Skip to main content

दिवाळी (कविता)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी गुरुवार, 27/10/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे मानवाच्या संगतीने, देवसुद्धा
काव्यरस

एकदा पहावा असा व्हिडिओ

लेखक alokhande यांनी गुरुवार, 27/10/2016 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
यु ट्युब वर हा विडिओ पहिला आणि यावर्षीचि दिवाळी एक्दम सध्या पध्दतीने साजरी करून शिल्लक पैसे मधून गरीब लोकांना त्यांच्या गर्जेनुसार वस्तू देनार आहे आपण हि एक्दापहावा असा विडिओ लिंक - https://m.youtube.com/watch?v=g1Jpn0Kmsu4

चांदण्याला चांदणे समजू नये

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 27/10/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

गीतगुंजन २३: बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन

लेखक प्रास यांनी गुरुवार, 27/10/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
संगीत सृष्टीमध्ये साठच्या दशकाला एक वेगळंच वलय आहे. या काळात रॉक, ब्लूज, सोल, जॅझ, कंट्री असं भावनांच्या उत्स्फूर्त कल्लोळाला कवेत घेणारं संगीत तयार झालं, आणि त्याबरोबरच तयार झाले या संगीताला शब्द देणारे गीतकार. या संगीत प्रकाराला साजेशी गीतं लिहिणं हे खरं तर तसं कसबी काम पण हा काळच असा होता की या काळाला साजेसे गीतकार तर झालेच पण कित्येक संगीतकारांनी आपल्या संगीताला साजेशी गीतरचना करण्यास सुरूवात केली. त्यापैकीच एक गीतकार संगीतकार गायक होता जीम क्रोस. जीम लहानपणापासून संगीतात रमणारा असला तरी कॉलेजात दाखल होईपर्यंत त्याने आपल्यातल्या संगीतकार-गीतकार आणि गायकाला फारसं मनावर घेतलं नव्हतं.

शिक्रेट (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 27/10/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला! लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते. ''काकू जरा मुरवण देता का?'' ''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू. मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू. काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत. पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी. नायतर मग चवकशा सुरूच- ''सुमी रोज कशाला येती?'' ''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?'' उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच! मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.

झटपट काजू-खोबरे बर्फी (मायक्रोव्हेव स्पेशल)

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 27/10/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
बर्फि साहित्य :तिन वाटि : ओले खोबरे उचलेले दोन वाटि : साखर एक छोटी वाटि :दुध पावडर एक छोटी वाटी : काजू पावडर दुध : दोन तिन चमचे वेलदोडा पुड,केशर,पिस्ता काप सा कृती :खवलेले खोबरे आणि साखर व काजू पावडर मिक्सर भांड्यात तिन चमचे दुध घालुन फिरवून एकजीव करुन घेणे.हे मिश्रण मायक्रोव्हेव भांड्यात घालून दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे.दोन मिनिटानंतर मिश्रण एकदा

न्यू यॉर्क : १५ : हेदर गार्डन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 27/10/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 27/10/2016 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे तारीख - ३१ ऑक्टोबर वेळ - सकाळी १० वाजता ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ) अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :) ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D

मूल दत्तक घेणे, प्रक्रियेची सुरुवात...

लेखक केडी यांनी गुरुवार, 27/10/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला फोन करून त्याचे आधी अभिनंदन करून, त्याची आणि त्याच्या बायकोची वेळ मागून घेतली. एका विकांताला त्याला आम्ही (चिरंजीव सुद्धा) जाऊन भेटलो, भरपूर बोललो, खूप छान माहिती मिळाली, आणि आत्मविश्वास वाढला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून एक जाणवल, ते म्हणजे दत्तक घेणेची प्रक्रिया खरं तर खूप सोप्पी आहे, पण अर्थात वेळ काढू आहे.
आधीच धागा इथे आहे. मित्राकडून सगळी माहिती घेऊन, आम्ही पुढच्याच विकांताला सोफोश [SOFOSH] च्या ऑफिस मध्ये फोन करून, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटायला गेलो.

'संघ' टन - एक प्रवास

लेखक नर्मदेतला गोटा यांनी गुरुवार, 27/10/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य संघटना का स्थापन करतो याचे कारण साधे आहे. त्याला त्याच्या किंवा आपल्या समाजाच्या कमकुवतपणाची जाणीव होते म्हणून. चार लोक जोडल्यानंतर एक शक्ती निर्माण होइल अशी त्याची अपेक्षा असते. हे संघटन समाज लगेच स्वीकारेल अशी स्थिती नसते. त्याला स्वतःसाठी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रसंगी इतरांना "थोडे सरकून घ्या" असे सांगावे लागते. तरच जागा निर्माण होते. सुरुवातीच्या काळातली आव्हाने वेगळी आणि नंतरच्या काळातली आव्हाने वेगळी असतात. सुरुवातीला संघर्ष इतरांबरोबर असतो. प्रतिकूलतेबरोबर असतो. निधी आणि साधनांचा अभाव असतो.