त्याला महाराज वगैरे म्हणायला लागते. का चिडचिड करतोस म्हणे.

चांगले गुण आणि वाईट गुण

लेखक अबोली. यांनी मंगळवार, 14/10/2014 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा मिसळपाव वरचा पहिलाच लेख. आपल्या भोवती अनेक माणसे असतात जसे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, सहकारी वगैरे. प्रत्येक माणसाचे काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात. इथे आपण एखाद्या माणसाचे चांगले गुण आणि वाईट गुण यांची यादी करू. त्यातून कदाचित नवीन चांगले गुण कळतील. आणि एखाद्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळेल. आणि वाईट गुण टाळता येतील. माणसाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. नुसत्या गुण दोष चर्चा करूया. उदाहरणार्थ- चांगले गुण- टापटीप पणा, शिस्त, साधेपणा वाईट गुण - विचार न करता एकदम बोलणे, टोमणे मारणे वगैरे वगैरे.

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 14/10/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे. बहुमताने क्र.

पाया सूप

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी मंगळवार, 14/10/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
गेली अनेक वर्ष माझ्या गुढघेदुखी पुढे मी गुढघे टेकले होते. सुरवाती सुरवातीला या व्याधीचं जरा कौतुक वाटायचं एका एका बाजूला डोलत डोलत चालताना म्हातारी झाल्याचं मस्त फिलिंग यायचं. पण दुखायला लागलं आणि सगळी मजा निघून गेली. त्या आधीच कित्येक वर्ष याच कारणाने मैफिली बंद करायला लागल्या गळा गाता होता पण गुढघा बोंबलला. शिवाजी महाराजांना नाही का याच गुढघी रोगानं ग्रासलं होतं? हिंदवी स्वराज्याच स्वप्न तेंव्हापासून बोंबललं ते बोंबललच. डॉक्टर म्हणायचे आजी याला एकच उपाय आणि तो म्हणजे सर्जरी करून गुढघा बदल शस्त्रक्रिया करायची. पण याला माझी तयारी नव्हती. सुरवातीला आणल्या त्या घट्ट ईलेस्टीकच्या पुंगळ्या.

बोगदा

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 14/10/2014 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद?

क्लास

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 14/10/2014 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.

<लवंग>

लेखक अनुप ढेरे यांनी मंगळवार, 14/10/2014 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा माझाच आवाज सतत हरवतो तुझ्या दुकानी . . . कोसळणारे लाल धबधबे चारीठायी . . . झटणारा मी तांबुल-इच्छुक गर्दीमधला . . . सुपारी कातर चुना पानभर किमाम दरवळी . . . बंद करण्या लवंग टिचभर अडकवलेली . . . लाल भडक तृप्तीचे वैभव मन आनंदी.

बयो !!!!

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 14/10/2014 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९) बयो !!!! बऱ्याच तात्पुरत्या नोकऱ्या झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत राम वाटत नव्हता. आणि पगारातपण म्हणावी तशी वाढ होत नव्हती. काय करावे काळत नव्हते. स्वतः चा व्यवसाय करायचे डोक्यात होते पण आपल्याला जमेल का ?, भांडवल कुठून आणायचे?, तोटा झाला तर काय ?, असे असंख्य प्रश्न भंडावत होते. घरी सर्वांना माझी अस्वस्थता जाणवत होती. आईला माहित होते कि याचे काही ठीक चालले नाहीये. तिने सरळच विचारले, "काय रे काही प्रोब्लेम आहे का?" "नाही, काही नाही". "मग असा का घुम्यासारखा बसून असतोस? कसला विचार करतोस एवढा?" "काही नाही, हे असंच चालू राहिलं तर कठीण आहे.

तवंग

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 13/10/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच चंद्र सतत हरवतो तुझ्या आभाळी कोसळणारे गढूळ धबधबे कडेकपारी झडणारा मी वसंत टपटप अश्रूंमधला ओळी कातर उल्लेख पानभर व्याकुळ शाई बंद पापण्या तवंग मणभर साचवलेले हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी
काव्यरस

पोहे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 13/10/2014 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसा पुर्वि एक कविता मीपा वर वाचली निट आठवत नाहि पण ति कल्पना जाम आवडली व त्या नुसार कविता ्लिहावि असे वाटत होते "येथे उपासाच्या कचोर्‍या मिळतील..असे काहिसे शब्द होते कविता आवडल्यास त्याचे श्रेय त्या अज्ञात कविस व त्याच्या कल्पना शक्तिस. ========================================= पोहे पृथ्वीच्या अर्धगोलाकार आकाराची कढई... खाली सहस्र सूर्य ओकतोय अशी आग तापलेलेल्या रिफाइंड तेलाच्या डोहात मोहरीचे, ब्रह्मांडात अणू रेणूचे चालते तसे तडतड नर्तन साथीला हिरव्या मिरच्या व कढीपत्त्याचा व्योमास भेदणारा चर्र्र्र असा नाद कांदे व बटाट्याचे काप व रुद्राचा हळदीचा भंडारा सूर्याच्या रक्तिमा सारखे लाल तिख