मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यक्तिचित्रण

अनटायटल टेल्स ५

मकरंद घोडके ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुरवात अशी काही नाहीच मधेच हे रस्त्याच्या कडेला उगवलेलं आहे झाडासारखं! त्याला भिकारी पण म्हणता येत नाही कारण त्याचं ते स्वतंत्र पणे कमावून खात आहे. त्याला फ्रीजमध्ये ठेवलेले नंतर खाऊ म्हणून ठेवलेले शिळे पदार्थ ठाऊक नाहीत! आवडीने चवीने खाईल असा पदार्थ आहारात नाही की चार पैसे गाठीला बांधून ठेवावेत अशी मध्यमवर्गीय की काय असते ती बैठक त्याच्या विचारात नाही! मग का जगत सुटलंय हे खाजेसारखं? माहीत नाही! मग काय चाललंय काय हे! चैतन्यदायी रस्ते असले काय किंवा थुलथूलीत रोडवणारा मोठा महामार्ग असला काय?

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.

गणेशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले.. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली.. अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे.. नंतर हॉटेल विश्व् ला आम्ही मी आणि ते चहा आणि टोस्ट खायला भेटायचो.. एकदा काकी पण आल्या होत्या..

वाटा वाटा वाटा ग..

Bhakti ·
लेखनविषय:
***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी**** निशू...अबब..निशूबद्दल लिहायचं म्हणाल तरी अंगावर रोमांच येतो.all raounder ,सुंदर खळखळून हसणारी माझी निशू.हिची आणि माझी १ ते १.५ वर्षाचीच मैत्री पण जे कामच ,फिरायचं,खायचं ,प्यायचं ..trill मी हिच्या बरोबर अनुभवलं ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत.एकदा एक studant भाषणात बोलला होता “भक्ती madam आणि निशू madam दोघी सारख्याच आहेत.”खरच आम्ही जरा जरा सारख्याच होतो.पण निशू गर्भश्रीमंतीत वाढलेली लाडाची लेक होती.जास्त हट्टी होती पण तेवढीच हळवी होती.निशू विठ्ठल भक्त आहे . अशी बिनधास्त कार चालवायची की १५ दिवसातून एकदा तरी कार ठोकायाचीच कुठेतरी.सगळ्याना कार शिकवली चालवायला हिने

वाटा वाटा वाटा ग..

Bhakti ·
लेखनविषय:
***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी**** “मैत्री अलवार नात चालत राहील पाहिजे निरंतर...” ही जर माझ्या आयुष्यात नसते तर मी मैत्रीचा गंध कधीच अनुभवला नसता.कारण माझ्याकडून मैत्री निभावली जाईला का याची मी काळजी हाकते.पण जी काही केल्या तुटतच नाही ती मैत्री...कधीही भेटलं तरी सहज संवाद साधणारी मैत्री असते... सुलू...प्रेमाने आम्ही अशीच हाक मारतो तिला.ती सगळ्यांना प्रेम वाटते ,तिला त्याहून दुप्पट मिळाव असे मला वाटत...आजही आमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या संपर्कात असणारी तीच आहे.सतत मदत करायला तयार असते.कस काय जमत तिला काय माहित?जोडण हे तिच्या स्वभावात आहे अस मला वाटत... सुलूच शालेय शिक्षण

स्मृतीची पाने चाळताना: तीन

चंद्रकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा!

रंगराज्य -२

vcdatrange ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉक्टरीचं शिक्षण म्हणजे एकदम रटाळ काम असतं. त्यातही जर आयुर्वेद शिकायचा असेल तर ती भुक कॉलेजात कधीच पुर्ण होत नाही. मग पर्याय असतो ते प्रस्थापित वैद्यांच्या OPDs अटेंड करणे, पुण्यातले माझी सात वर्षही अशीच खुर्चीमागे उभी राहुन सरली. अगदी पहिल्या वर्षापासूनच याची सुरुवात झाली होती. राहायचो समितीला म्हणजे एफ सी रोडवर पटवर्धनांच्या पॅलेसमागे अन् कॉलेज सदाशिवात. वाहतुकीचं साधन एकच , सायकल. सकाळी साडे सातला तुळशीबागेत वैद्य अजित जोशींच्या दवाखान्यात तिकडुन दहा पर्यंत परत होस्टेल, कारण मेसला जेवण नाही केलं तरी दंड असायचा. जेवुन लगेच सदाशिवात कॉलेजला . .

रंगराज्य

vcdatrange ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आडनावाचा प्रभाव असेल कदाचित, पण रंगांच obsession लहानपणापासनंच. वडील चित्रकला शिक्षक असल्यानं घरात कायमचीच रंगपंचमी असायची. पुण्याजवळ थेऊरला राहायचो तेव्हा. . त्याकाळातला मास्तरांचा पगार वैग्रेचं गणित जुळवायला बोर्डस् रंगविणे, घरांचे रंगकाम देखिल करायचे. आईचाही सहभाग असायचा यात. . त्याकाळी लाकडाची चौकट बनवुन त्यावर पत्रा ठोकुन बोर्ड बनवले जायचे. पुण्यात पेठेत कुठे साहीत्य खरेदी करुन पुलगेटपर्यंत पायी यायचं अन् तिथुन थेऊरसाठी गाडी पकडायची. कारण सिटीबसमध्ये साहीत्य घेवुन जावु देत नसतं. कापडी बोर्ड रंगविण्याअगोदर "सरस" नावाचा प्राणिज डिंक उकळुन त्यात कापड भिजवायचे.

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

स्मृतीची पाने चाळताना: एक

चंद्रकांत ·
लेखनप्रकार
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.